World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Jun21
गुरुंची अद्भुत शक्ती: डॉ. श्रीनिवास कशाळीक
गुरुंची अद्भुत शक्ती: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

शंका:
नामस्मरणाद्वारे अंतीम सत्याचा आणि अमरत्वाचा अनुभव कुणाला आणि केव्हा येईल, हे सांगता देखील येत नाही. त्याचप्रमाणे नामस्मरणाने समृद्धी देखील येतेच असेही नाही. त्यामुळेळे नामस्मरण करताना आपल्या चिकाटीची कसोटी लागते, आणि धीर सुटू शकतो हे खरं आहे ना?

समाधान:
होय. हे अगदी खरे आहे. आपण सारे; पुन्हा पुन्हा नामाच्या ( चैतन्याच्या) विस्मृतीत जातो आणि त्यामुळे; विषयांकडे आकर्षित होत राहतो, त्यांच्या भूलभूलैय्यात अडकत राहतो, हरवत राहतो आणि चैतन्याला पारखे होतो. इंद्रियगम्य स्थूल विषय आणि दृश्य विश्वाच्या आकर्षणाचा (म्हणजेच प्रारब्धाचा) जोर इतका जबरदस्त असतो की आपली धाव आपोआप चैतन्याच्या विरुद्ध दिशेला वळते! साहजिकच आपण भलतीकडेच भरकटत जातो! परिणामी; आपली अस्वस्थता काही केल्या कमी होत नाही आणि पूर्णत्व, सार्थकता आणि समाधान आपल्यापासून दूरच राहतात!

पण; काळजी करण्याचे कारण नाही. आपल्या इच्छे-अनिच्छेपलिकडे; विश्वचैतन्याची जननी आपली गुरुमाउली सर्व बऱ्या वाईट प्रसंगात आपल्याला सांभाळून आपल्याला चैतन्यामृतपान करवीत आहे. आपल्याकडून नामस्मरण आणि स्वधर्मपालन वाढत्या प्रमाणात करवीत आहे. सदभिरुची, सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार यांनी आपले व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन अधिकाधिक प्रमाणात भरून टाकीत आहे! नामस्मरण करता करता आपल्याला नक्कीच याचा अनुभव येतो!

श्रीराम समर्थ!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4434)  |  User Rating
Rate It


Browse Archive