World's first medical networking and resource portal

Articles
Medical Articles
Sep17
लेखांक ७. श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातीλ
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
लेखांक ७.
नम: समस्त भूतानाम् आदिभूताय भूभृते
अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभविष्णवे -२.
सर्वासामान्यपणे पाच महाभूतांमध्ये वर्गीकृत अशा चराचर मूळ पदार्थांचेही मूळ असलेल्या आणि अनेक रूपातील अशा जगत्स्वामी विष्णूला माझे पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार असोत.
वैशंपायन उवाच
श्रुत्वा धर्मानशेषेण पावनानि च सर्वश:
युधिष्ठिर: शांतनवं पुनरेवाभ्यभाषत -३.
वैशंपायन ऋषी जनमेजय राजाला म्हणतात, “भीष्माचार्याकडून, संपूर्ण पवित्र धर्म आणि धर्माचार यांच्यासंबंधीचे विवेचन ऐकून धर्मराज युधिष्ठिर भीष्माचार्याना सहा प्रश्न विचारतात”.
किमेकं दैवतं लोके किंवाप्येकं परायणम्
स्तुवन्त: कं कंमर्चन्त: प्राप्नुयुर्वानवा: शुभम् – ४.
को धर्म: सर्व धर्माणां भवता: परमो मत:
किं जपन्मुच्यते जन्तुर्जन्मसंसारबंधनात् -५.
प्रश्न १. किमेकं दैवतं लोके म्हणजे ह्या विश्वामध्ये एकमेवाद्वितीय असा देव कोणता आहे? देव ह्याचा आशय स्वतंत्र आणि विश्वनियंत्रक अशी शक्ती. आपण सर्व व्यक्तीश: मर्यादित आणि परतंत्र असलो तरी अशा शक्तीची सुप्त आणि अनामिक ओढ असल्यामुळे आपल्या मनात असा प्रश्न निर्माण होतो.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4763)  |  User Rating
Rate It


Sep16
लेखांक ६. श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातीë
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
लेखांक ६
श्री गणेशाय नम:
संपूर्ण विश्वाचा आणि आपल्या जीवनाचा आणि प्रज्ञेचा देखील मूलाधार अशा ॐकाराचे सगुण स्वरूप म्हणजे गणेश. म्हणूनच सर्व कार्याप्रमाणे ह्या कार्याच्या आरंभी देखील श्री गणेशाला नमन असो.
श्री. वेदव्यासाय नम:
भगवान श्री वेदव्यास महर्षीनी महाभारतामध्ये भीष्माचार्य आणि युधिष्ठिर ह्यांच्या संवादाद्वारे विष्णूसहस्रनामस्तोत्र प्रगट केले आहे. ह्या स्तोत्राचा आशय म्हणजे सर्व तऱ्हेच्या भेदाभेदांच्या पलीकडील कालातीत सामर्थ्याचा महास्त्रोत आहे. वैयक्तिक आणि वैश्विक उत्कर्षाची ती महासंजीवनीच आहे.
वेदव्यास म्हणजे आपल्याच अंतरंगातील, पण एरवी आपल्याला सहजासहजी प्राप्त न होणारा असं दुष्प्राप्य आणि दुर्लभ असा सच्चिदानंदच.
म्हणून विष्णुसहस्रनामाचा अचूक आशय कळावा म्हणून श्री वेदव्यासाना प्रणाम असो.
यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात्
विमुच्यते नमस्तमै विष्णवे प्रभविष्णवे
ज्याच्या केवळ आठवणीने देखील जन्म आणि मृत्युच्या चक्रातून म्हणजे अज्ञ आणि परावलंबी अस्तित्वातून मुक्ती मिळते, तो विष्णू अंतर्बाह्य सर्व व्यापणारा सर्वव्यापी आहे. तो विचारातीत आहे. तो संप्रदायातीत आहे. त्या विश्वव्यापी श्री विष्णूला माझे (माझ्या मर्यादित अस्तित्वाचे) साष्टांग नमस्कार असोत.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4705)  |  User Rating
Rate It


Sep16
लेखांक ५. श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातीë
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

