World's first medical networking and resource portal

Articles
Category : All ; Cycle : August 2015
Medical Articles
Aug25
Erectile Dysfunction
Erectile dysfunction (ed) occurs when the man is unable to achieve or maintain his erection of penis to meet his or his partner's sexual satisfaction.
The problem is often faced by newly married men. Fortunately with experience, most of them are able to overcome this problem. Again it is increasingly common with increased age.

So, what are the causes. In some male, it is psychological, caused by anxiety, depression, stress, marital disharmony etc. Use of alcohol and smoking will aggravate the problem. Psychological causes can happen at any age but more common at younger age. But in some cases, it is associated with serious diseases, especially at old age. It has been seen that in apparently healthy male ed is the first sign of heart disease. So, if you have ed, make sure that i's not caused by your heart problem. Again diabetes is another important cause. Excessive weight gain will also cause hormonal imbalance and thus problems in erection. Some hormone may also cause ed like thyroid, prolactin and even testosterone (male sex hormone). If you have chronic diseases like liver or kidney disease, it may also lead to ed. Diseases of nerves and spines should also be kept in mind. Sometimes, infections or tumour in private parts (prostate, testis etc) will also add to ed. Other diseases of penis like abnormalities in blood vessels can also be responsible, especially in young guys. Apart from these, some surgeries in abdomen and some drugs (like drugs to lower blood pressure, antidepressants, hormonal drugs etc) will also cause ed.

Now, what you can do? if you want to suffer silently, you will land up in other problems like problem in sexual life, problem in family relationships, depression and even inability to make your partner pregnant. But do all men with ed have to go to doctor? initially, the men should try life style modifications like avoiding smoking and alcohol; avoiding stress and anxiety; making good understanding with partner and also reducing weight. The partner should also have sympathetic attitude to the husband who is having ed.

But if still the issue is not resolved you have to consult doctor. It's not a mater of hesitation or embarrassment, as you may think. Rather it is needed to ensure that you are healthy. So, your doctor will talk to you, will check you and try to find out if any cause is there or not (like heart disease, diabetes, hormones etc). He may order some basic tests to ensure that everything is alright. After that he will advise you the treatment. If the cause is found, treatment of the cause (like diabetes) may cure ed. Even if no cause is found, ed can be treated by various ways.

But should you try the drugs shown in television or newspaper? remember, drugs used in ed have important side effects and we advise drugs only when it is absolutely necessary. In most cases simple measures like stress reduction, exercise help. Sex counseling of both the partners helps a lot. And if still ed persists, we advise drugs. There are variety of drugs, all are having own advantages and disadvantages. Particularly sildenafil group of drugs can affect heart and retina. So, we always practice caution before prescribing such drugs. And when patients are advised such drugs we advise to inform us when he feels eye problems, chest pain, fainting or even painful persistent erection of penis (" priapism").

There are other drugs that can be applied directly over penis. Testosterone group of drugs are prescribed only in selective cases as they have serious side effects and even they can reduce the size of your testes. In some cases where drugs cannot be given or drugs fail, we advise penile implants or artiificial pump to maintain erection. Finally in very few cases, where blood vessels of penis is blocked, we can cure it by some operations.

So, if you feel ed, don't get depressed. At the same time don't feel embarrassed to take medical help. Today's embarrassment may harm you in future. So, get cured and enjoy your personal life.


Category (Sexuality & Venereal Disorders)  |   Views (5937)  |  User Rating
Rate It


Aug22
नामस्मरण हाच उत्तम उपाय आहे: डॉ. श्रीनिवास ज&
नामस्मरण हाच उत्तम उपाय आहे: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्यामध्ये पुष्कळ गांजा ओढला जातो, त्याबद्दल तुमचे काय मत आहे?

शिक्षक: गांजा असो वा अन्य मादक पदार्थ; त्यांच्याबद्दल; आपल्या मनात एक प्रकारची दहशत असते. तसेच; तिटकाराही असतो. पण साधूंच्या बद्दल; आदरयुक्त दबदबा आणि एक प्रकारचे कुतुहूलमिश्रित गूढ आपल्या मनात असल्यामुळे आपण त्यांच्याबद्दल फटकळपणे बोलत नाही आणि त्यांच्याविरोधी टोकाची भूमिका घेत नाही.
पण सर्वच मादक पदार्थ सारखेच नसतात. काही मादक पदार्थ मन भडकवू शकतात आणि त्यामुळे हिंसक गुन्हे घडू शकतात. पण काही मादक पदार्थ मनाची खळबळ, अशांती, अस्वस्थता, उन्माद वगैरे कमी करतात. असे म्हणतात की; काही मादक पदार्थामुळे लैंगिक वासना दबली जाते व वीर्यस्खलन वा शीघ्रपतन होत नाही. अध्यात्मिक प्रगतीसाठी वीर्यस्खलन होऊ न देणे महत्वाचे आहे असे काहीजण मानत असल्यामुळे लैंगिक वासना दाबून अध्यात्मिक प्रगती साधता यावी म्हणून ते मादक पदार्थांचे सेवन करत असू शकतात! त्यामुळे; गांजा ओढणे हे सर्व सामान्यांच्या कसोटीला उतरत नसले तरी तो गंभीर गुन्हा मानला जात नसावा.

