World's first medical networking and resource portal

Articles
Category : All ; Cycle : August 2016
Medical Articles
Aug21
गोंदवलेकर महाराज मला समजलेले : मनोगत डॉ. श्र
मनोगत: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

नामाचा महिमा अगाध आणि शब्दातीत आहे. नामस्मरण करावे तेवढे थोडेच आहे. पण हे कळत असून सुद्धा पुरेसे वळत नाही. नामावरची निष्ठा आणि नामामधील प्रेम म्हणावे तसे वाढलेले नसल्यामुळे नामात रमून जाणे होत नाही आणि नामस्मरण अखंड चालत नाही. त्यात खंड पडतो!
पण ह्या दरम्यान पुष्कळदा कळत नकळत; नामाविषयी विचार मात्र चालू असतात. आजवर न जाणवलेले नामस्मरणाचे विविध कल्याणकारी पैलू नव्याने जाणवत जात असतात. अर्धवट जाणवलेले पैलू अधिक स्पष्ट होत जात असतात.
इतर सर्व बाबींप्रमाणे ह्यामागे देखील नामरूप असलेल्या सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांचीच प्रेरणा आहे. खरे सांगायचे तर; नामरूप असलेल्या त्यानी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आणि अनेकानेक प्रकारे नामाचा शब्दातीत महिमा प्रगट करणे साहजिकच असल्यामुळे त्यांनी तसा तो प्रगट केला आहे आणि अजूनही करत आहेत!
पण आमच्यातल्या प्रारब्धवश त्रुटीमुळे आम्हाला जे प्रश्न पडतात आणि ज्या शंका येतात, त्यांची आम्हाला पटतील अशी उत्तरे जेव्हां मिळतात, तेव्हां नवीन शोध लागल्यासारखे वाटते! ही उत्तरे देखील त्यांच्या बोधवचनांमध्ये त्यांनी अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेत पूर्वीच देऊन ठेवली आहेत! पण ती; त्यांच्या भाषेच्या सोपेपणामध्ये आणि साधेपणामध्ये लपल्यामुळे आणि कालानुरूप परिस्थिती बदलल्यामुळे ज्या नवनवीन समस्या तयार झाल्या त्यामुळे आम्हाला मिळत नव्हती वा कळत नव्हती!
नामाच्या महिम्याचा हा अंश जाणवण्याने मन हर्षभरित होते, मनामध्ये हुरूप येतो, मनाला विस्मय वाटतो आणि तो लिहून झाल्याशिवाय चैन पडत नाही! त्यामुळे, हे सारे पूर्वी कुणी लिहिलेले आहे की नाही, ह्या लिहिण्याने इतर कुणाला लाभ होईल की नाही; ह्यापेक्षा, नामाचा हा महिमा स्वत:का अधिक स्पष्ट होईल ह्या भावनेने, स्वत:च्या तो मनात घोळवता येईल ह्या तीव्र ओढीने आणि त्याचप्रमाणे तो मनामध्ये मावत नसल्याने नामाविषयीच्या लिखाणाला सुरुवात झाली! नामस्मरणात पुरेसे रंगून जाण्यापूर्वीच नामाचा हा अंशमात्र मला जाणवणे आणि तो लिहिला जाणे ही देखील सद्गुरुंचीच इच्छा आहे यात शंका नाही! किंबहुना, नामाची निष्ठा आणि नामाचे प्रेम येण्यासाठी आवश्यक असल्यामुळेच की काय सद्गुरुनी वर्षानुवर्षे करून घेतलेला हा गृहपाठ असावा! त्यातले असली अर्थातच त्यांचे आणि नकली ते माझे यात मुळीच शंका नाही!
म्हणूनच, जीवनातील इतर सर्व बऱ्यावाईट आणि योग्य-अयोग्य बाबींप्रमाणे हे आणि आत्तापर्यंत झालेले नामाविषयीचे अल्पसे लिखाण जसे आहे तसे; त्याबद्दल कोणताही दावा न करता मनापासून विनम्रपणे आणि कृतज्ञतापूर्वक सद्गुगुरुंच्या चरणी सादर समर्पण!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (970)  |  User Rating
Rate It


