World's first medical networking and resource portal

Articles
Category : All ; Cycle : September 2015
Medical Articles
Sep27
Contraception- Myths and Misconceptions
Today 26th september is the world contraceptive day. Sex is a basic human right. But to have sex safely and without fear of unwanted pregnancy should be the priority. Many women across the world die everyday as a result of unwanted pregnancy, mostly due to unsafe abortion.

So, couples can avoid pregnancy and enjoy sex life fully, only if they can follow safe and effective contraceptive advice. Let me clarify some popular myths and misconceptions abut contraception.

1. one contraception is useful for all

While the ideal contraceptive is necessary but it does not exist. So, what may seem suitable for a couple may not be useful for another couple. We need to assess various points like number of children they have, wish to have further children and plan to have children, general health of wife and husband (and any diseases they suffer from), frequency of intercourse, chance of infection, age of the partners etc.

2. Regarding barrier methods
Most popular barrier method is male condom. But the myths are that" condoms reduce sexual pleasure" and" condoms get easily damaged leading to failure.

Condoms are specially useful for those who are at risk of infections, who do not have very frequent intercourse and who are not suitable for other methods. Condoms do not decrease sexual pleasure, some of the condoms have medicated products which can increase the duration of intercourse and also act as lubricant to facilitate intimacy.

But men should know how to use it properly. It should be worn in erect penis expelling all the air and projecting the tip beyond the tip of penis. While withdrawing penis after intercourse, the condom should be held at the base of the penis. Actually failure/ rupture of condoms occur because of mishandling of condom or not knowing proper use of it. So, before use, please make sure that you know its correct use.

Definitely some men can feel latex allergy and they have to use non-latex condom, which are widely available.

There are barrier methods for females also- like female condom, diaphragm and cervical cap etc. But they are not very ease to use and are not so popular.

3. Oral contraceptive pills (ocp)

Myths-" ocp causes increase in weight" ocp causes cancers.

Facts- ocp seldom causes gain in weight. The gain in weight is coincidental, that means you have some other reason of gaining weight- like not having exercise, ignoring diet control and some other diseases.

Ocp rather reduces risk of cancer- especially ovarian cancer (which is very difficult to diagnose and very lethal), cancer of colon, cancer of endometrium (inner lining of uterus). Of course, there is little risk of breast cancer, but the risk is not very high, it can be easily detected by examination by doctor. So, if you take ocp, get rid of all the fears. Just try to have self- breast examination every month.

4. Intrauterine contraceptive devices (iucd)-

Most popular is copper t. Medicated iucds are also available, that contains hormonal drugs.

Copper t does not increase risk of infection, a common misconception lies among woman.

5. Emergency contraceptive pills (i pill etc).

Often couple uses these pills regularly after intercourse. Remember these pills contain very high content of hormonal drugs, which can lead to serious side effects like hormonal imbalance, irregularities in periods (and thus can prevent you from getting pregnant in future, even when you want pregnancy), ectopic pregnancy (pregnancy outside tubes that are life-threatening) etc. So, use regular contraception if you want to prevent pregnancy. I pill is not meant to be taken for every time of sex.

6. Ligation-

Ligation of male (vasectomy) and female (tubectomy) is done as permanent contraception for couples having more than 2 children. Ligation in male does not disturb sexual activity. It is easier than female ligation. Again, female ligation is also a very safe technique.

So, please remove all misconceptions and myths about contraception. Have safe sex, enjoy life.


Category (Sexuality & Venereal Disorders)  |   Views (7743)  |  User Rating
Rate It


Sep23
लोकापवाद किंवा लोकप्रियता: डॉ. श्रीनिवास ज
लोकापवाद किंवा लोकप्रियता: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्याविषयी बोलताना; नामस्मरणात केलेले कार्य सत्कारणी लागते आणि नामविस्मरणात केलेले वाया जाते; असे आपण म्हणालात. पण पुष्कळदा सामान्य माणसे यासंदर्भातील सरकारी धोरणांच्यावर आपापली मते प्रदर्शित करतात, टीका-टिप्पणी करतात. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?

शिक्षक: आपण सर्वच जण सामान्य आहोत. आपल्याला कोणत्याही गोष्टीची थोडीफार जरी झळ लागली तरी आपण तक्रार करतो आणि थोडासा जरी फायदा झाला तरी सरकारचा उदो-उदो करतो. आपली मुले-बाळे, आपले आप्त-स्वकीय, आपले मान-अपमान, आपला फायदा-तोटा; ह्यांभोवती आपली मते फिरतात. त्यामुळे; आपणा सर्वांना लोकशाही कितीही श्रेष्ठ वाटत असली तरी; आपण व्यक्त केलेली प्रत्येक टीका-टिपण्णी आणि व्यक्त केलेले प्रत्येक मत विचारात घ्यायच्या लायकीचे असतेच असे नाही, हे इतरांप्रमाणेच आपल्याला देखील पक्के माहीत असते.