विद्यार्थी: पण हे योग्य आहे?

शिक्षक: आपण व्यक्तिगत जीवनात कसे वागावे, काय खावे-प्यावे; आपला दिनक्रम कसा असावा; ह्याबद्दल जबरदस्ती वा सक्ती असावी का? कुणी ब्रह्मचारी असावे की गृहस्थाश्रमी ह्याचे स्वातंत्र्य ज्याचे त्याला हवे की नको? कुणी कोणते कपडे घालावे हे कुणी ठरवायचे?
त्यामुळे मला वाटते; इतरांना नावे ठेवण्यापेक्षा; आपले आचरण तपासून पाहावे. काळजीपूर्वक तपासल्यानंतर; आपले आचरण आपल्या स्वत:ला थोडे जरी खुपत किंवा सलत असले; किंवा लोकांना हानिकारक होत असले, तर ते प्रयत्नपूर्वक सुधारणे आवश्यक आहे. त्यासाठी नामस्मरण हाच उत्तम उपाय आहे असेच सर्व संतांचे सांगणे आहे.

विद्यार्थी: इतरांना नावे ठेवण्यापेक्षा; स्वत:कडे त्रयस्थ दृष्टीने पाहणे फार महत्वाचे आहे, कठीण आहे! तसेच; स्वत:मधले दोष दूर व्हावे असे वाटणे आहे, देखील कठीण आहे! नामस्मरणाने जर हे शक्य होत असेल असेल तर मी जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा अगदी मनापासून प्रयत्न करीन.

शिक्षक: हा संकल्प सर्वश्रेष्ठ पण तो तेवढाच कठीण देखील आहे. कारण; आपण जे पाहतो, जे ऐकतो, जे अनुभवतो, ते सारे आपल्या संकुचित आणि सदोष नजरेतून पाहत असल्यामुळे; आपल्याला नेहमीच नामस्मरणापासून विचलित करू शकते! म्हणजे; नामस्मरणाच्या आड आपले आपणच येत असतो! पण तरीही नाम, गुरु, ईश्वर म्हणजेच आपला अंतरात्मा; आपल्याकडून नामस्मरण करून घेतो!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4952)  |  User Rating
Rate It


Aug22
जीवनातील चैतन्य आणि गोडवा: डॉ. श्रीनिवास जन&#
जीवनातील चैतन्य आणि गोडवा: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: सध्या आपण पाहतो, की कुंभ मेळ्यामध्ये तेथील लाखो लोकांचे आयुष्य; जंतुसंसर्ग, तज्जन्य साथी, अपघात, दहशतवादी हल्ले, गुन्हे, विकृती, दंगली; इत्यादींच्या सावटाखाली असते! त्यामुळे व्याधीग्रस्त, अपंग, परावलंबी आणि गोरगरीबांना घरच्या घरी; आणि सहज शक्य होईल असा नामस्मरणाचा मार्ग मला महत्वाचा वाटू लागला आहे. त्याबद्दल आणखी थोडे सांगा ना!

शिक्षक: कुंभ मेळ्याप्रमाणेच इतरही यात्रांमध्येही; उदाहरणार्थ; केदारनाथ, बद्रीनाथ, मानसरोवर,वैष्णोदेवी इत्यादींमध्येही; उपरोक्त धोके आणि अडचणी असतातच. पण त्या धोक्यांना न जुमानता, ह्या यात्रांना लोक जातातच. याशिवाय; गावोगावी असलेल्या ग्रामदैवतांच्या जत्रांना देखील लाखोंच्या संख्येने लोक जातातच! आपल्या पूर्वजांनी “एकत्र जमणे” ह्या मूलभूत प्रवृत्तीला विधायक चिंतनाकडे, आत्मज्ञानाकडे म्हणजेच अंतीम सत्याच्या व अमरत्वाच्या अनुभवाकडे वळवले आहे. किंबहुना वेगवेगळ्या धर्मांचे तत्वचिंतन, नीतिशास्त्र, रोजचे विधी, सण, उत्सव, व्रते इत्यादी सर्व बाबींचा मूळ उद्देश; सत्याचा व अमरत्वाचा अनुभव हाच आहे.