Aug10
भक्ती आणि नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
भक्ती आणि नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
भक्ती म्हणजे अस्सल आणि सर्वोत्तम आरोग्य! जीवाच्या पूर्णतेची, उत्कट, निस्वार्थी विश्वकल्याणकारी आणि अजरामर अवस्था म्हणजे भक्ती. वैयाक्तिक, मर्यादित आणि संकुचित भ्रम गळून जाण्याची अवस्था म्हणजे भक्ती. भेदभाव, पक्षपातीपणा, पूर्वग्रह, द्वेष, सूडबुद्धी, भीती, काळजी, हाव, अपेक्षा विरघळून जाण्याची अवस्था म्हणजे भक्ती. प्रतिक्षणी सद्भावना संप्रेरित करणारी जीवाची अवस्था म्हणजे भक्ती. भक्ताची निव्वळ उपस्थिती देखील आपल्याला सच्चिदानंदाकडे खेचून घेते.
म्हणूनच परमात्मस्वरूप सद्गुरुंच्या परम कृपेने आपण सर्वजण उथळ आणि संकुचित अस्तित्वातून प्रगत होत, भक्तिमार्गाला लागतो! सद्गुरुकृपेनेच जीवनात घडलेली आणि घडत जाणारी प्रत्येक बाब शरणागतीमध्ये आणि भक्तीमध्ये परिणत होऊ लागते. अश्या तऱ्हेने हळूहळू नामात रंगण्याचा म्हणजेच भक्तीचा अल्पसा देखील अनुभव येणे ही सद्गुरूंची परम कृपाच होय!
म्हणूनच “तुम्ही नुसते नाम घ्या; बाकीचे सर्व मी करतो” हे सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांचे वाक्य सतत आठवत राहून, जमेल तेवढे आणि जमेल तसे नामस्मरण चिकाटीने करीत राहणे आणि आपल्याला समजलेले व्यक्त करत जाणे ह्यालाच आपण आपल्या जीवनात सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे!
श्रीराम समर्थ!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1252)  |  User Rating
Rate It


Aug10
अनुभव नामस्मरणाचे: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
अनुभव नामस्मरणाचे: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

विद्यार्थी: सर, नामस्मरणाचे अनुभव सांगा ना!
शिक्षक: प्राणवायू, अन्न, पाणी इत्यादींमुळे आपले शरीर आणि मन पूर्वार्धाच्या पातळीपर्यंत विकसित होतात. नामस्मरणाने ह्या विकासाची पुढची म्हणजेच उत्तरार्धाची पायरी साध्य होते.
विद्यार्थी: पण सर, तरी देखील काही ना काही अनुभव असतीलच ना?
शिक्षक: होय! असतात! नामस्मरणाने सम्यक विकास होत असताना मूलत: वासना, भावना, विचार आणि दृष्टीकोन प्रगल्भ होत जातात. परिणामी ज्याच्या त्याच्या प्रकृतीधर्मानुसार ही प्रगल्भता व सृजनशीलता; विचार, योजकता, साहित्य, कला, संगीत, नेतृत्व, संशोधन, व्यवस्थापन; अश्या विचिध क्षेत्रांत आविष्कृत होते.
विद्यार्थी: पण अध्यात्मिक अनुभवांचे काय?
शिक्षक: कधी मृत्युच्या जबड्यातून सुटका होणे, कधी अनपेक्षित यश मिळणे, कधी कल्पनातीत लाभ होणे, कधी बिकट समस्यांची उकल होणे, कधी उत्कट काव्य स्फुरणे, कधी असामान्य कार्य हातून घडणे; इत्यादी अनेक प्रकारे नामस्मरणाचे अनुभव येतात! संवेदनाशीलता, हळुवारपणा, सहिष्णुता, क्षमाशीलता, नि:पक्षपातीपणा, आत्मपरीक्षण इत्यादी अनेक अंगानी साधकाची वाढ होते. ही वाढ अर्थातच रोजच्या व्यवहारात साधक आणि त्याच्या आजूबाजूचे लोक अनुभवतात..
विद्यार्थी: ह्या साऱ्या अनुभवांमध्ये एकादी समान बाब असते का?
शिक्षक: होय! प्रत्येक अनुभवागणिक साधक; भ्रमाच्या पलिकडे आणि सत्याच्या जवळ जातो!
विद्यार्थी: आपले सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर काय सांगतात?
शिक्षक: त्यांच्या म्हणण्याचा आशय असा आहे की, अनुभवांच्या मागे लागू नये!
हे मला अगदी मनापासून पटतं! कारण, वरील प्रकारचे किंवा अन्य अनुभव निश्चितपणे, अमुक एका व्यक्तीमध्ये व अमुक एका वेळेला येतीलच असे सांगता येत नाही! मात्र, आमच्या सारख्या सामान्यांकडून नामस्मरण होणे व वाढत राहाणे हीच आपल्या सद्गुरूंची सर्वश्रेष्ठ कृपा आणि हाच नामस्मरणाचा सर्वश्रेष्ठ अध्यात्मिक अनुभव असं मला वाटतं!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1531)  |  User Rating
Rate It