विद्यार्थी: याचा अर्थ; सामान्यांची मते लक्षात घेतली जाऊ नयेत असा घ्यायचा का?

शिक्षक: सामान्यांची मते नक्कीच लक्षात घेतली जायला हवीत. पण त्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने; त्यांच्या मतांना किती महत्व द्यायचे हे नामस्मरण करणाऱ्या शासकांना बरोबर कळते. ते लोकापवाद किंवा लोकप्रियता यांनी दबून वा बहकून जात नाहीत. लोकप्रतारणा करीत नाहीत आणि लोकानुनय देखील करीत नाहीत. कारण; नामस्मरणाद्वारे; चित्त शुद्ध होत चाललेले वा झालेले शासक; जेव्हां एखादे धोरण आंखतात, एखादा विचार करतात, एखादा संकल्प करतात, एखादी योजना आखतात, किंवा एखाद्या योजनेची अंमलबजावणी करतात, तेव्हां ते सारे नि:स्वार्थ भावनेतून, भेदभाव रहित वृत्तीतून होत असते. ते सारे थेट गुरुमार्फत, विश्वचैतन्याच्या जननीमार्फत वा ईश्वरामार्फत घडत असते. त्यामुळे ते चैतन्याकडे वा ईश्वराकडे नेणारे असते. आणि म्हणून ते विश्वकल्याणाचेच असते. जेव्हा असे लोक; शस्त्रसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता, आरोग्यसत्ता, उद्योगसत्ता, शिक्षणसत्ता अशा सर्व सत्तास्थानी येतात आणि राज्य करतात, तेव्हां त्या राज्यालाच रामराज्य म्हणतात.
कुंभ मेळाच नव्हे तर इतर यात्रा व उत्सवांबद्दल निस्वार्थपणे टीका-टिप्पणी करण्यासाठी व लोकशाही खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी आणि बळकट करण्यासाठी, आपल्यासारख्या सामान्य लोकांचे विचार देखील नामस्मरणाच्या योगाने; संकुचित कोशातून बाहेर आले पाहिजेत. अशा तऱ्हेने आपण निस्वार्थी आणि विशाल बनलो तरच; चांगल्या नेतृत्वाला समजून घेऊन बळ देऊ शकू किंवा स्वत: चांगले नेते बनू शकू!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (7310)  |  User Rating
Rate It


Sep21
गुरुची अद्भुत शक्ती!: डॉ. श्रीनिवास जनार्दन &
गुरुची अद्भुत शक्ती!: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्यामध्ये आपल्याला अचंबित करणाऱ्या, थक्क करणाऱ्या गोष्टी दिसतात आणि आपले मन अद्भुत रसाने भरले जाते. आपली मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे देखील विस्मयकारक असतात! महान विभूतींचे जीवन देखील अद्भुत असते! ह्यातले बरेच काही; आपल्या तर्कशास्त्रामध्ये किंवा आपल्या मूल्यव्यवस्थेमध्ये बसत नाही. तरीपण; प्राचीन रूढी, परंपरा, मन्दिरे आणि तीर्थक्षेत्रे; ह्यांच्याबद्दल आपल्याला आपल्या मनांत विलक्षण आकर्षण, कुतुहूल आणि आस्था असल्यामुळेच टिकून आहेत का?

शिक्षक: होय. ह्या सर्व बाबी आस्थेमुळेच टिकून राहिल्या आहेत आणि त्या नामस्मरणाला पोषक होण्यासाठीच आहेत यात शंका नाही.

रूढी आणि परंपरांप्रमाणेच खुद्द नामस्मरणाचे देखील आहे. नामस्मरण करता करता आपल्याला एकदम अमृतत्वाचा साक्षात्कार झाला असे होत नाही. आपल्याला टप्प्या-टप्प्यानेच पुढे जाता येते आणि ह्या टप्प्यांवर घडणाऱ्या अनेक चित्रविचित्र, चमत्कारिक, हृदयस्पर्शी आणि भारावून टाकणाऱ्या मनोवेधक घटनांमुळेच; आपले नामस्मरण टिकून राहते. कारण ह्या बाबी; नामस्मरणाची गोडी वाढवतात आणि आपल्याला नामस्मरणात गुंतवून ठेवतात!