परंतु आपल्यामध्ये; जडत्वाकडे झुकण्याची; बळकट अशी सहजप्रवृत्ती आहे. त्या सहजप्रवृत्तीनुसार; कालांतराने धर्माच्या बाह्यस्वरूपाला आणि कर्मकांडाला जास्त महत्व आले. बाह्यअवडंबर फोफावले आणि धर्माचा मूळ उद्देश बाजूला पडू लागला. मनुष्य जीवनातील चैतन्य आणि गोडवा; आणि जिव्हाळा व सहकार्य ऱ्हास पावू लागले. जीवनाचा आधार ढासळू लागला. बेदिली, संशय, अविश्वास, कटुता, संकुचितपणा वाढू लागले. संकुचितपणा आणि अचेतनपणामुळे वैयक्तिक आणि सामाजिक दुरवस्था येत गेली आणि दुरवस्थेच्या कोलाहलामध्ये आपल्याला अंतरीच्या सच्चिदानंदमय चैतन्याची साद ऐकू येणे कमी झाले. त्यामुळे आपण नामस्मरणाच्या चैतन्यसाधनेपासून बराच काळ आणि पुष्कळ प्रमाणात वंचित राहिलो आणि त्यामुळे अधिकाधिक संकुचित आणि अचेतन बनत गेलो.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, नामदेव, तुलसीदास, मीराबाई, कबीर, एकनाथ, तुकाराम, रामदास, गोंदवलेकर महाराज अशा अनेक महान संतांना ही बाब प्रकर्षाने जाणवली. त्यामुळेच सर्व संतांनी; व्यक्ती आणि समष्टी मधील आंतरिक चैतन्याचा अनुभव घेण्याचे आणि सर्वांना सहज शक्य असे नामस्मरण हे साधन प्रसृत केले. सर्वांना; अगदी व्याधीग्रस्त, अपंग, परावलंबी आणि गोरगरीबांना देखील घरच्या घरी; जमेल असे नामस्मरण त्यांनी लोकांमध्ये प्रचलित केले, लोकप्रिय केले आणि रुजवले.
पण; अखंड नामस्मरण करणे ही सोपी गोष्ट नाही, आणि अशी गोडी निर्माण होण्यासाठी रोजचे विधी, सण, उत्सव, व्रते इत्यादी सर्व बाबींना महत्व आहे, हे माहीत असल्यामुळे आणि त्यांनी या बाबींचा तिरस्कार वा द्वेष केला नाही.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4979)  |  User Rating
Rate It


Aug22
रोजच्या जीवनात उपयोग काय?: डॉ. श्रीनिवास जना&
रोजच्या जीवनात उपयोग काय?: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: सर, कुंभ मेळ्यासाठी सरकार अनेक प्रकारच्या सेवा पुरवते. ह्याचा सामान्य माणसांना रोजच्या जीवनात उपयोग काय?

शिक्षक: प्रत्येक बाब; व्यावहारिक उपयोगाच्या तराजूमध्ये तोलून चालत नाही. व्यावहारिक फायदा बघूच नये असे नव्हे. पण; केवळ व्यावहारिक फायदा बघत बघत; आपले आयुष्य संपले तरी आपल्याला कृतार्थता येते का? जीवन सार्थकी लागले असे वाटते का? मनाचे अगदी समाधान झाले आणि जीवनाला पूर्णत्व आले असे होते का? नाही ना? समाजाचेही तसेच आहे. व्यावहारिक फायदा मिळवत मिळवत केवळ भौतिक दृष्ट्या संपन्न झालेले समुदाय; वैयक्तिक आणि सामाजिक प्रगल्भतेच्या अभावी अवनतीकारक दृष्टीकोन, धोरणे, कायदे, परंपरा आणि रुढींच्यामुळे आत्यंतिक संकुचितपणा, स्वार्थ, हांव, बेशिस्त, निराशा, व्यसनाधीनता, निर्दयीपणा, हिंसा; यांमुळे स्वत:च्या आणि इतरांच्या नाशाला आमंत्रण देतात.
अन्न पाणी निवारा इत्यादी बाबी जगण्यासाठी आवश्यक असतात हे खरे, पण समाजाच्या स्वास्थ्यासाठी म्हणजेच समाजातील उत्साह, उमेद, सहिष्णुता, स्नेह, सहकार्य आणि सद्भावना वाढण्यासाठी म्हणजेच पर्यायाने; आपल्या प्रत्येकाच्या जगण्यासाठी; सत्याची, अंतीम समाधानाची म्हणजेच जीवनाच्या सार्थकतेची कास धरणे हे देखील तेवढेच महत्वाचे आहे. कुंभ मेळ्यामधून अशी कास धरण्याची प्रेरणा मिळते; म्हणून त्यावर खर्च करणे अनाठायी ठरत नाही.
त्यामुळेच सरकारने ज्याप्रमाणे सामान्य माणसांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे, त्याचप्रमाणे अनीष्ट बाबी कांटेकोरपणे दूर करण्याचा प्रयत्न करत करत; कुंभ मेळ्यासारख्या प्रेरक प्रथा देखील जोपासल्या पाहिजेत.
हा समतोल आहे. वैयक्तिक जीवनात आणि सामाजीक जीवनात त्याला अत्यंत महत्व आहे. आपण सर्वांनी आणि सरकारने असा समतोल साधायचा प्रयत्न केला तर ते सर्वांच्या हिताचे ठरेल.
नि:पक्षपातीपणे पाहिले, तर सहज कळेल की; भारताकडे असा समतोल साधण्याची पूर्वपुण्याई नामस्मरणाच्या परंपरेच्या स्वरूपात उपलब्ध आहे! त्यामुळेच कुंभ मेळ्यामध्ये सेवा करण्यासाठी हजारो स्वयंसेवक आणि दान देण्यासाठी हजारो दाते पुढे येतात!
पण एकंदरीत पाहता, सरकारने देखील नामस्मरणाचे महत्व ओळखून त्याचा अंगीकार आणि प्रसार केला, तर त्यातून; सर्वांच्याच उन्नतीला आवश्यक असा समतोल साधण्यासाठी; अनेक नवनवीन धोरणे, कल्पना आणि योजना सुचतील आणि त्या अंमलात आणण्यासाठी आवश्यक ती इच्छाशक्ती आणि क्रियाशक्तीही प्राप्त होईल; हे सत्ताधाऱ्यांच्या, शासनकर्त्यांच्या आणि सर्व क्षेत्रांतील नेत्यांच्या व उच्चपदस्थांच्या लक्षात येत आहे!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4939)  |  User Rating
Rate It


