World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Jun30
आमचे नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
आमचे नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, "आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे. भांडे भरले किती आणि रिकामे किती, हे त्याला समजत नाही. तो भरतच राहतो. तसे नाम सतत घेत राहावे. देहाच्या कणाकणातून नामाचा ध्वनी केव्हाही यावा इतके नाम घ्यावे. सुरुवातीला रामनाम असे मुरले की पुन्हा जास्त लक्ष द्यावे लागत नाही. आपोआप देहाचे सारे कण नामजप करतात."

हे सांगणे किती पराकोटीचे सत्य आहे याची सहज कल्पना येत नाही. नीट विचार केला तर लक्षात येते की; आमच्या सद्गुरुंचाच अनुग्रह आम्हाला का आणि कसा मिळाला, विशिष्ट देशातच आणि विशिष्ट आई-वडिलांच्या पोटीच आमचा जन्म का आणि कसा झाला, विशिष्ट व्यक्तीच आमच्या कुटुंबीय का आणि कश्या झाल्या; यातले काहीच आम्हाला कळत नाही! भिंतीच्या पलिकडे काय चाललेय हे कळत नाही! समोरच्या व्यक्तीच्या मनातले कळत नाही! एवढे कशाला, आमच्या स्वत:च्या शरीराच्या आणि मनाच्या कोनाकोपऱ्यात केव्हां केव्हां, काय काय घडले आणि का घडले, आता काय आणि का चाललेय आणि पुढच्या क्षणी काय होणार आणि का होणार हे देखील आम्हाला कळत नाही! मग आम्ही “आंधळे”च नव्हे काय?

आता आमच्याकडून घडणाऱ्या नामस्मरणाचा विचार करू! आपल्या नामस्मरणामध्ये; क्षणोक्षणी; इतर विचार, इच्छा, आशा, निराशा, मत्सर, द्वेष, राग, लोभ, चिंता, तिरस्कार, काळजी, खिन्नता इत्यादी कोणत्या भावना, किती तीव्रपणे उत्पन्न होतात, कोणत्या वासना, कोणत्या थरातून उद्भवतात, हे आम्हाला कळू शकते का? नाही! आमची जपसंख्या मोजताना आणि नोंदताना आम्ही हे सारे लक्षात घेऊ शकतो का? नाही! मग आम्ही “आंधळे”च नव्हे काय?

म्हणूनच सद्गुरूंची शिकवण आचरणात आणण्याचा जीवापाड प्रयत्न आम्ही नको का करायला?

श्रीराम समर्थ!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4825)  |  User Rating
Rate It


Browse Archive