Aug09
नामात रंगणे: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामात रंगणे: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

नामस्मरण करता करता समजू लागते की नामस्मरण हे सोपे साधन आहे; पण “नामात रंगणे” व “समाधानी होणे” हे शब्द सोपे असले तरी प्रत्यक्षात तसे होणे ते वाटते तितके सोपे नाही!

नामात रंगणे आणि समाधानी होणे म्हणजे वास्तविक पाहता; आत्मसाक्षात्कार होणे, कालातीत व अजरामर अश्या पूर्णत्वाला जाणे, परमेश्वराच्या वा सद्गुरुंच्या म्हणजेच आपल्या अंतरात्म्याच्या इच्छेशी आणि सत्तेशी समरस होणे; म्हणजेच मुक्त होणे होय!

एकवेळ कावीळ झालेल्याला स्वच्छ दिसणे सोपे, पण नामात रंगणे व समाधानी होणे हे आमच्यासारख्या देहबुद्धीने जखडलेल्यांना अशक्यप्राय आहे! पण तरीही गुरुकृपेने हे शक्य होते ह्याबद्दल मात्र मुळीच शंका वाटत नाही!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1216)  |  User Rating
Rate It


Aug09
जगाची सर्वश्रेष्ठ सेवा: डॉ. श्रीनिवास कशाळ
जगाची सर्वश्रेष्ठ सेवा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

“तुमचा स्वत:चा आत्मसाक्षात्कार हीच तुमच्याकडून होऊ शकणारी जगाची सर्वश्रेष्ठ सेवा होय” असे श्री. रमण महर्षि म्हणाल्याचे वाचनात आले. नक्की खरे की खोटे माहीत नाही.

पण जर हे खरे असेल, तर ते मनाला पटते. शंका वाटत नाही. कारण आत्मसाक्षात्कार हीच जीवनाची सर्वश्रेष्ठ उपलब्धी आहे असे अगदी मनापासून वाटते.

पण आत्मसाक्षात्कार हा आम्हाला फक्त ऐकून किंवा वाचून माहीत आहे. फार तर तहानलेल्याने जशी तहानेवरून पाण्याची कल्पना करावी तशी आम्ही त्याची कल्पना करू शकतो!
मग आम्ही काय करावे? जगाची सेवा कशी करावी?
आमचे सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांनी त्याचे उत्तर पूर्वीच दिले आहे. ते म्हणतात, "गुरुकडून घेतलेले नाम, पावन करील जगास, हा ठेवावा विश्वास, राम कृपा करील खास."
आम्ही नामस्मरण (आत्मसाक्षात्काराचे सर्वांना शक्य आणि सुलभ असे साधन) अंगिकारावे आणि स्वत:ला कळत जाणारे नामाचे विश्वकल्याणकारी महत्व इतरांना सांगत जावे.

