World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Jul22
नामाचा प्रसार कश्यासाठी?: डॉ. श्रीनिवास जना&#
श्रीराम समर्थ

नामाचा प्रसार कश्यासाठी?: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

नामस्मरण करणे हे सर्वश्रेष्ठ धेय आहे; असे ठरले तरी 24 तास नामस्मरण होणे अति कठीण!! मन विचलित होते आणि होत राहते!!

असे का होते? आणि असे न होण्यासाठी काय करावे? नामस्मरणात गोडी येण्यासाठी काय करावे?

आत्मपरीक्षण केले तर असे आढळते की; व्यक्ती म्हणून आपण अगदीच नगण्य असतो. आपली शारीरिक, मानसिक, बोद्धिक वा एकूणच शक्ती क्षुद्र असते. आपण अशक्त, असहाय आणिं परावलम्बी असतो. शिवाय; आपण दोशपूर्ण देखील असतो. पण तरीही आपण अनाठायी आणि अज्ञानजन्य अहंकाराने फुगून; द्वेष, मत्सर, घृणा आणि कलहात बरबाद होत असतो! भोगवस्तू, पार्ट्या आणि आपला अहंकार फुगेल असे सर्वकाही देण्याघेण्यात; आणि करण्यात वेळ घालवायला, पैसा उधळायला; आणि प्रसंगी अपमान आणि हाल देखील सोसायला; आपल्याला काही वाटत नाही. पण नामस्मरणाच्यासाठी आणि विशेशत: नामाच्या प्रसारासाठी मात्र; पैसा, वेळ, शक्ति, यातील काहीच खर्च करण्याची किंवा लोकापवाद, अपमान, त्रास, कष्ट यातील काहीच सहन करण्याची आपली तयारी नसते!!!

कारण वासनेचा जोर जबरदस्त आहे. वासनेची ओढ तीव्र आहे. वासना फसवी आहे. आपण नकळत तिच्या आधींन होतो. तिच्या आहारी जातो! केवळ जगण्यासाठी , नव्हे; तर पैसा, घर, नोकरी, प्रमोशन, सत्ता, चैन; अश्या असंख्य बाबींसाठी आपण लाचार होतो. आतुर होतो. तळमळतो. असहाय्य होतो!! पण नामस्मराणाची ओढ तशी तीव्र आणि बलवान नसल्यामुळे; नामस्मरणाच्यासाठी; आणि विशेशत: नामाच्या प्रसारासाठी; पैसा, वेळ, शक्ति, यातील काहीच खर्च करण्याची किंवा लोकापवाद, अपमान, त्रास, कष्ट; यातील काहीच सहन करण्याची आपली तयारी नसते.

हे आपल्यासाठी जसे खरे आहे; तसेच इतरांसाठीही खरे आहे.

त्यामुळे नामाच्या बाबतीत समाजामध्ये किंवा आपल्या घरामध्ये आपल्याइतकी देखील आस्था, तळमळ, आवड, गोडी नसली तर त्यात आश्चर्य नाही! त्याना दोष देणे योग्य नाही! त्याच्याबाबत निराश होणे बरोबर नाही! कारण अश्या निराशेतून; "फुकट मिळालेल्या किंवा फुकट दिलेल्या वस्तुला किंमत नसते", "त्याना काय कळणार?", "समाज स्वार्थाने बरबटलेला आहे", "कलियुग आहे", "आपण आपल्यापुरते पाहावे" अश्या लॅंगड्या सबबी मनात येतात! (स्वत:चे क्षुद्र स्वार्थ साधताना मात्र अश्या लॅंगड्या सबबी मनात येत नाहीत!)

अश्या तर्हेने संकुचित बनून आपल्या अवती भवतीचे वातावरण; आपल्याला नामात गोडी यायला पोषक होईल का? आपले नामातले प्रेम वाढेल का? निष्ठा वाढेल का?

म्हणून अश्या सबबी नामस्मरणाच्या सीडीज किंवा/आणि पुस्तके; रुग्ण, विद्यार्थी, कर्मचारी, सहकारी आणि जिव्हाळ्याच्या व्यक्तीना भेट देण्याच्या; आणि तज्जन्य समाधानाच्या आड येऊ देऊ नये; हे खरे नाही का?

नामाचा प्रसार करण्याचा अध्यात्मिक अधिकार नसला तरी; नामस्मरणापासून मन सतत विचलित होऊ नये यासाठी आणि नामस्मरणात रंगून जाता यावे; यासाठी देह, घर, कुटुंब, व्यवसायाची जागा आणि एकंदर समाज यामध्ये पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणे आणि यासाठी; काहीही झाले तरी; अगदी; "याला नामाचे वेड लागले" असा लोकापवाद झाला तरी; नामाचा प्रसार करणे अत्यावश्यक नाही का?

जगातले बहुसन्ख्य लोक नामस्मरण करू लागणे; आणि प्रेमाची, परिपक्वतेची आणि परिपूर्णतेची जी अनंत प्रक्रिया आहे तिच्यामध्ये सहभागी होणे ही बाब आपल्या स्वत:च्या नामस्मरणाशी आणि नामाच्या गोडीशी अविभाज्यापणे सलग्न नाही का?


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (2625)  |  User Rating
Rate It


Browse Archive