विद्यार्थी: नामस्मरणाद्वारे अंतीम सत्याचा आणि अमरत्वाचा अनुभव लगेच येत नाही आणि तो कुणाला आणि केव्हा येईल, हे सांगता देखील येत नाही. त्याचप्रमाणे नामस्मरणाने समृद्धी देखील येतेच असेही नाही. त्यामुळे नामस्मरण करताना सामान्यांच्या विशेषत: गोरगरीबांच्या चिकाटीची कसोटी लागते, आणि त्याचा धीर सुटू शकतो ना?

शिक्षक: होय. खरे आहे. पण गोर गरीबच नव्हे तर आपण सारे; पुन्हा पुन्हा चैतन्याच्या विस्मृतीत जातो आणि त्यामुळे; विषयांकडे आकर्षित होत राहतो, त्यांच्या भूलभूलैय्यात अडकत राहतो, हरवत राहतो आणि चैतन्याला पारखे होतो. इंद्रियगम्य स्थूल विषय आणि दृश्य विश्वाच्या आकर्षणाचा जोर इतका जबरदस्त असतो की आपली धाव आपोआप चैतन्याच्या विरुद्ध दिशेला वळते! साहजिकच आपण भलतीकडेच भरकटत जातो! परिणामी; आपली अस्वस्थता काही केल्या कमी होत नाही आणि पूर्णत्व, सार्थकता आणि समाधान आपल्यापासून दूरच राहतात!

पण; काळजी करण्याचे कारण नाही. आपल्या इच्छे-अनिच्छेपलिकडे; विश्वचैतन्याची जननी आपल्याला चैतन्यामृतपान करवीत आहे. आपल्यामध्ये नवचेतना भरत आहे. आपल्याकडून नामस्मरण आणि स्वधर्मपालन करवीत आहे. सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार यांनी आपले व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन भरून टाकीत आहे. ह्यावर विश्वास ठेवू नये; तर; नामस्मरण करता करता स्वत: त्याचा अनुभव घ्यावा!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (7385)  |  User Rating
Rate It


Sep21
नामस्मरण आणि आपले कल्याण: डॉ. श्रीनिवास कशा&#
नामस्मरण आणि आपले कल्याण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

विद्यार्थी: काहीजण असे म्हणतात की कुंभ मेळ्यातील साधुंनी फक्त अध्यात्माबद्दल बोलावे. त्यांनी राजकारणाबदल बोलू नये. तुम्हाला काय वाटते?

शिक्षक: अध्यात्म ह्यांचा अर्थ स्वभाव. भगवद्गीतेच्या आठव्या अध्यातात स्पष्टपणे ही व्याख्या दिलेली आहे. अध्यात्म हा इतिहास, भूगोल यासारखा विषय एक विषय नाही. अध्यात्म हा संपूर्ण अस्तित्वाचा मूळ स्वभाव आहे.

अध्यात्मिक होणे म्हणजे तो मूळ स्वभाव जाणणे, स्मरणे आणि तद्रूप होणे आहे. खरे पाहता; गर्भावस्थेत आल्यापासून आपल्या शरीरात आणि आपल्या मनात जे जे म्हणून काही घडते ते ते सारे; खरे पाहता आपल्यामधील चैतन्यतृष्णेपायी, चैतन्यामृतपानासाठी आणि चैतन्यमय होण्यासाठी घडत असते! म्हणजे आपण सर्वच जण मूलत: अध्यात्मिकच असतो.
पण एकीकडे आपल्याला कशाची तृष्णा आहे हे आपल्याला कळत नाही आणि दुसरीकडे; आपला मूळ स्वभाव, आपल्या अंतर्बाह्य बरसणारे चैतन्य आपल्याला ओळखता येत नाही. हे चैतन्य अदृश्य असते. ते आपल्याला दिसत नाही. ते अश्राव्य असते. त्याची चाहूल लागत नाही. थोडक्यात; ते इंद्रियातीत असते. कर्मेंद्रियांच्या आणि ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे; म्हणजेच जाणीवेच्या पलीकडे असते. बुद्धीच्या आवाक्याच्या पलीकडे असते. ह्यातच भर म्हणून की काय; ह्या चैतन्याची विस्मृती झाल्यामुळे ते समीप असूनही दूरच राहते!