श्रीराम समर्थ!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1175)  |  User Rating
Rate It


Aug07
नम्रता आणि लाचारी: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नम्रता आणि लाचारी: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

विद्यार्थी: सर, लोकांनी अपमान व छळ केला, शिव्या दिल्या किंवा अगदी मारझोड जरी केली तरी संत शांत राहिल्याची उदाहरणे आहेत. पण त्याचप्रमाणे भित्रे व लाचार लोक देखील अश्या प्रसंगी गप्प बसतात हे देखील खरे नाही का? मग, लीनता व नम्रपणा आणि भित्रेपणा व लाचारी यामध्ये काय फरक आहे?

शिक्षक: बाह्यत: दोन्ही सारखेच वाटतात हे खरे आहे. पण, अपमान आणि मृत्युला न घाबरता शांत असणे म्हणजे लीनता व नम्रपणा. याउलट, नुकसान, दुखापत, संकट किंवा मृत्यू यांचा धसका घेऊन अपमान व छळ गिळून गप्प बसणे म्हणजे भित्रेपणा व लाचारी.

विद्यार्थी: पण पुष्कळदा, अन्यायाच्या विरोधात काही न करता शांत राहणे असह्य होते! आपण भित्रे, लाचार आणि नामर्द बनल्याची भावना मनात येते. याला काय करावे?

शिक्षक: हे खरे आहे. आपण ना धड निर्भय असतो, ना आपण पूर्णपणे भित्रे व लाचार. खऱ्या निर्भय लोकांचा अहंकार ईश्वर चरणी लीन झालेला असतो. भित्र्या लोकांचा अहंकार, भीती आणि गरजा यामुळे खच्ची झालेला असतो. आपला अहंकार ना ईश्वरचरणी लीन झालेला असतो, ना भीती आणि गरजांपोटी पूर्णपणे खच्ची झालेला असतो. त्यामुळे आपली गुदमर होते, घुसमट होते, ओढाताण होते.

नामस्मरण करता करता कोणत्याही परिस्थितीच्या अंतरंगाशी किंवा मुळाशी जाण्याची व परिस्थितीचे यथार्थ स्वरूप कळण्याची व त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शांतता न भंगता योग्य निर्णय घेण्याची व कृती करण्याची क्षमता आपल्यामध्ये येते. अश्या निर्णयक्षमतेला आणि कृतीशीलतेलाच आपण लीनता व नम्रपणा म्हणतो.

अन्यायाच्या विरोधात भीतीच्या आहारी जाऊन शांत राहणे म्हणजे भित्रेपणा व लाचारी तर, भितीचेच दुसरे रूप असलेल्या रागाच्या आधीन होऊन अविचाराने स्वत:चा वा दुसऱ्याचा घात करणे हा अविवेक होय. लाचारी व अविवेक ह्या दोन्हीमुळे आपल्याला पश्चात्ताप करावा लागतो, तर लीनता व नम्रपणामुळे समाधान आणि कृतार्थता वाढतच जाते!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1294)  |  User Rating
Rate It


Aug07
नामस्मरणाची रीत: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामस्मरणाची रीत: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

विद्यार्थी: सर, एका जागी बसून नामस्मरण करणे अधिक श्रेयस्कर आहे का? असे नामस्मरण कसे वाढवता येईल?

शिक्षक: हा प्रश्न फारच छान आहे! माझ्या समजुतीप्रमाणे सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज आपल्याकडून आपल्या प्रकृतिधर्माला योग्य अश्या पद्धतीने, आणि प्रमाणात त्यांच्या इच्छेप्रमाणे नामस्मरण आणि त्याचा प्रसार करून घेतात. त्याचप्रमाणे नामात गोडी वाढवितात आणि तज्जन्य सद्बुद्धीद्वारे सुयोग्य कर्म (स्वधर्म) देखील करून घेतात.