लेखांक ५. हे पुस्तक वाचताना तुम्ही तुमच्या बुद्धीमध्ये (जी अगदी कुशाग्र असली तरीही मर्यादित असते) जखडून न राहता, सत्याच्या प्रचीतीची कास धरणे श्रेयस्कर ठरेल. कारण, खरा नास्तिक तो, जो स्वत:च्या संकुचित बुदधी, कल्पना, भावना, वासना यांचे सापेक्षत्व जाणून, त्यांना संपूर्ण सत्य मानीत नाही आणि त्यांना चिकटून राहत नाही आणि खरा आस्तिक तो, जो हे करतानाच केवळ चिरंतन सत्य अशा आत्मस्वरुपाला (नामाला) चिकटून राहतो तो! त्यामुळे असे सूज्ञच खरे आस्तिक आणि खरे नास्तिक असतात.
दुसरी बाब अशी की हे पुस्तक एकट्या लेखकाचे नाही. ज्याप्रमाणे स्वत:चे मातापिता, आनुवंशिकता, जन्मस्थान, कुटुंब, हे जसे व्यक्तीला ठरवता येत नाही, त्याचप्रमाणे तिचे स्वत:चे विचार, भावना, प्रतिभा; हे सारे देखील व्यक्तीला ठरवता येत नाही. ते सारे तिच्या कल्पनेपलिकडील सर्वान्तर्यामीच्या सच्चिदानंदातून स्फुरते आणि म्हणूनच ह्या ईश्वरी कृपेमध्ये सर्वांनी हक्काने सहभागी व्हायचे असते. एकाद्या कपातून गंगा प्राशनाचा योग आला तर ज्याप्रमाणे कप हा गंगेचा जनक नसतो, त्याचप्रमाणे हे आहे.
तिसरी बाब अशी की, लेखकामध्ये मर्यादा असू शकतात. दोष असू असू शकतात. पण कप फुटका असला तरी ज्याप्रमाणे आपण गंगेला दूषण देत नाही तसेच हे पुस्तक अभ्यासताना नकळत पूर्वग्रहदुषित न होता तुम्ही पुस्तकातील आशयाला दूषण देणार नाही अशी खात्री आहे.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (3289)  |  User Rating
Rate It


Sep16
लेखांक ४. श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातीë
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
लेखांक ४. सर्वंकष वैयक्तिक आणि वैश्विक कल्याणाचा हा आविष्कार प्रत्यक्षात कसा येईल हे आता जाणून घेऊ.
मेंदूचा रक्तपुरवठा थांबल्यामुळे; अचेतन झालेले शरीर ज्याप्रमाणे रक्तपुरवठा नीट होताच पूर्ववत सचेतन आणि कार्यरत होते तसेच हे होणार आहे. सत्याची अनुभूती ही गंगोत्री आहे. तिच्यापासून सदसद्विविवेक, सद्बुद्धी, सत्प्रेरणा, सद्विचार, सद्भावना, सद्वासना, सत्संकल्प, सदिच्छा, सत्कार्य आणि सुसंवाद यांच्या नवसंजीवनीचा प्रवाह सुरु होतो. ह्या नवचैतन्यदायी प्रवाहाने वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात सद्गुणांचे बल वाढते आणि त्यांचे आधिपत्य आणि सत्ता यांचा अंमल सुरु होतो. यातून जीवनाच्या सर्व क्षेत्रात सदभिरुची, सहिष्णुता, समंजसपणा, सहकार्य, समाधान, स्वास्थ्य यांचे प्रकटीकरण होऊ लागते. यातून लोककल्याणकारी धोरणे, योजना, कायदे, नियम आणि संकेत जरुरीप्रमाणे पुनर्रचित व कार्यरत होतात. अशा तऱ्हेने विष्णुसहस्रनाम (नामस्मरण) ही आत्मज्ञानाची आणि पर्यायाने समृदधीची गंगोत्री आहे. यामध्ये वैश्विक उर्ध्वगामी क्रांतीचे बीजामृत आहे. स्वात्म्यवादी क्रांतीचा उर्जास्त्रोत आहे. यामध्ये आत्मज्ञानी महापुरुषांचे प्रेरणास्त्रोत आणि स्फुर्तीस्त्रोत आहेत. त्याचप्रमाणे पसायदानाची पूर्ती आहे.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (2978)  |  User Rating
Rate It