पण असे असले तरी त्या चैतन्याची जननी आपल्यावर पांखर घालण्याचे आपले काम करीतच असते. ती आपली पाठ सोडीत नाही! त्यामुळे चैतन्याचा “चुंबकीय” प्रभाव आपल्यावर पडतच असतो. त्याची अनाकलनीय अशी ओढ आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. ही कोणती ओढ आहे हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे गीतेच्या सातव्या अध्यायात तिसऱ्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे हजारो लोकांमध्ये एखादाच अध्यात्माच्या शोधात धडपडतो. आणि अशा हजारो धडपडणाऱ्या लोकांमध्ये एखादाच खरा खुरा अध्यात्मिक होतो. पण बाकीचे धडपडणारे धडपडत असतात. त्या धडपडणाऱ्यांचे बाह्य रूप सामान्यांपेक्षा वेगळे असते. ह्या खास वेगळ्या बाह्य स्वरूपामुळे बऱ्याच जणांना असे वाटते की अध्यात्म हा आपल्या रोजच्या जीवनापासून वेगळा असा प्रांत आहे, वेगळे प्रावीण्य आहे. ह्या बाह्य अंगाने साधु असणाऱ्या लोकांना जीवनाच्या सर्व अंगांबद्दल मतप्रदर्शन करण्याची कुवत नसतेच.

परंतु, परिपूर्ण अध्यात्मिक व्यक्तीला जीवनाच्या सर्व अंगांबद्दल मतप्रदर्शन, मार्गदर्शन आणि नेतृत्व करण्याचा निश्चित अधिकार आहे. स्थितप्रज्ञ व्यक्तींच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली जगाचे कल्याण होईल यात तीळमात्र शंका नाही


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (7283)  |  User Rating
Rate It


Sep21
नाम हे अमृत: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
नाम हे अमृत: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: आमच्यासारख्या लाखो लोकांना नामात गोडी लागेपर्यंत आनंददायक आणि उत्साहवर्धक अशा कुंभमेळ्याचा आणि इतर अनेक रूढी परंपरांचा उपयोग आहे हे खरेच आहे!

शिक्षक: निश्चित! चैतन्यविस्मृतीच्या अंध:कारातून, गदारोळातून आणि तणावातून मुक्त होण्यासाठी चैतन्य स्मृती हेच उत्तर आहे ह्याची जाणीव अधिकाधिक प्रकर्षाने होत असल्याने कुंभ मेळ्यासारख्या सर्व प्रथांमध्ये देखील अंतरात्म्याचे स्मरण अर्थात नामस्मरण हे प्रधान कर्म बनत आहे. नामस्मरणाला कुणी जप, म्हणतो तर कुणी जाप, कुणी सुमिरन म्हणतो तर कुणी सिमरन, कुणी जिक्र म्हणतो तर कुणी अंतरात्म्याचे स्मरण. पण मथितार्थ एकच!
आनंदाची बाब अशी की; चैतन्यविस्मृतीच्या गडद अंध:काराचा अंत होऊन चैतन्याचा प्रकाश जगभर पसरू लागला आहे!

केवळ भारतच नव्हे तर चीन, पाकिस्तान, बांगला देश वगैरे इतर आशियाई देशात आणि आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका आदि सर्व खंडांमध्ये घराघरातून नामस्मरणाविषयी कुतुहूल आणि जागृती वाढताना दिसते आहे. मालक, संचालक आणि व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना, शिक्षक विद्यार्थ्याना, डॉक्टर रुग्णांना, प्रसिद्ध व्यक्ती त्यांच्या चाहत्यांना आणि नेते अनुयायांना; नामस्मरणाचे महत्व खऱ्या तळमळीने सांगू लागले आहेत. पालक त्यांच्या मुलांना अगदी मनापासून नामस्मरण करायला शिकवू लागले आहेत. आपआपल्या धर्मानुसार आणि परंपरेनुसार नामस्मरण करण्याची जणू काही एक प्रचंड आणि विश्वव्यापी त्सुनामी लाट आली आहे. विश्वचैतन्याचा अनुभव घेणे आणि तो इतरांना सांगणे ही आस्थेची, नित्याची आणि सार्वत्रिक बाब झाली आहे.

मंदिरामंदिरामधून नामजपाचे सप्ताह आणि अनुष्ठाने होऊ लागली आहेत. नामसाधना कशी करावी ह्याचे मार्गदर्शन करणारी नामसाधना शिबिरे होऊ लागली आहेत. केवळ धार्मिक ठिकाणी आणि अध्यात्मिक संस्थांमध्येच नव्हे तर वेगवेगळ्या कंपन्या, कारखाने, दवाखाने, दुकाने, प्रयोगशाळा, अंगणवाड्या, बालवाड्या, आश्रमशाळा, विद्यालये, महाविद्यालये, रुग्णालये, दवाखाने, सरकारी कार्यालये इत्यादी सर्वच ठिकाणी नामस्मरणाचा दिव्य प्रकाश पसरताना दिसत आहे. पोलीसांच्या चौक्यांमधून आणि सैनिकी संस्थांमधून देखील नामस्मरणाची संजीवनी आपले संजीवक काम करताना दिसत आहे.