Aug22
मायावी शत्रू: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीक
मायावी शत्रू: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर


विद्यार्थी: कुंभ मेळ्यामध्ये देखील; अनेक मंदिरांमध्ये आणि पंढरीच्या वारीमध्ये चालते तसे राम नाम चालू असते. अनेक आखाड्यांमध्ये राम नामाची धून चालू असते. पण जपामध्ये घेतले जाणारे नाम (म्हणजेच “राम” ही केवळ दोन अक्षरे); पापाचे पर्वत कसे काय जाळू शकते, हे काही केल्या समजत नाही आणि उमजत तर नाहीच नाही.

शिक्षक: नाम ही संकल्पना समजण्यामध्ये आरंभी-आरंभी माझा देखील गोंधळ होत असे. कारण नामाविषयी; “नाम अमृताहून गोड आहे”, किंवा “नामाने बेचाळीस पिढ्या उद्धरतात”, इत्यादी जे म्हटले जाते, ते सुरुवातीच्या काळात; आपल्यासाठी अनाकलनीयच असते. पण नाम म्हणजे केवळ अक्षरे नव्हेत!

विद्यार्थी: तुम्ही ज्याला नाम म्हणता ते नाम; आणि नामजपातील नाम यात फरक काय?

शिक्षक: “नाम” म्हणजे माझा अंतरात्मा, अंतीम सत्य, ब्रह्म, ईश्वर किंवा माझ्या गुरूंचे निजस्वरूप. ह्यालाच मी नाम म्हणतो. नामस्मरण म्हणजे ह्या नामाचे स्मरण. हे नाम सर्वसत्ताधीश आहे. ते “आहे आणि नाही” या संकल्पनांच्या पलिकडे आहे.
ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे नाव म्हणजे तो व्यक्ती नव्हे, तसे, जपातले नाम म्हणजे अंतीम सत्य नव्हे; तर; त्या सत्याचे नाव आहे. पण ही तुलना इथेच संपते. कारण, व्यक्तीचे नाव जन्मभर घेत राहिलो तरी; आपण कधीही ती व्यक्ती बनत नाही. कारण ती व्यक्ती आपला अंतरात्मा नसते. ती स्थूल असते. पण जपातील नामाचे वेगळे आहे. जपातील नाम हे अंतीम सत्याचे नाव आहे. ते आपल्या अंतरात्म्याचे नाव आहे! ते आपल्या गुरुचे नाव आहे. ते घेत गेल्याने; कालांतराने आपण; आपण राहत नाही. आणि ते नाव नाव राहत नाही. जपातले ते नाम; केवळ अक्षरे राहत नाही. आता ते जपातले नाम ईश्वरस्वरूप होते आणि आपण देखील नामस्वरूप म्हणजेच ईश्वरस्वरूप होतो!

विद्यार्थी: म्हणूनच एकीकडे नामस्मरण हे अत्यंत सोपे साधन आहे असे म्हणतात, पण प्रत्यक्षात ते आपल्या सबुरीची, चिकाटीची आणि निष्ठेची कसोटी पाहते!