Sep16
लेखांक ३. श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातीë
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
लेखांक ३. आपल्यातील जडत्वामुळे, आपण स्वत:च्या अजरामर आणि विशाल अशा कालातीत अस्तित्वाला विसरतो आणि पारखे होतो. हेच तमस, पाप, अज्ञान, अंधार, अवनती आणि अवदसा.
यामुळे आपण स्वत:ला केवळ देह समजू लागतो आणि देहरूप होतो. देहाशी निगडीत वासना, भावना, कल्पना, विचार, समजुती, श्रद्धा, संकेत इत्यादीमध्ये स्वत:ला जखडून घेतो. अशा प्रकारे स्वत:च्या मर्यादित, संकुचित आणि नश्वर अंशाला स्वत:चे पूर्ण आणि शाश्वत अस्तित्व मानणे म्हणजेच देहबुद्धी. आणखी स्पष्ट करायचे तर, असं म्हणता येईल, की शरीराच्या नखे, दात, केस इत्यादीपैकी एकाद्या छोट्या भागाला संपूर्ण शरीर समजणे ही जशी गफलत आहे, तशीच देहबुद्धी ही देखील एक फार मोठी गफलतआहे. तो एक भ्रम आहे. तसेच ती एक जबर अशी अंधश्रद्धा आहे.
देहबुद्धीमुळे आपण आपल्या सच्चिदानंद स्वरूपाला पारखे होऊन क्षुद्रत्वात अडकतो आणि आपले क्षुद्रत्व आपल्या जीवनांत आविष्कृत होत जाते. आपण हीन जीवन जगू लागतो. क्षुद्र वासना, भावना, विचार, कल्पना, दृष्टीकोन यांमुळे गुलाम बनतो वा बनवतो, त्रास भोगतो वा देतो, अगतीक बनतो वा बनवतो. साहजिकच असहाय्यता आणि हिंस्रपणा यांचा अघोरी हैदोस चालू होतो. आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक अशा जीवनाच्या सर्व क्षेत्रात हा हैदोस मग अक्राळविक्राळ रूप धारण करू लागतो. सारी मानवी मूल्ये नष्ट करणाऱ्या विनाशपर्वाचे भयानक व किळसवाणे लोण सर्वत्र व सतत पसरू लागते.
परंतु विष्णुसहस्रनामाच्या अभ्यासातून (नामस्मरणातून) हळूहळू आपल्याला आपल्या स्वरूपाची म्हणजेच सच्चिदानंदाची अनुभूती येऊ लागते. ही अनुभूती म्हणजे विश्वचैतन्याची उषाच! यथावकाश ह्या उष:कालाची परिणती वैश्विक आत्मज्ञानाच्या महासूर्योदयात होते. ह्या महासूर्योदयाचा प्रकाश म्हणजेच जीवनाच्या सर्व क्षेत्रातील मानवी मूल्यांचे विश्वकल्याणकारी पुनरुज्जीवन आणि पुनराविष्कार.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1727)  |  User Rating
Rate It