शेतकरी, कष्टकरी, तंत्रज्ञ, कारागीर, क्रीडापटू, कलाकार, बुद्धीजीवी, व्यवस्थापक, शासनकर्ते, सत्ताधारी असे; सर्वच जण नामस्मरणाकडे आकर्षित होत आहेत. एवढेच नव्हे तर; आज ज्यांच्याकडे पूर्वग्रहदूषितपणामुळे तुच्छतेने किंवा तिरस्काराने पाहिले जाते अशा अनेक व्यवसायांमधले व्यावसायिक देखील नामस्मरण करू लागले आहेत!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (7261)  |  User Rating
Rate It


Sep19
शाकाहार आणि मांसाहार: डॉ. श्रीनिवास कशाळीक
शाकाहार आणि मांसाहार: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

प्रत्येक प्राणी त्याचा त्याचा आहार ग्रहण करीत असतो. पण मनुष्य मात्र ह्या व अशा अनेक बाबींमध्ये संभ्रमात असतो. शाकाहार करणारे आणि मांसाहार करणारे ह्यांच्यात धुमश्चक्री उडताना देखील दिसते.

व्यक्ती तितक्या प्रकृती हे जसे खरे आहे; तसेच प्रकृती तितक्या चमत्कृती आणि विकृती हे देखील खरे आहे. म्हणूनच काहीजण कीडे खातात. काही जण उंदीर खातात. काही जण सांप, बेडूक इत्यादी खातात. कोण काय खातो किंवा खाऊ इच्छितो हे त्याच्या शरीरक्रिया शास्त्रीय वैशिष्ट्यांनुसार, सांस्कृतिक वारशानुसार आणि भौगोलिक उपलब्धतेनुसार ठरत असते. आर्थिक आणि शारीरिक लाभ किंवा हानी वगैरे इतर घटकांचा परिणाम देखील होत असू शकेल.

आहार ठरवणे हा ज्याचा त्याचा प्रश्न, अधिकार वा हक्क आहे असे आपण म्हटले तरी तो मर्यादेचा, मजबूरीचा वा असहाय्यतेचा भाग देखील असू शकतो.

पण ह्या सर्वांमध्ये नामस्मरणाचे महत्व काय? नामस्मरणाने काय साध्य होईल?

अनेक लोकांचा अनुभव असा आहे की; नामस्मरणाने हळू हळू त्यांच्यामधली प्राणी मारण्याची तलफ किंवा खुमखुमी कमी कमी होत जाते. तसेच प्राणी मारण्याचा कठोरपणा कमी होतो. एवढेच नव्हे तर मेलेले वा दुसऱ्या कुणीतरी मारलेले प्राणी (म्हणजेच मासे, अंडी, कोंबड्या, बकऱ्या, शेळ्या, बैल इत्यादिंची प्रेते) बाजारातून आणून शिजवून खाण्याचा किळस येतो. मेलेल्या प्राण्यांची आंतडी, मूत्रपिंड, यकृत, स्नायू, इत्यादी भाजून शिजवून वा तळून बनवलेले पदार्थ विकत सोडाच; पण फुकट मिळाले तरी खायच्या विचाराने देखील उबग येतो. मांसाहारी स्वयंपाक करताना येणाऱ्या वासाने नामस्मरण करणाऱ्याला मळमळू लागते. अर्थात अनेकांना नामस्मरण न करता देखील मानासाहाराची किळस येत असू शकेल आणि उलटपक्षी काही नामस्मरण करणारे मांसाहार एन्जोय करीत असतील

नामस्मरण करावे की करू नये हा देखील ज्याचा त्याचा प्रश्न, अधिकार वा हक्क आहे असे आपण म्हटले तरी तो देखील मर्यादेचा, मजबूरीचा वा असहाय्यतेचा भाग असू शकतो. फक्त अशी मर्यादा, अशी मजबूरी आणि अशी असहाय्यता ही नामस्मरण करणाऱ्याला; ईश्वराची वा गुरुची कृपा आणि आयुष्याची कृतार्थता व सार्थकता वाटते!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (7278)  |  User Rating
Rate It


Sep19
जीवन सुंदर आहे: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळी&#
जीवन सुंदर आहे: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्यामध्ये येणारे अनेक साधक आणि साधू लहानपणापासून अध्यात्माच्या मार्गाला लागलेले असतात. त्यांचे वागणे बोलणे पुष्कळदा अचाटच असते. ते पाहिले की अचंबित व्हायला होते. अध्यात्म एवढे अवघड आणि सर्व सामान्यांपासून दूर आणि त्यांना दुस्तर वा अशक्य असे आहे का?