शिक्षक: होय. इतर साधनांनी अनेक गोष्टी साधतात. पण अहंकार समूळ नष्ट होत नाही. तो आपल्याला हुलकावण्या देतच राहतो! पण नामस्मरणाची महानता अशी; की अहंकाराचा लवलेशही जरी राहिला आणि इतर कोणत्याही प्रकारे जरी तो लक्षात आला नाही आणि जाणवला नाही, तरी नामस्मरणाच्याद्वारे मात्र तो ठसठशीतपणे लक्षात येतो, एखाद्या काट्याप्रमाणे ठसठसु लागतो, स्वत:ला असह्य होतो आणि नामस्मरणाच्या प्रगतीबरोबरच; काटा निघून जावा तसा निघून जातो! आत्मज्ञानाच्या आणि जगाच्या कल्याणाच्या मार्गातील सर्वात मोठ्ठा, सर्वात भयंकर आणि सर्वात मायावी शत्रू नष्ट होतो!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4848)  |  User Rating
Rate It


Aug22
अवघें जगचि महासुखें l दुमदुमित भरलें ll ज्ञान
अवघें जगचि महासुखें l दुमदुमित भरलें ll ज्ञानेश्वरी,९.२००.
: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्याच्या निमित्ताने आपल्या समाजात किती भिन्न भिन्न परंपरा आहेत याची जाणीव होते. जगभरामध्ये तर अशा किती तरी विभिन्न परंपरा असतील! इतक्या वैविध्यपूर्ण समाजघटकांना उचित न्याय मिळावा आणि सर्वांचे जीवन जास्तीत जास्त उन्नतीपर व्हावे; यासाठी सध्याचे कायदे आणि नियम समयोचित आणि पुरेसे आहेत का?

शिक्षक: जगभरात सध्या काही आंतर्राष्ट्रीय कायदे समान आहेत. पण वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे कायदे देखील आहेत. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये देखील अनेक वेगवेगळे कायदे आहेत. याशिवाय सरकारी खात्यांमध्ये आणि वेगवेगळया संस्थांमध्ये त्यांचे त्यांचे वेगवेगळे नियम असतात.
पूर्वग्रहदूषित बुद्धीने तयार केलेले आणि तर्कदुष्टपणे, गचाळपणे किंवा क्लिष्टपणे मांडणी केलेले कायदे व नियम मोडण्याचे प्रयत्न आणि प्रकार वाढतात. हे भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात घडले होते आणि आजही; घडते आहे. आज वेगवेगळ्या देशांदरम्यान आंतर्राष्ट्रीय कायदे व नियम; याबाबतीत मतभेद आणि संघर्ष होत आहेत आणि आंतरराष्ट्रीय कायदे व नियम मोडण्याची प्रवृत्तीही प्रबळ होते आहे.
असे होऊ नये यासाठी; आंतरराष्ट्रीय कायदे व नियम सर्वकल्याणकारी होणे अत्यावश्यक आहे. ते तसे व्हावेत; यासाठी केवळ तीव्र बुद्धी असून उपयुक्त ठरत नाही. कारण ती कुटिल असली तर उलट अन्यायकारक आणि विनाशकारी ठरते.
कोणतेही कायदे बनवताना; सर्वप्रथम; पूर्णपणे निस्पृह, पूर्वग्रहविरहित आणि विश्वकल्याणकारी दृष्टी असणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर, ह्या दृष्टीला अचूकपणे प्रकट करण्यासाठी उत्तम भाषाज्ञान आणि तर्कसंगत बुद्धी असणे गरजेचे आहे. हे असेल तरच कायदे किंवा नियम अचूक बनतात. त्यांचा हेतू आणि मांडणी सर्वांचे कल्याण साधणारी असल्याने बव्हंशी प्रभावी ठरते. कायदे मोडण्याचे प्रयत्न आणि प्रकार कमी होतात. यामुळे समाजाची केवळ भौतिक प्रगती नव्हे तर सर्वंकष उन्नती होते. समाजाचे सर्व घटक समृद्ध आणि प्रगल्भ होऊ लागतात.
आज बुद्धी आहे. शब्द ज्ञान आहे. पण आंतर्राष्ट्रीय कायदे व नियम बनवणाऱ्या लोकांची दृष्टी आणि बुद्धी आजच्यापेक्षा कितीतरी शुद्ध, पूर्वग्रहविरहित आणि निस्वार्थी होण्याची मात्र तीव्र गरज आहे!
याचसाठी श्री. ज्ञानेश्वर महाराजांपासून ते कबीरापर्यंत; आणि संत श्री. नामदेवापासून ते सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराजांपर्यंत; सर्वांनी नामस्मरणाचे महत्व पुन्हा पुन्हा उद्घोषित केले आहे! ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
ऐसे माझेनि नामघोषें l नाहीं करिती विश्वाची दु:खें ll
अवघें जगचि महासुखें l दुमदुमित भरलें ll ज्ञानेश्वरी,९.२००.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4688)  |  User Rating
Rate It


Aug22
ह्या व्यक्तींना एकत्र कोण जोडतो?: डॉ. श्रीनि&
ह्या व्यक्तींना एकत्र कोण जोडतो?: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्याच्या निमित्ताने आपल्या समाजात किती भिन्न भिन्न परंपरा आहेत याची जाणीव होते. इतक्या विविध परंपरांना आपल्या संस्कृतीमधील कोणती बाब एकत्र जोडून ठेवते?

