World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Jul27
न्याय आणि नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
न्याय आणि नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

कोणतीही बाब पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर आपली प्रतिक्रिया काय आणि का होते? वाईट आणि बरी, योग्य किंवा अयोग्य, न्याय्य किंवा अन्याय्य, उच्च किंवा नीच ही सर्व विशेषणे आपण आपापल्या मर्यादित बुद्धीनुसार आणि पूर्वग्रहानुसार लावतो आणि त्यानुसार आपली मानसिक प्रतिक्रिया होते आणि आपल्या हातून कृती घडते.

पण अश्या प्रतिक्रियेमुळे महत्वाचे निर्णय, कायदे, नियम, संकेत आणि विशेषत:न्यायदान संकुचित आणि घातक बनतात.. ह्यामुळे समाजात बेदिली वाढते. द्वेष वाढतो. वैर वाढते. परिणामात: व्यक्ती आणि समाजाचा सर्वांगीण विकास रखडतो.

नामस्मरणाने आपण नामाच्या (सच्चिदानंदस्वरूप अंतरात्म्याच्या, ईश्वराच्या किंवा गुरुच्या) अधिकाधिक निकट जाऊ लागतो आणि ह्या कल्याणकारी प्रक्रियेमुळे हळूहळू आपल्या लक्षात येते की, प्रत्येक अणुरेणुच्या मागे आणि घटनेमागे ईश्वरेच्छा आणि ईश्वरी सत्ता असते. हे लक्षात आल्यामुळे आणि येत असतांनाच; आपल्या मनात ईश्वरी (मानवी पूर्वग्रहविरहित) इच्छेने आंतरिक समाधान वाढवणारी प्रतिक्रिया उमटते आणि आपल्याकडून समाधान वाढवणारी पूर्वग्रहविरहित आणि कल्याणकारी कृती घडते..

आपल्या नामस्मरणामुळे इतरांच्या मनामध्ये देखील ह्या प्रक्रिया घडतात आणि परिणामत: समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते.

समाजात; आणि विशेषत: सर्व प्रकारच्या सत्ताकेंद्रांत जेवढे नामस्मरण वाढेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात समाजामधील सर्व स्तरांवरील क्रिया आणि प्रतिक्रिया अधिकाधिक पूर्वग्रहरहित (न्यायपूर्ण) आणि म्हणून कल्याणकारक होतात आणि व्यक्ती आणि समाजाचा सर्वांगीण विकास वेगाने होऊ लागतो.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4539)  |  User Rating
Rate It


Browse Archive