World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Aug22
चैतन्याची हाक : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळी&#
चैतन्याची हाक : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्यामध्ये जमीन, पाणी, वीज, शौचकूप, स्नानगृहे इत्यादी अनेक सोयी सरकारी पैशातून म्हणजेच कर भरणाऱ्या जनतेच्या पैशातून पुरविल्या जातात. हीच बाब इतर यात्रांच्या आणि सार्वजनिक उत्सवांच्या बाबतीत देखील खरी आहे. धर्माचे रक्षण करण्यासाठी हे सर्व लागते का?

शिक्षक:. तमोगुण आणि रजोगुण वाढल्यामुळे वेड, वासना, आवडी, छंद, लहरी, फॅशन्स, व्यसने, विकृती; अशा बाबींसाठी अब्जावधी रुपये खर्च होत आहेत. संकुचित स्वार्थापायी फसवणे आणि फसले जाणे; हे सार्वत्रिक झाले आहे. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब कुंभ मेळ्यात देखील पडते आहे.

जोपर्यंत नामस्मरण सर्वत्र पसरत नाही आणि झिरपत नाही, तोपर्यंत कुंभ मेळ्यामध्ये देखील आत्मसाक्षात्कारी निस्पृह संत महंत फार मोठ्ठ्या प्रमाणात सापडणे कठीण आहे. किंबहुना तोपर्यंत; कुंभ मेळ्यामध्ये देखील थकले-भागलेले, चुकले-माकलेले, गोर-गरीब, रंजले-गांजलेले, पोटासाठी वणवण करणारे लोकच जास्त आढळणे साहजिकच आहे.

ज्या अजरामर आंतरिक चैतन्याची हाक (Inner Voice) आपल्याला ऐकू येत नाही आणि ज्याच्यापासून तुटल्यामुळे आपण अचेतन आणि मरतुकडे बनलो आहोत, त्या अनादी, अनंत, सर्वव्यापी तसेच सर्वांच्या अंतर्यामी आणि बाहेर असलेल्या सच्चिदानंद “वस्तु”ला ओळखणे, समजणे, आठवणे आणि हळु हळु त्या “वस्तु”शी तद्रुप होणे; हा सर्व कुंभ मेळ्यातील आणि त्याच्या बाहेरील सर्वच दुरवस्थेवरील इलाज आहे. ह्या अनादी अनंत सच्चिदानंद वस्तूला ओळखण्याचे, समजण्याचे, आठवण्याचे आणि हळू हळू त्या वस्तुरूप होण्याचे अनादी साधन; ह्या वस्तूच्या नावाचे म्हणजेच नामाचे स्मरण म्हणजे नामस्मरण आहे.

विद्यार्थी: तुमच्या मते; नामस्मरणाच्याद्वारे वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवरील इतर विकृती ज्या प्रमाणात कमी होत जातील; त्या प्रमाणात कुंभ मेळ्यांचे स्वरूप देखील अधिक पवित्र आणि निरुपद्रवी होईल यात शंका नाही?

शिक्षक: होय. मला निश्चितपणे तसे वाटते.

विद्यार्थी: हे तुमचे भाकीत आहे?

शिक्षक: ही आपल्या सर्वांच्या अंतर्यामी राहून सदैव आपली काळजी घेणाऱ्या नामरूप चैतन्याची म्हणजेच आपल्या सर्वांच्या गुरूदेवांची कृपा आहे! प्रत्येकाच्या गुरुचे व्यावहारिक नाव गाव वेगवेगळे असले तरी प्रत्येकाच्या हृदयात जो नामरूप गुरु असतोच, त्याच्याच कृपेने आपल्या सर्वांना; नामस्मरणाच्या द्वारे होणारी चैतन्यप्रभात आणि स्वधर्म सूर्याचा उदय आणि त्यांचा कल्याणकारी प्रभाव यांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1435)  |  User Rating
Rate It


Browse Archive