शिक्षक: अध्यात्म म्हणजे स्वभाव. आपल्या अंतरात्म्याचा भाव. ते एकाला सोपे आणि दुसऱ्याला अवघड कसे असेल? पण काही जण सुरुवातीपासूनच त्यांच्या अंतरात्म्याच्या अधिक निकट असतात किंवा त्याच्याशी म्हणजेच ईश्वराशी जोडले गेलेले असतात; एवढे मात्र नाकारता येणार नाही. पण; आपण रोजच्या जीवनात तरी काय पाहतो? डॉक्टर, वकील, इंजिनीअर, चित्रकार, गायक अशी किती तरी क्षेत्रे असतात. प्रत्येकाला दुसऱ्याच्या क्षेत्रातले काम तेवढ्याच कुशलपणे आणि उत्तमपणे करता येते का? नाही! परंतु, तरीही सर्वांचे अंतीम ध्येय एकच असते आणि ते साध्य करण्यामध्ये सर्वजण एकमेकांची मदत करीत असतातच ना? कुंभ मेळ्याकडे आपण ह्या दृष्टीकोनातून पाहायला हवे असे मला वाटते.

विद्यार्थी: म्हणजे कुंभ मेळ्याबद्दल आणि तेथील साधूंच्या बद्दल आपल्या मनात कुतुहूल, जिज्ञासा, कृतज्ञता आणि आदर असावा पण स्वार्थी आणि परावलंबी अशी आंधळी वृत्ती नको. खरे ना?

शिक्षक: होय. पण आपल्या मनातील याचक आणि लाचार वृती कशी घालवायची? स्वाभिमानी कसे बनायचे? कृतज्ञतेची भावना कशी बाळगायची? आपण कितीही ठरवले तरी; ठरवून आपल्याला कृतज्ञ राहता येतेच असे नाही. नकळत आपण वैतागतो, कंटाळतो, तक्रार करतो, चरफडतो, किरकिरतो!
याचे कारण, नामविस्मरणामुळे आपण; आपल्या स्वत:तील अमृताला आणि जीवनातील चैतन्याला पारखे झालेले असतो! आपल्यासाठी जीवन बेचव आणि विषवत झालेले असते!
कुंभ मेळ्याच्या निमित्ताने; तेथील साधूंच्या कडून आपण नामस्मरण शिकलो तर एरवी अलभ्य असणारा आपल्या अंतरात्म्यातील अमृताचा किमान एखादा थेंब तरी आपल्याला मिळतो आणि आपले जीवन चैतन्यमय, बनू लागते. अनेक छोट्या मोठ्या बाबी मनासारख्या झाल्या नसल्या, तरी एवढा “मोठ्ठा अमृताचा ठेवा” मिळाल्यामुळे आपण खरोखरीच कृतज्ञ राहतो आणि “नेहमी कृतज्ञ राहावे” ही साधू संतांची शिकवण आपल्यासाठी सुसाध्य बनते!
नामामृताच्या ह्या थेंबाची महती अशी की; आपल्याला स्पष्टपणे जाणवते की नाम हेच आपले गंतव्य आहे आणि नाम हेच आपले प्राप्तव्य आहे! नाम हेच आपले सर्वस्व आहे!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (7008)  |  User Rating
Rate It


Sep19
नामाची शक्ती: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामाची शक्ती: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

नामस्मरण ही अचूक रोगनिदानाची गुरुकिल्ली आहे.
NAMASMARAN IS THE KEY TO CORRECT DIAGNOSIS.

नामस्मरण हा वैद्यकीय निर्णयक्षमतेचा कणा आहे.
NAMASMARAN IS THE BACKBONE OF MEDICAL DECISION MAKING.

नामस्मरण; सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवेचा मूलाधार आहे.
NAMASMARAN IS THE BASIS OF ALL THE MEDICAL SERVICES.

नामस्मरण हे सर्वांसाठी अत्यावश्यक आणि समान असे पथ्य आहे.
NAMASMARAN IS AN ESSENTIAL REGIMEN COMMON TO ALL.

नामस्मरणाने कर्मचारी, संस्थाचालक, त्यांची कुटुंबे; आणि संस्थेचे कल्याण होते.
NAMASMARAN IS BENEVOLENT TO EMPLOYEES, EMPLOYERS, THEIR FAMILIES; AND THE ORGANIZATION.