Sep16
लेखांक २ श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

लेखांक २. विष्णुसहस्रनाम म्हणजेच विष्णूची एक हजार नावे. ही एक हजार नावे आठवणे किंवा स्मरणे म्हणजे एकामागून एक अशा प्रकारे आपले एक हजार डोळे उघडण्यासारखे आहे. हे एक हजार डोळे अर्थात अंत:चक्षु जसे उघडत जातात तसे आपल्याला आपले आणि विश्वाचे सच्चिदानंदमय मूळ स्वरूप अधिकाधिक जाणवू लागते. कालांतराने आपण आपल्या ह्या मूळ स्वरूपाशी तद्रूप होतो.
आपल्या ह्या एक हजार डोळ्यांतून आपल्या सर्वांच्या अंतर्यामी जाणवणाऱ्या ह्या आशयाचे म्हणजेच आनंदसंजीवनीचे वैशिष्ट्य कोणते आणि व्यक्ती आणि विश्व ह्यांना अंतर्बाह्य व्यापणाऱ्या ह्या कालातीत सत्याची प्रचीती म्हणजे काय; हे आपण वीजेच्या बल्बच्या उदाहरणाने समजून घेण्याचा प्रयत्न करू.
ज्याप्रमाणे बल्ब विजेमुळे ‘पेटतो’, त्याचप्रमाणे सजीव आणि निर्जीव सृष्टीतील अणुरेणु; चिरंतन सत्यामुळे क्रियाशील होतात. ह्या सत्यालाच सच्चिदानंद म्हणतात. ह्या आनंदरूप सत आणि चित अश्या सत्यालाच; पुरुष-प्रकृती, शिव-शक्ती, लक्ष्मी-नारायण, सीता-राम, राधा-कृष्ण ह्या द्वंद्वानी ओळखले जाते. ज्याप्रमाणे बल्ब फुटला तरी वीज नष्ट होत नाही, त्याचप्रमाणे मनुष्य देह जरी नष्ट झाला तरी त्याचे सच्चिदानंद स्वरूप नष्ट होत नाही.
अर्थात ही तुलना मर्यादित अर्थाने समर्पक आहे. बल्ब आणि मनुष्यात फरक आहे.
बल्बला त्याचे मूळ स्वरूप वीज आहे हे कळण्याची व्यवस्था नाही. तसेच बल्बला त्याच्या स्वत:च्या आणि इतर बल्बांच्या वीजमय मूळ स्वरूपाशी समरस होऊन अमर आणि स्वतंत्र होता येत नाही.
याउलट, मनुष्याला त्याचे मूळ स्वरूप सच्चिदानंद असून स्वत:च्या आणि विश्वाच्या अंतर्यामी देखील हा सच्चिदानंद आहे हे कळू शकते. एवढेच नव्हे, तर त्याच्याशी समरस होता येते आणि अमर व स्वतंत्र होता येते.
दुसरा फरक असा की, बल्ब आणि विजेचा संयोग ही भौतिक घटना तिसऱ्या भौतिक घटकामुळे होते, तर मनुष्य आणि सच्चिदानंद ह्यांच्यातील नाते, ह्या नात्याची मनुष्याला येणारी जाण आणि यातून होणारा आविष्कार, हे सारे सच्चिदानंदाच्या सत्तेनेच होत असते.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1743)  |  User Rating
Rate It


Sep16
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
लेखांक १.
मान्यवर वाचक स्नेही! सादर प्रणाम!
ह्या पुस्तकात तुम्हाला, मूळ संस्कृत विष्णुसहस्रनाम स्तोत्र, त्यामधील विष्णुच्या एक हजार नावांचे मराठी अर्थ आणि त्या अर्थांमधून मला जाणवलेला आशय वाचायला मिळेल.
हा आशय वाचताना, तो स्वत:च्याच अंतर्यामी स्फुरला आहे असे जर तुम्हाला वाटले, तर त्यात काहीही वावगे नाही. कारण, ह्या शब्दांमधला आशय, वास्तविक शब्दातीत आहे. आपल्या सर्वांच्या; जाणीवेच्या आणि अस्तित्वाच्या मूलस्त्रोताशी एकजीव आहे. जाती, धर्म, राष्ट्रीयत्व, वंश, संस्कृती, व्यवसाय, लिंग, प्रवृत्ती, विचार, विकास, वय वगैरे विविध प्रकारच्या वर्गीकरणात बसणाऱ्या प्रत्येकाच्या मूलाधाराशी तो एकात्म आहे. म्हणूनच तो आपल्या सर्वांचाच आहे व राहील.
आपल्या सर्वांच्या अंतरंगीचे हे अमृत, ही आनंदसंजीवनी; संकुचितपणाकडून विशालत्वाकडे, धर्मवेडाकडून सहृदय उदारतेकडे, वैचारिक गुलामीतून सत्याच्या प्रचीतीकडे, दुबळेपणातून समर्थतेकडे आणि विपन्नावस्थेतून संपन्नतेकडे नेणारी विश्वकल्याणकारी संजीवनी आहे अशी खात्री होत राहिल्यामुळे; ही शब्दातीत आनंद संजीवनी काही प्रमाणात का असेना, शब्दबद्ध करण्याचे कठीण काम माझ्यासारख्या अति सामान्य व्यक्तीकडून पार पडले आहे ही लक्ष्मीनारायणाची म्हणजेच सद्गुरूंची कृपा.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1751)  |  User Rating
Rate It