शिक्षक: केवळ आपल्या देशातीलच नव्हे तर जगभरातील लोकांना एकत्र जोडून ठेवणारी जी सहज लक्षात न येणारी; पण विचारांती ठळकपणे जाणवणारी बाब आहे, तिलाच आपल्याकडे आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार, आत्मानुभूती, आत्मप्रचीती, ब्रह्मज्ञान, असे शब्द आहेत. ह्या अनुभवालाच संत लोक नामात रंगणे किंवा नामरूप होणे म्हणतात. हा अनुभव आलेल्या व्यक्तींचे जीवन सच्चिदानंदस्वरूप (ईश्वरस्वरूप) झालेले असते. त्यांच्या अस्तित्वातच एक अवीट गोडी असते, आकर्षण असते. अशा व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाचे मन हळू हळू संवेदनाक्षम, सहिष्णू आणि विशाल होते. वृत्ती निस्वार्थी आणि उदार होते. साहजिकच संघर्ष कमी आणि परस्पर जिव्हाळा अधिक; अशी अवस्था होते. साहजिकच अशा व्यक्ती; समाजात परस्पर सामंजस्य आणि एकोपा निर्माण करतात. समाजाला जोडून ठेवतात. परंतु, ह्या व्यक्तींना एकत्र कोण जोडतो?
श्लोक:
योगो ज्ञानं तथा सांख्यं विद्या शिल्पादि कर्म च
वेदा: शास्त्राणि विज्ञानम् एतत् सर्वं जनार्दनात्
अर्थ: योग, ज्ञान, सांख्य तत्त्वज्ञान, इतर विद्या, शिल्पादी कला, वेद, शास्त्रे, आणि विज्ञानादी सर्व काही जनार्दनापासून आहे (म्हणजे ईश्वरापासून उत्पन्न झाले आहे व त्याच्यामुळेच एकत्र जोडले गेले आहे).

विद्यार्थी: पण कुंभ मेळ्यामध्ये तर अनेक जण एकमेकांवर टीका करतात.
क्वचित प्रसंगी कोर्टात जाण्याच्या गोष्टी बोलतात आणि अनेकदा हमरीतुमरीवर आणि मारामारीवर उतरतात.

शिक्षक: आपण ह्या वरपांगी दिसणाऱ्या बाबींनी फार प्रभावित होतो आणि त्यांना फार महत्व देतो. आपल्याला देखील; सवंग गोष्टींमध्येच जास्त रस वाटतो; हे खरे नाही का? साहजिकच आपण लोकविलक्षण आणि विक्षिप्त चाळ्यांनी चाळवले जातो वा भारावून जातो वा विचलित होतो. कधी कुणी उगीच आकांडतांडव केला, तर गडबडून जातो. पण आपण नामस्मरणामध्ये राहिलो तर असे होत नाही. आपले लक्ष साधुंच्या अंतरंगाकडेच राहते.

ज्याप्रमाणे एका बीजामधून असंख्य प्रकारच्या फांद्या, पाने, फुले आणि फळे उत्पन्न होतात, पण त्याच्यापासून कधीही विलग झालेल्या नसतात, त्याचप्रमाणे सर्व विश्व, आपण सर्व आणि आपले संपूर्ण जीवन; सच्चिदानंदस्वरूप अंतरात्म्याशी (नामाशी) अविभाज्यपणे निगडीत आहे; आणि तेच सर्व परंपरांना एकत्र जोडून ठेवते; हे नामस्मरण करता करता; निश्चितपणे समजू लागते व अनुभवाला येते!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4675)  |  User Rating
Rate It


Aug22
विस्मयकारक प्रकार : डॉ. श्रीनिवास जनार्दन क&#
विस्मयकारक प्रकार : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: सर, कुंभ मेळ्यामध्ये जसे विस्मयकारक प्रकार बघायला मिळतात तसेच नामस्मरण करणाऱ्याला देखील अनुभवायला मिळतात का?