नामस्मरण हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे!
NAMASMARAN IS A BIRTHRIGHT EVERYONE!

नामस्मरण ही अज्ञात सहजप्रवृत्ती आहे!
NAMASMARAN IS AN UNIDENTIFIED INSTINCT!

नामस्मरणाची सहजप्रवृत्ती दबून राहणे हे तणावाचे मूळ कारण आहे!
THE ROOT CAUSE OF STRESS IS; SUPPRESSION OF THE INSTINCT OF NAMASMARAN!

नामस्मरण हा संपूर्ण तणावमुक्तीचा गाभा आहे!
NAMASMARAN IS THE CORE OF TOTAL STRESS MANAGEMENT!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (6951)  |  User Rating
Rate It


Sep19
आर्केमेडीसची तरफ: डॉ. श्रीनिवास जनार्दन कश
आर्केमेडीसची तरफ: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

शिक्षक: कुंभ मेळ्याप्रमाणेच आपल्या जीवनामध्ये हजारो घटना घडत असतात. पण त्यातल्या काही आपल्या अधोगतीला कारणीभूत असतात तर काही उन्नतीला. ज्या बाबी भगवंताच्या नामाविषयीची; म्हणजेच भगवंताविषयीची; म्हणजेच आपल्या अंतर्यामीच्या चैतन्याविषयीची निष्ठा कमी करतात आणि ज्यांमुळे आपण अधिकाधिक सुस्त, बेपर्वा, संकुचित, असहिष्णू, बेचैन, परावलंबी, लाचार किंवा क्रूर बनतो, त्या सर्व बाबी घातक असतात. ज्या बाबी भगवंताच्या नामाविषयीची; म्हणजेच भगवंताविषयीची; म्हणजेच आपल्या अंतर्यामीच्या चैतन्याविषयीची निष्ठा वाढवतात त्या कल्याणकारी असतात.

विद्यार्थी: कुंभ मेळ्याला नावे ठेवण्यापूर्वी किंवा त्याचा उदो उदो करण्यापूर्वी सर्वच घटना किंवा बाबी आपण ह्या निकषावर तपासल्या पाहिजेत!

शिक्षक: अगदी बरोबर आहे. किंबहुना आपले संपूर्ण जीवनच ह्या निकषानुसार जर विकसित करता आले तर कल्याणकारी होईल. आपल्याकडे जे समाजकारण, राजकारण व अर्थकारण चालते, ते जर अध्यात्मावर आधारित आणि अध्यात्मकेंद्रित असेल तर ते सर्वांच्या हिताचे होईल आणि सर्वांच्या आकांक्षा पूर्ण होतील. त्यातूनच सर्वांचे आर्त, तृप्त होईल.

विद्यार्थी: ते कसे काय?

शिक्षक: हे पहा; विश्वाच्या आणि आपल्या सर्वांच्या अंतर्बाह्य; सर्वत्र असणाऱ्या चैतन्याला आपण सच्चिदानंद म्हणतो. सत् म्हणजे चिरंतन, चिद् म्हणजे चैतन्यमय आणि आनंद म्हणजे प्रसन्नता. हे अजरामर चैतन्य अनादी आणि अनंत आहे. ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षण प्रत्येक कणाकणामध्ये असते, त्याप्रमाणे अंतर्बाह्य व्यापणाऱ्या चैतन्याची ओढ प्रत्येक जीवात असते! ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षण अनिवार्य आणि अपरिहार्य असते त्याचप्रमाणे ही ओढ अनिवार्य आणि अपरिहार्य असते. आणि ह्या ओढीलाच संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराज विश्वाचे आर्त म्हणतात. पण प्रत्येक निर्जीव कणाला ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षणाचे ज्ञान असत नाही त्याप्रमाणे प्रत्येक सूक्ष्म जीवाला, वनस्पतीला किंवा प्राण्याला स्वत:ची सच्चिदानंदाची ओढ, स्वत:चे आर्त; जाणवत नाही! पण ते आर्त जाणवो वा न जाणवो; ते असतेच असते; आणि ते अपरिहार्य असते!
अशा तऱ्हेने हे आर्त सर्वांचेच असल्यामुळे ह्याभोवती सर्व धोरणे, कायदे, नियम, योजना, कार्यक्रम आंखले की ते सर्वांना समाधान देउ लागतात. उदाहरणार्थ; आंतरिक चैतन्याची म्हणजेच नामाची आठवण आणि पूजा ज्या स्थानी होते आणि ज्या व्यक्तींकडून होते, ती स्थाने आणि त्या व्यक्ती समाजाचे मूलाधार असतात. त्यामुळे त्यांना जपणे, जतन करणे आणि जोपासणे हे शासनकर्त्यांचे सर्वात महत्वाचे कर्तव्य आहे.
नामस्मरण ही एक प्रकारे अधोगामी जगाला उर्ध्वगामी बनवणारी आर्केमेडीसची तरफ आहे!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (6351)  |  User Rating
Rate It


