World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Sep23
लोकापवाद किंवा लोकप्रियता: डॉ. श्रीनिवास ज
लोकापवाद किंवा लोकप्रियता: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्याविषयी बोलताना; नामस्मरणात केलेले कार्य सत्कारणी लागते आणि नामविस्मरणात केलेले वाया जाते; असे आपण म्हणालात. पण पुष्कळदा सामान्य माणसे यासंदर्भातील सरकारी धोरणांच्यावर आपापली मते प्रदर्शित करतात, टीका-टिप्पणी करतात. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?

शिक्षक: आपण सर्वच जण सामान्य आहोत. आपल्याला कोणत्याही गोष्टीची थोडीफार जरी झळ लागली तरी आपण तक्रार करतो आणि थोडासा जरी फायदा झाला तरी सरकारचा उदो-उदो करतो. आपली मुले-बाळे, आपले आप्त-स्वकीय, आपले मान-अपमान, आपला फायदा-तोटा; ह्यांभोवती आपली मते फिरतात. त्यामुळे; आपणा सर्वांना लोकशाही कितीही श्रेष्ठ वाटत असली तरी; आपण व्यक्त केलेली प्रत्येक टीका-टिपण्णी आणि व्यक्त केलेले प्रत्येक मत विचारात घ्यायच्या लायकीचे असतेच असे नाही, हे इतरांप्रमाणेच आपल्याला देखील पक्के माहीत असते.

विद्यार्थी: याचा अर्थ; सामान्यांची मते लक्षात घेतली जाऊ नयेत असा घ्यायचा का?

शिक्षक: सामान्यांची मते नक्कीच लक्षात घेतली जायला हवीत. पण त्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने; त्यांच्या मतांना किती महत्व द्यायचे हे नामस्मरण करणाऱ्या शासकांना बरोबर कळते. ते लोकापवाद किंवा लोकप्रियता यांनी दबून वा बहकून जात नाहीत. लोकप्रतारणा करीत नाहीत आणि लोकानुनय देखील करीत नाहीत. कारण; नामस्मरणाद्वारे; चित्त शुद्ध होत चाललेले वा झालेले शासक; जेव्हां एखादे धोरण आंखतात, एखादा विचार करतात, एखादा संकल्प करतात, एखादी योजना आखतात, किंवा एखाद्या योजनेची अंमलबजावणी करतात, तेव्हां ते सारे नि:स्वार्थ भावनेतून, भेदभाव रहित वृत्तीतून होत असते. ते सारे थेट गुरुमार्फत, विश्वचैतन्याच्या जननीमार्फत वा ईश्वरामार्फत घडत असते. त्यामुळे ते चैतन्याकडे वा ईश्वराकडे नेणारे असते. आणि म्हणून ते विश्वकल्याणाचेच असते. जेव्हा असे लोक; शस्त्रसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता, आरोग्यसत्ता, उद्योगसत्ता, शिक्षणसत्ता अशा सर्व सत्तास्थानी येतात आणि राज्य करतात, तेव्हां त्या राज्यालाच रामराज्य म्हणतात.
कुंभ मेळाच नव्हे तर इतर यात्रा व उत्सवांबद्दल निस्वार्थपणे टीका-टिप्पणी करण्यासाठी व लोकशाही खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी आणि बळकट करण्यासाठी, आपल्यासारख्या सामान्य लोकांचे विचार देखील नामस्मरणाच्या योगाने; संकुचित कोशातून बाहेर आले पाहिजेत. अशा तऱ्हेने आपण निस्वार्थी आणि विशाल बनलो तरच; चांगल्या नेतृत्वाला समजून घेऊन बळ देऊ शकू किंवा स्वत: चांगले नेते बनू शकू!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (7377)  |  User Rating
Rate It


Browse Archive