शिक्षक: होय, मिळतात! माझाच अनुभव सांगतो!
त्या दिवशी मी अतिशय अस्वस्थ होतो. अस्वस्थतेचे कारण समजत नव्हते. रात्री नऊ-साडेनऊचा सुमार असेल. नेहमीची औषधे घेऊन मी अंथरुणावर पडलो होतो. झोपायला अजून पुष्कळ वेळ होता.
हळू हळू माझी अस्वस्थता वाढू लागली. जीव घाबरा झाला. बघता बघता डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. तोंडाला कोरड पडू लागली. हात-पाय चाचपून पाहिले तर हात-पाय थंडगार पडताहेत असे जाणवले. क्षणात मी खोल खोल अंधाऱ्या गर्तेत जातो आहे असे वाटू लागले. दुसऱ्याच क्षणी माझे देहभान हरपू लागले आणि माझी जाणीव नष्ट होत चालली. आता मात्र जे घडत होते, ते माझ्या शक्तीच्या आणि नियंत्रणाच्या पलिकडे होते! शुद्धीत राहण्याची प्रतिक्षिप्त क्रिया; अक्षरशः जीवाच्या कराराने आणि मोठ्ठ्या कष्टाने माझ्याकडून घडत होती. अखेर सगळे लटके पडले आणि मी मृत्यूच्या त्या गर्तेत वेगाने बुडू लागलो. सर्व काही नष्ट होत असल्याची; सर्वस्व गमावण्याची ती भयंकर जाणीव हृदयाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवणारी होती. मी केविलवाणा झालो. पार हरलो. त्या क्षणी; “आता सर्व संपले” असे वाटत असतानाच पुढच्या क्षणी कुठून आणि कसे माहीत नाही; पण अचानक रामनाम मनात आले.
त्या क्षणी प्रेरणा झाली, “उठून साखर खा!” मी कसाबसा उठलो आणि पलंगापाशी ठेवलेला साखरेचा डबा मोठ्ठ्या मुश्किलीने उघडून साखर घेऊन तोंडात भरली. तोंड कोरडे झाल्यामुळे मोठ्ठ्या कष्टाने चावून चावून आणि बाजूला ठेवलेले पाणी पिऊन कशीबशी मी ती घश्याखाली घातली! जेवढ्या वेगाने मी अंधाऱ्या गर्तेत बुडत होतो, तेवढ्याच वेगाने मी देहभानावर आलो!
प्रथम वाटला तसा तो हृदयविकाराचा तीव्र झटका नसून; तो रक्तातील साखर कमी होण्याचा जीवघेणा अनुभव होता!
त्यापूर्वी मी रामनामाबद्दल खूप वाचले होते व ऐकले होते. अनेकदा; प्रेतयात्रेमध्ये “राम नाम सत्य है” असे म्हणत चाललेले लोक पाहिले होते. तसेच अमुक एक मनुष्य मेला; हे सुचवण्यासाठी “उसका राम नाम सत हुआ” असे म्हटलेले देखील ऐकले होते.
पण मृत्यू म्हणजे काय; आणि राम नाम अजरामर असते, संजीवक असते आणि राम नामाची सत्ता सार्वभौम असते; याचा किंचितसा का असेना पण खरा अर्थ मला त्या दिवशी कळला!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4628)  |  User Rating
Rate It


Aug22
चैतन्यकालाची नांदी: डॉ. श्रीनिवास जनार्दन 
चैतन्यकालाची नांदी: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्याच्या निमित्ताने मानवी जीवन किती वैविध्याने नटलेले आहे ह्याची थोडीफार कल्पना येते. आपली दृष्टी विशाल होण्यासाठी आणि आपल्यातील असहिष्णुता दूर होण्यासाठी अशा अनुभवांचा फार फायदा होऊ शकतो.

शिक्षक: होय. नक्कीच! आपण मध्यम वर्गीय लोक एका चाकोरीत जगतो. त्यामुळे आपली दृष्टी संकुचित बनलेली असते. त्यामुळे आपल्यापेक्षा जे जे वेगळे आहे, ते ते निकृष्ट आहे, असे समजण्याची गफलत आपण करत असतो.
कुंभ मेळ्यासारख्या मोठमोठ्या यात्रांच्या प्रसंगी हजारो प्रकारची माणसे भेटतात. आपली दृष्टी विशाल होऊ लागते. आपण जीवनातील वैविध्य सहिष्णुतेने, कौतुकाने आणि आदरपूर्वक स्वीकारू लागतो. आपल्यापुरते पाहण्याची संकुचित दृष्टी बदलू लागते. असहिष्णुता, एकलकोंडेपणा, आत्मकेंद्रीतपणा कमी होऊ लागतात. हे नामस्मरणाला आणि आंतरिक चैतन्याच्या अनुभवाला पूरक ठरते; आणि जागतिक सौहार्दासाठीही उपयुक्त ठरू शकते!
व्यक्ती, संस्था, समाज, देश किंवा संपूर्ण विश्व; सर्वांच्या बाबतीत हे खरे आहे! विशिष्ट व्यक्तीच्या, संस्थेच्या, समाजाच्या, देशाच्या किंवा अखिल विश्वाच्या सर्वंकष कल्याणाची वेळ आली की; सहिष्णुता वाढते. स्थूल आणि दृश्य जगाचा पगडा कमी होतो. मानसिक चंचलता कमी होते. चिडचिडेपणा कमी होतो. कटुत्व कमी होते. हिंसा आणि अशांतता कमी होतात.
खरे पाहता आपले मूळ; चैतन्याची जननी म्हणजेच चैतन्य आहे आणि आपले गंतव्य स्थान देखील चैतन्यच आहे. आपली भूक, तहान, आणि इतर सर्व वासना; चैतन्याच्या शोधातच आहेत. आपल्या सर्व वासना ह्या मूलत: चैतन्यशोधाचाच भाग असतात. त्यामुळेच आपल्या शरीरातील प्रत्येक वासनेला जे परिपूर्णत्व येते, ते परिपूर्णत्व आणि साफल्य त्या वासनेच्या आहारी जाऊन येत नाही; तर तेव्हाच येते, जेव्हां ती वासना चैतन्यशोधात परिवर्तीत आणि परिणत होते! नामस्मरणाने आपल्या केवळ वासनाच नव्हे तर; आपले संपूर्ण जीवन; त्यातील सर्व गुण-दोषांसकट सुजाण चैतन्यशोधात परिवर्तीत आणि परिणत होते. असा समसमायोग येणे म्हणजे वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील अभूतपूर्व सुवर्णकालाची वा चैतन्यकालाची नांदीच होय.

