World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Jul22
समाधान आणि नामस्मरण: डॉ.श्रीनिवास कशाळीकर
समाधान आणि नामस्मरण: डॉ.श्रीनिवास कशाळीकर

षड्रिपु म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर. हे आपले अविभाज्य अंग आहेत! पण तेच आपल्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या अस्वस्थतेला, असहाय्यतेला आणि खिन्नतेला कारणीभूत होतात हे सत्य आहे!

शरीरक्रियाशास्त्रीय दृष्ट्या पाहिल्यास षड्रिपु नसणे शक्य नाही. पण म्हणून षड्रिपु त्याज्य आहेत असे मानून आपण त्यांच्या पासून मुक्त होऊ शकत नाही. पण हे देखील खरे की काळात-नकळत आयुष्यभर त्यांच्या मागे लागून; आपण, आपले कुटुंब आणि समाज तृप्त देखील होत नाही! समाधानी होत नाही!

असे का होते?

कारण षड्रिपुंची पूर्ती दिशाहीन अग्नीप्रमाणे असते! ज्याप्रमाणे दिशाहीन अग्नीने स्वयंपाक शिजत नाही, त्याप्रमाणे षड्रिपूंच्या पुर्तीची धग अंतर्मनापर्यंत आणि अंतरात्म्यापर्यंत पोचत नाही!

जीवनातील सर्व सुख दु:ख्खाना नामस्मरणाच्या चुलीद्वारे दिशा मिळाली तरच त्यांची धग अनंतरात्म्यापर्यंत पोचू लागते आणि आपले, आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे समाधान होऊ लागते!

म्हणूनच सर्वंकष समाधान मिळवायचे असेल तर जीवनामध्ये नामस्मरणाची तीव्र गरज आहे! अर्थात ह्याचा अनुभव नामस्मरणानेच येऊ शकेल. केवळ विचाराने, वाचनाने किंवा अन्य कोणत्याही मार्गाने नाही!

श्रीराम समर्थ!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (5717)  |  User Rating
Rate It


Browse Archive