त्यांच्या कृपेने आपल्या नामस्मरणात आणि स्वधर्मात निश्चित आणि सुयोग्य अशी प्रगती होत जाईल. आपण जमेल तेवढे आणि जमेल तसे नामस्मरण करत राहायचे!

विद्यार्थी: धन्यवाद सर! मला उत्तर मिळाले!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1206)  |  User Rating
Rate It


Aug07
वाहतूक अपघात: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
वाहतूक अपघात: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
तणावाचे जर नीट व्यवस्थापन केले नाही तर, आपल्या आतल्या आणि बाहेरच्या परिस्थितीवरील आपले नियंत्रण, एकवाक्यता, सुसंवाद, सुसंबद्धता; कमी कमी होत जातात. यामुळे आपले विचार, मन, अंतर्मन, वासना सदोष होत जातात आणि छोट्या वाहनांचे उत्पादन आणि विक्री बेसुमार वाढवणारी आणि बस, ट्रेन, जहाजे यांसारख्या वाहनांचे उत्पादन आणि विक्री फारच अपुरी करणारी धोरणे आपण राबवू लागतो.
यामुळे
१. शिस्तबध्द आणि सुयोग्य वाहतूक अशक्यप्राय होते. वेळेचा बेसुमार अपव्यय होतो.
२. इंधनाचा वापर आणि आयात खर्च वाढतो. इंधनाच्या दरवाढीमुळे महागाई वाढते.
३. रासायनिक प्रदूषण वाढते.
४. रस्त्यांची दुरावस्था अधिक प्रमाणात होते व रस्ते दुरुस्तीचा खर्च वाढतो.
५. ध्वनी प्रदूषण वाढते.
६. अपुऱ्या बसेस आणि ट्रेन्स वर अतिरिक्त ताण पडून; तिथे भांडणे, गुन्हे आणि अपघात वाढतात.
७. रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीमुळे चालकावरील तणाव वाढतो आणि ड्रायविंग अधिकाधिक सदोष होते.
८. यामुळे रस्त्यावरील अपघातात आणि गुन्ह्यांत भर पडतेच पण शिवाय, वैद्यकीय सेवा, अग्निशमन, कायदा व सुव्यवस्था वगैरे आपत्कालीन मदतकार्य पोचण्यात उशीर होतो.
९. अधिक वाहनांमुळे वाहन विमा, पंजीकरण, परिवहन व्यवस्था इत्यादी अनुत्पादक कामे आणि खर्च वाढतात.
१०. अधिक वाहने वाढल्यामुळे अविनाशी कचरा वाढतो!
११. रस्त्यांची गरज अधिक वाढल्यामुळे सिमेंट कोंक्रिटीकरण वाढते. झाडे व अनाच्छादित भूभाग कमी होतो. यामुळे पाणी जिरणे कमी होते. पाणी वाया जाते.
१२. पर्यावरण पोषक सायकली चालवणे कठीण होते.
१३. अश्या तऱ्हेने तणावातून जन्म घेणाऱ्या एका चुकीच्या धोरणातून केवळ वाहतूक अपघातच नव्हे, तर इतरही अनेक तणाव कारक समस्या तयार होतात.
नामस्मरणातून (आत्मज्ञानाच्या साधनेतून) तणावमुक्ती होऊ लागते आणि निस्वार्थी विचार, प्रेरणा, भावना, संकल्प, आस्था आणि दृढनिश्चय उगम पावतात. यामुळे आपल्याला अश्या परिस्थितीत; सर्वप्रथम आणि प्राधान्याने बसेस आणि ट्रेन्स सारख्या मोठ्या वाहनांचे उत्पादन आणि विक्री यांचे प्रमाण आणि गुणवत्ता वाढविण्याची आणि छोट्या वाहनांचे उत्पादन आणि विक्री कमी करण्याची धोरणे राबवण्याची सुबुध्दी होते आणि क्षमता येते.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1227)  |  User Rating
Rate It


