World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Sep19
जीवन सुंदर आहे: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळी&#
जीवन सुंदर आहे: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्यामध्ये येणारे अनेक साधक आणि साधू लहानपणापासून अध्यात्माच्या मार्गाला लागलेले असतात. त्यांचे वागणे बोलणे पुष्कळदा अचाटच असते. ते पाहिले की अचंबित व्हायला होते. अध्यात्म एवढे अवघड आणि सर्व सामान्यांपासून दूर आणि त्यांना दुस्तर वा अशक्य असे आहे का?

शिक्षक: अध्यात्म म्हणजे स्वभाव. आपल्या अंतरात्म्याचा भाव. ते एकाला सोपे आणि दुसऱ्याला अवघड कसे असेल? पण काही जण सुरुवातीपासूनच त्यांच्या अंतरात्म्याच्या अधिक निकट असतात किंवा त्याच्याशी म्हणजेच ईश्वराशी जोडले गेलेले असतात; एवढे मात्र नाकारता येणार नाही. पण; आपण रोजच्या जीवनात तरी काय पाहतो? डॉक्टर, वकील, इंजिनीअर, चित्रकार, गायक अशी किती तरी क्षेत्रे असतात. प्रत्येकाला दुसऱ्याच्या क्षेत्रातले काम तेवढ्याच कुशलपणे आणि उत्तमपणे करता येते का? नाही! परंतु, तरीही सर्वांचे अंतीम ध्येय एकच असते आणि ते साध्य करण्यामध्ये सर्वजण एकमेकांची मदत करीत असतातच ना? कुंभ मेळ्याकडे आपण ह्या दृष्टीकोनातून पाहायला हवे असे मला वाटते.

विद्यार्थी: म्हणजे कुंभ मेळ्याबद्दल आणि तेथील साधूंच्या बद्दल आपल्या मनात कुतुहूल, जिज्ञासा, कृतज्ञता आणि आदर असावा पण स्वार्थी आणि परावलंबी अशी आंधळी वृत्ती नको. खरे ना?

शिक्षक: होय. पण आपल्या मनातील याचक आणि लाचार वृती कशी घालवायची? स्वाभिमानी कसे बनायचे? कृतज्ञतेची भावना कशी बाळगायची? आपण कितीही ठरवले तरी; ठरवून आपल्याला कृतज्ञ राहता येतेच असे नाही. नकळत आपण वैतागतो, कंटाळतो, तक्रार करतो, चरफडतो, किरकिरतो!
याचे कारण, नामविस्मरणामुळे आपण; आपल्या स्वत:तील अमृताला आणि जीवनातील चैतन्याला पारखे झालेले असतो! आपल्यासाठी जीवन बेचव आणि विषवत झालेले असते!
कुंभ मेळ्याच्या निमित्ताने; तेथील साधूंच्या कडून आपण नामस्मरण शिकलो तर एरवी अलभ्य असणारा आपल्या अंतरात्म्यातील अमृताचा किमान एखादा थेंब तरी आपल्याला मिळतो आणि आपले जीवन चैतन्यमय, बनू लागते. अनेक छोट्या मोठ्या बाबी मनासारख्या झाल्या नसल्या, तरी एवढा “मोठ्ठा अमृताचा ठेवा” मिळाल्यामुळे आपण खरोखरीच कृतज्ञ राहतो आणि “नेहमी कृतज्ञ राहावे” ही साधू संतांची शिकवण आपल्यासाठी सुसाध्य बनते!
नामामृताच्या ह्या थेंबाची महती अशी की; आपल्याला स्पष्टपणे जाणवते की नाम हेच आपले गंतव्य आहे आणि नाम हेच आपले प्राप्तव्य आहे! नाम हेच आपले सर्वस्व आहे!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (7071)  |  User Rating
Rate It


Browse Archive