Sep09
श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, "भगवंताचा व
श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, "भगवंताचा विसर हेच मोठे पाप": डॉ. श्रीनिवास कशाळीकर

जग सुंदर बनवायचे तर आपण सुंदर नसून कसे चालेल? आपण सुंदर बनायला हवे ना?

आपण सुंदर बनण्यासाठी सर्व सद्गुणांची खाण असलेल्या भगवंताशी जोडले जाणे अपरिहार्य आहे.
त्याशिवाय आपण सुंदर बनू शकत नाही आणि जग देखील सुंदर बनू शकत नाही. आणि असे न होणे हेच पाप नाही का?

म्हणूनच सगळ्या पाप आणि पुण्याचा विचार करत न बसता आपण भगवंताच्या नामस्मरणाने त्याच्याशी जोडले जाणे हेच पुण्य आणि श्रेयस्कर आहे!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1727)  |  User Rating
Rate It


Sep03
नामस्मरण आणि तारुण्य डॉ. श्रीनिवास कशाळीक
नामस्मरण आणि तारुण्य डॉ. श्रीनिवास कशाळीकर

बाल वयातच जर नामस्मरण सुरु केलेले तर आपले मन विशाल होऊ लागते. निष्कपट होऊ लागते. निष्पाप होऊ लागते.

यामुळे; वयोमानानुसार पती - पत्नीने वासना आणि आवडी निवडी जरी पुरविल्या नाही तरी आकर्षण आणि प्रेम कमी होत नाही.

प्रेम आणि समाधान टिकतात आणि वाढतात.

तारुण्यातला अपरिपक्व आणि संकुचित प्रणय ओसरला तरी त्याची जागा हा परिपक्व आणि लोकोत्तर ऋणानुबंध घेतो आणि चिरकाल टिकतो.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1937)  |  User Rating
Rate It


Aug28
गोंदवलेकर महाराज म्हणतात “सद्गुरू म्हणजे 
गोंदवलेकर महाराज म्हणतात “सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत नामच”.डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे” आणि “सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत नामच”. याचा अर्थ नामस्मरण हीच जीवनातली सर्वोच्च कृती! कारण सद्गुरूची भेट आणि सद्गुरूचे प्रेम हेच जीवनात मिळवायचे असते.

आजारपणात जीवन संपत आले की; ऐहिक यशाने समाधान झालेले नसल्यामुळे, इतर काय करतात आणि इतरांनी काय मिळवले, ह्या भ्रमात आपण गुरफटतो. अश्या वेळी इतरांच्या (आणि आपल्याही) मागची नामाची सत्ता आपण विसरतो आणि नामाचे सर्वोच्च महत्व देखील विसरतो. जीवन व्यर्थ गेले असे वाटते! नकळत आपण नामाचा आणि सद्गुरुंचा अनादर करतो!

नाम म्हणजेच सद्गुरू आणि नामावर प्रेम करणे म्हणजे सद्गुरूंवर प्रेम करणे असल्यामुळे नामस्मरणाएवढे श्रेष्ठ दुसरे कांहीही नाही. नामाशिवाय काहीही मिळवायचे नाही. नाम घेतांना मृत्यू आला तर ते खरे सर्वश्रेष्ठ भाग्य; कारण तीच गुरुभेट, तेच जीवनाचे सार्थक आणि तेच सर्वश्रेष्ठ साफल्य!

म्हणूनच आत्यंतिक वेदना, हतबलता आणि मृत्यूसमयीसुद्धा नामाचा विसर पडू नये हीच सद्गुरुचरणी कळकळीची प्रार्थना.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (5650)  |  User Rating
Rate It


Browse Archive