Sep19
जीवनाचे सार्थक: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळ
जीवनाचे सार्थक: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्यावर विनाकारण वेळ, पैसा आणि शक्ती यांचा अपव्यय होतो असे म्हटले जाते. तुमचे काय मत आहे? किंबहुना; आपण ज्या ज्या गोष्टी करतो, त्यातल्या कोणत्या गोष्टी सत्कारणी लागतात आणि कोणत्या वाया जातात; हे कसे ठरवायचे?

शिक्षक: ज्या लोकांना ह्या प्रश्नाचे उत्तर सापडले, त्यांना; संत, साधू, महात्मा, ऋषी, मुनी, तत्ववेत्ते, योगी, महायोगी, ज्ञानी इत्यादी म्हणतात. सत्याचा साक्षात् अनुभव घेतलेल्या लोकांना सद्गुरू म्हणतात. त्यांनी मोठ्या उदार अंत:करणाने आणि आत्मीयतेने त्यांना सापडलेले उत्तर आपल्याला सांगितले आहे.

सत् म्हणजे सत्य. “सत्कारणी” लागणाऱ्या गोष्टी म्हणजे; सत्याकडे नेणाऱ्या आणि सत्यामध्ये समरस होण्यामध्ये उपयोगी पडणाऱ्या गोष्टी!

आपण रोज प्रातर्विधी करतो, आंघोळ करतो, पूजा करतो, कपडे धुतो, घरातली साफसफाई करतो, व्यायाम करतो, स्वयंपाक करतो, नोकरी-धंदा करतो, नफा कमावतो, नाव कमावतो, राजकारण करतो, सत्ताकारण करतो, मनोरंजन करतो आणि ह्याशिवाय असंख्य बऱ्या-वाईट गोष्टी करतो. ह्यातल्या कोणत्या गोष्टी आपल्याला सत्याकडे पोचवतात; म्हणजेच “सत्कारणी” लागतात? शिक्षण, क्रीडा, करमणूक, व्यापार, उद्योग, शेती, आरोग्यसेवा, संगीत, नाट्य; अशा कोणत्याही बाबीकडे पहा. ह्यातल्या ज्या ज्या गोष्टी आपण नामविस्मरणात करतो, त्या त्या आपल्याला आपल्या अंतरात्म्यापासून म्हणजेच सत्यापासून परावृत्त करतात आणि दूर लोटतात! म्हणजेच त्यांत घातलेले पैसे, श्रम आणि वेळ वाया जातात, व्यर्थ जातात, फुकट जातात!
वास्तविक; आपले अंतर्बाह्य व्यापणारे चैतन्य आपल्या अंत:करणातल्या आकाशात निरंतर बरसत असते. मनुष्य कोणत्याही धर्माचा, पंथाचा, जातीचा, देशाचा, वंशाचा, व्यवसायाचा वा वयाचा असो, याला अपवाद असत नाही. त्याचप्रमाणे मनुष्य व्याधीग्रस्त असो वा निरोगी, अपंग असो वा धडधाकट, अशक्त असो वा सशक्त, व्यसनी असो वा निर्व्यसनी, अपराधी असो वा निरपराधी आणि गरीब असो वा श्रीमंत याला अपवाद असत नाही. अगदी जगभरातल्या बलाढ्य देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान आणि सेनानी देखील याला अपवाद असत नाहीत! पण आपण; आपल्याच हृदयात बरसणाऱ्या ह्या चैतन्याच्या विस्मृतीमुळे ते इतके नजीक असतानाही त्याला ओळखत नाही आणि त्याचे महत्व जाणत नाही! उलट; त्याला पारखे होऊन चैतन्यतृष्णाक्रांत होऊन चैतन्याच्या एका एका थेंबासाठी कासावीस होत असतो, तडफडत असतो!
नामस्मरण म्हणजेच चैतन्याचे, सत्याचे स्मरण. त्याची जोड मिळाली की, आपली प्रत्येक कृती सत्कारणी लागते आणि त्याची जोड मिळाली नाही तर; म्हणजेच नामाच्याविस्मरणात; आपली प्रत्येक कृती वाया जाते!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (6089)  |  User Rating
Rate It


Browse Archive