Aug07
अखंड नामस्मरण महात्म्य डॉ. श्रीनिवास कशाळ
अखंड नामस्मरण महात्म्य डॉ. श्रीनिवास कशाळीकर
• अखंड नामस्मरण म्हणजे अमृतत्व; नामविस्मरण हा निर्जीवपणा
• अखंड नामस्मरण हेच पूर्णत्व; नामविस्मरण हे अपूर्णत्व
• अखंड नामस्मरण म्हणजे एकात्मता; नामविस्मरण हे विघटन
• अखंड नामस्मरण म्हणजे प्रगती; नामविस्मरण म्हणजे अधोगती
• अखंड नामस्मरण म्हणजे रोगप्रतिबंध, रोगमुक्ती आणि पुनर्वसन; नामविस्मरण म्हणजे अनिवार रोगटपणा
• नामस्मरण म्हणजे भ्रमातून विरक्ती व ईश्वर, सद्गुरू, नाम म्हणजेच अंतरात्म्याच्या सर्वकष इच्छेशी व सत्तेशी (सत्याशी) तादात्म्य; नामविस्मरण म्हणजे म्हणजे ईश्वर, सद्गुरू, नाम म्हणजेच अंतरात्म्याच्या सर्वंकष इच्छेशी व सत्तेशी (सत्याशी) प्रतारणा व भ्रमाशी तादात्म्य
• अखंड नामस्मरण हेच स्वातंत्र्य; नामविस्मरण ही गुलामी
• अखंड नामस्मरण म्हणजे सर्वश्रेष्ठ सत्कर्मरत असणे; नामविस्मरण म्हणजे सर्वश्रेष्ठ सत्कर्मभ्रष्ट असणे
• अखंड नामस्मरण म्हणजे सर्व अंतर्बाह्य विश्वाच्या अजरामर गाभ्याशी समरस होणे; नामविस्मरण म्हणजे सर्व अंतर्बाह्य विश्वाच्या नाशिवंत बाह्यांगाशी समरस होणे
• अखंड नामस्मरण म्हणजे कालातीत पूर्णत्वातील स्वस्थता; नामविस्मरण म्हणजे कालाधीन अपूर्णत्वातील अस्वस्थता


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1247)  |  User Rating
Rate It


Aug06
ROAD ACCIDENTS: DR. SHRINIWAS KASHALIKAR
ROAD ACCIDENTS: DR. SHRINIWAS KASHALIKAR

Stress if not managed properly leads to defects in regulation, control, coordination, harmony, efficiency inside and outside us and leads to hundreds of psychological, neurological, endocrine and metabolic disturbances; and leads to defects in the policies; which are responsible for excessive production and marketing of small vehicles of individual use and severe shortage of vehicles of mass transport (buses, trams, trains, ships etc).
This leads to increase in
1. Difficulty in disciplined and efficient vehicular movement
2. Fuel consumption, chemical pollution, import expenses, fuel prices and food prices!
3. Wear and tear of roads, maintenance expenses
4. Noise pollution
5. Load on meager number of local trains and other means of public transport [where ever available] and consequent accidents, quarrels and mishaps
6. Stress leading to defective driving behavior
7. The number and severity of accidents, difficulty in providing medical aid (and disaster management) due to difficulty in movement of ambulances and fire fighters.
8. Unproductive and wasteful work; such as insurance, registration and traffic policing!
9. Road crimes such as thefts due to difficulty in enforcing law and order because of slowing of police movement
10. Undegradable solid waste.
11. Area of concretization (at the cost of irreplaceable trees extremely important for avoiding global warming, pollution, rain and organic manure and open earth surface vital for absorbing and holding rain water) and disruption of natural habitat of the animals.
12. Difficulty for use of eco-friendly bicycles.
Thus, one wrong policy, due to mismanaged stress, multiplies stress in several ways besides increasing road accidents.

Selfless thinking, motivation, urge and determination emerging from involvement in NAMASMARAN empowers us to conceive and implement the immediate and most important solution (besides others) viz. the policy of quantitative and qualitative improvement of public (mass) transport and restriction of the number of small vehicles of individual use!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1262)  |  User Rating
Rate It


Browse Archive