विद्यार्थी: कुंभ मेळा आणि तीर्थयात्रांचा हेतू उत्तम खरा, पण नामस्मरणाच्या योगे, समाजाची उन्नती होऊन त्या उन्नतीचे प्रतिबिंब तीर्थयात्रांमध्ये पडेल. उतावळेपणा, बेशिस्त, उन्माद इत्यादी कमी कमी होत जातील आणि सहिष्णुता, प्रेम वाढू लागतील.

शिक्षक: परिणामी; नामस्मरणाचे जागतिकीकरण होत जाईल आणि त्याद्वारे विश्वकल्याण प्रत्यक्षात येत जाईल!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4600)  |  User Rating
Rate It


Aug22
ही चैतन्यप्रचीती: डॉ. श्रीनिवास जनार्दन कश
ही चैतन्यप्रचीती: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्यामध्ये जसे लोकविलक्षण साधू दिसतात, तसे ते एरवी दिसत नाहीत. साधुदर्शनाला भारतात फार महत्व आहे. भाविकांच्या भावनेचा आदरच वाटतो. पण ह्या दरम्यान पुष्कळदा चेंगराचेंगरी होते आणि लोक मरतात; त्याचे वाईट वाटते.

शिक्षक: कुंभ मेळ्यादरम्यानच नव्हे तर इतर अनेक प्रसंगी गर्दी, बेशिस्त, उतावळेपणा आणि उन्माद नियंत्रणा बाहेर गेले की; व्यवस्थापन अशक्य होते आणि अपघात होतात. त्यामुळे प्रसंग कोणताही असो; संयम आणि शिस्त अत्यंत महत्वाचे आहेत. नामस्मरण करणाऱ्या लोकांच्या जीवनातील ठळक वैशिष्ट्ये म्हणजे संयम आणि शिस्त होय. विशेष म्हणजे साधुदर्शन केवळ काही विशिष्ट ठिकाणी आणि विशिष्ट प्रसंगीच होते असे नाही.
नामस्मरण करणाऱ्या करोडो अनुयायांनी; रोजच्या धकाधकीत देखील; अजरामर संत महात्म्यांचे देहत्यागानंतरचे अचिंत्य आणि चैतन्यमय अस्तित्व वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या प्रसंगातून अनुभवले आहे. कुणाला प्रत्यक्ष दर्शन होते तर कुणाला स्वप्नात दर्शन होते. कुणाला अशक्यप्राय अडचणीत मदत होते तर कुणाचे संकटात रक्षण होते. एक ना दोन; असंख्य प्रसंग सांगता येतील. हे प्रसंग हजारो प्रकारचे आहेत, पण ते सर्व; देहत्यागानंतरचे अमर आणि सत्तारूपी अस्तित्व अधोरेखित करणारे आहेत! देह जसा दिसू शकतो तसे संतांचे देहत्यागानंतरचे अस्तित्व सरसकट दिसत नाही हे अगदी खरे आहे. पण ज्याप्रमाणे शक्ती आणि स्फूर्तीच्या रूपाने आपल्याला रक्ताभिसरण अनुभवता येते; त्याचप्रमाणे आपली प्रगल्भता वाढली तर हे चैतन्य आपल्याला अनिर्वचनीय आनंदाच्या रुपात अनुभवता येते.
ही चैतन्यप्रचीती; संगीत–नाट्य, गणित-विज्ञान, सौंदर्य-शृंगार, वात्सल्य-करुणा, अशा एकूण एक सर्व तृषा आणि क्षुधा कायमच्या तृप्त करत जाते आणि जीवनाचे सर्वार्थाने सार्थक करते. ही प्रचीती आली असता चैतन्य आहे की नाही आणि सत्ता चैतन्याची आहे की नाही असे प्रश्न उरत नाहीत. किंबहुना, क्षणभंगुर जडत्वातून उत्पन्न होणारी कोणतीही भ्रांती उरत नाही.
आपले संपूर्ण जीवन चैतन्याच्या अपरंपार अशा लीलेचाच एक अविभाज्य भाग आहे ह्या जाणीवेने आपण स्वस्थ होतो आणि आपल्या आजूबाजूच्या तीर्थक्षेत्रांच्या, मंदिरांच्या, ग्रंथांच्या आणि साधूंच्या रुपात आढळणाऱ्या चैतन्यखुणा पूज्यभावाने न्याहाळत आणि मनोमन तृप्त होत जीवनानंद लुटत जातो!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4302)  |  User Rating
Rate It


Browse Archive