World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Aug22
चैतन्ययोग (नामस्मरणाबद्दल जिज्ञासा वाढत ç
चैतन्ययोग (नामस्मरणाबद्दल जिज्ञासा वाढत आहे?) : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्याविषयी जगभर कुतुहूल वाढते आहे हे मला माहीत होते. पण नामस्मरणाबद्दल देखील कुतुहूल आणि जिज्ञासा वाढत आहे?

शिक्षक: होय! नक्कीच! जगभर नामस्मरण पहायला मिळते. कुणी जपमाळ घेऊन तर कुणी माळेशिवाय नामस्मरण करतो आहे. कुणी एका जागी बसून तर कुणी फिरत फिरत नामस्मरण करतो आहे. कुणी मोठ्ठ्याने उच्चार करून तर कुणी मनातल्या मनात, कुणी डोळे मिटून तर कुणी डोळे उघडे ठेवून, कुणी श्वासोच्छवासावर तर कुणी उत्स्फूर्त भावनेने आणि आर्ततेने नामस्मरण करतो आहे. कुणी घरी तर कुणी ऑफिसमध्ये, कुणी देवळात तर कुणी शाळेत, कुणी फॅक्टरीत तर कुणी रुग्णालयात; आणि कुणी दुकानात तर कुणी शेतात नामस्मरण करीत आहे!
प्रत्येक स्तरातला आणि वयातला, आणि प्रत्येक धंद्यातला आणि नोकरीतला माणूस; या ना त्या कारणास्तव नामस्मरणाकडे वळत आहे आणि त्यात मुरत आहे!
रेड़िओ-दूरदर्शनवर नामस्मरणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात प्रसारित होऊ लागले आहेत. नामस्मरणाची महती गाणारी गीते, पदे, कविता, भजने वारंवार वेगवेगळ्या उत्सवांतून आणि समारंभांतून ऐकू येऊ लागली आहेत. देशविदेशांतून कीर्तनकार, रामकथाकार, भागवत कथाकार यांना मागणी वाढत आहे. वेगवेगळ्या दूरदर्शन मालिकांमधून नामस्मरणाचे गोडवे गायिले जात आहेत.
विशेष म्हणजे निर्हेतुक वृत्तीने आणि निष्काम भावनेने नामस्मरण केले असता; सर्वंकष वैयक्तिक आणि सामाजिक कल्याण कसे साध्य होते याचे विवरण करणारी पुस्तके, सीडीज, व्हिडीओ सीडीज मोफत वितरण केली जाऊ लागली आहेत आणि इंटरनेटवर मोफत डाऊन लोड साठी उपलब्ध केली जाऊ लागली आहेत. विशेष म्हणजे एरवी दुर्लक्षित राहणारी अशी ही पुस्तके लोक मोठ्ठ्या उत्सुकतेने आणि आस्थेने वाचत आहेत आणि सीडीज व व्हिडीओ सीडीज ऐकत आणि बघत आहेत!
नामस्मरण ही उतार वयात गलितगात्र झाल्यानंतर करण्याची किंवा रिकाम्या वेळात करण्याची, निरुपयोगी, निरुपद्रवी, दुर्लक्षित आणि कोपऱ्याताली बाब राहिलेली नाही. नाम आणि नामस्मरण ही जीवनाच्या नियंत्रक केंद्रस्थानी असल्याची जाणीव प्रकर्षाने होताना दिसत आहे. साहजिकच नामस्मरणाला सर्वाधिक महत्व आणि सर्वोच्च प्राधान्य आले आहे. जगभर नामस्मरणाचा अंत:करणपूर्वक स्वीकार, प्रसार आणि जयजयकार होत असून आपल्या सर्वांच्या वैयक्तिक आणि सामुहिक जीवनाची गाडी हजारो वर्षांच्या आणि हजारो लोकांच्या जन्मोजन्मीच्या पुण्याईने आज खऱ्या अर्थाने रुळावर येत आहे! ह्या सर्वंकष कल्याणालाच आपण चैतन्ययोग म्हणतो.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1474)  |  User Rating
Rate It


Browse Archive