World's first medical networking and resource portal

Articles
Category : All ; Cycle : September 2015
Medical Articles
Sep19
नामाची सत्ता! डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीक
नामाची सत्ता! डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: पुष्कळदा असा प्रश्न पडतो, की कुंभ मेळ्यामधील साधू सरकारच्या सहानुभूतीवर अवलंबून असतात. जर ते सत्याचे पुजारी असतात, तर मग त्यांच्याकडे एवढे सामर्थ्य का नसते? सत्यमेव जयते असे म्हणण्याला काय अर्थ आहे? खरी सत्ता कुणाकडे असते? त्यांच्याकडे की सरकारकडे?

शिक्षक: कुंभ मेळ्यातील साधक आणि साधू; सत्याचे पुजारी असतात, पथिक असतात. ते साक्षात्कारी असतात असे नव्हे. पण म्हणून सरकारच्या हातात सत्ता असते असे थोडेच आहे?
आपल्यापैकी काहीजणांनी राष्ट्रपतींचे निवासस्थान, पंतप्रधानाचे निवासस्थान, लोकसभा, इतर शासकीय कार्यालये इत्यादी सत्तेची केंद्रे पाहिली असतील. पण बाहेरून कितीही बडेजाव आणि भपका दिसला तरी त्या सत्ताकेंद्रामध्ये खरी सत्ता कुणाची चालते? ज्यांना आपण सर्वसत्ताधीश समजतो त्यांची? ते खरोखर सर्वसत्ताधीश असतात का?

राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर उच्चपदस्थांचे देह, त्यांची बुद्धी, त्यांचे विचार, त्यांच्या कल्पना, त्यांचे मन, त्यांच्या वासना हे सारे त्यांच्या अधीन असते का? त्यांची सत्ता त्यांच्या स्वत:च्या विचारांवर, भावनांवर आणि वासनांवर तरी चालते का? नाही! रोग, अपघात, वृद्धत्व, मृत्यू इत्यादिंवर त्यांची सत्ता चालते का? त्यांच्या शरीरातील हजारो प्रक्रियांवर त्यांचे नियंत्रण असते का? नाही! समाजातील वेगवेगळ्या प्रथा, रूढी, परंपरा, रीतिरिवाज किंवा एकूण समाजाच्या सामुहिक भावना, त्यांचे उद्रेक, समाजाचे आचार, यांवर त्यांचा अंमल चालतो का? नाही! भूकंप, वादळे, महापूर, दुष्काळ यांवर त्यांचा अंमल चालतो का? नाही! पृथ्वीबाहेरील विश्वात घडणाऱ्या असंख्य घडामोडींवर त्यांचे नियंत्रण असते का? नाही!
मग आपल्यावर, आपल्या सर्वांवर आणि ह्या अखिल विश्वावर कुणाची सत्ता चालते?

जे चैतन्य अजरामर आणि सर्वान्तर्यामी आहे त्याच्या जननीची! ही विश्वाची गुरुमाऊलीच व्यावहारिक दृष्ट्या भिन्न अशा वेगवेगळ्या रुपांनी आपल्याला पाळते, पोसते, सांभाळते आणि सर्वार्थांनी नियंत्रित करते!

नामस्मरण करता करता आपला संकुचित स्वार्थ कमी कमी होत जातो पण खूप खूप आणि अजरामर समाधान देणारा महान स्वार्थ साधतो! म्हणून ह्या मार्गाला परमार्थ मार्ग म्हणतात! ही सारी लीला चैतन्यसत्तेनेच घडून येते!

नामरूप असलेल्या आपल्या गुरुमाउलीशी अशा तऱ्हेने झालेल्या समाधानरूप समरसतेमध्ये समजते की; सदा सर्वदा आणि सर्वत्र; केवळ आपल्या गुरूची, ईश्व्रराची, अंतरात्म्याची,

परमात्म्याची, आंतरिक चैतन्याचे म्हणजेच नामाची ईच्छा आणि सत्ताच काम करते! यालाच आपण राम कर्ता असे म्हणतो


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (2264)  |  User Rating
Rate It


Sep19
नामस्मरण आणि सत्कार्य: डॉ. श्रीनिवास जनार्
नामस्मरण आणि सत्कार्य: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्याविषयी बोलताना; नामस्मरणात केलेले कार्य सत्कारणी लागते आणि नामविस्मरणात केलेले वाया जाते; असे आपण म्हणालात. पण पुष्कळदा सामान्य माणसे यासंदर्भातील सरकारी धोरणांच्यावर आपापली मते प्रदर्शित करतात, टीका-टिप्पणी करतात. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?

शिक्षक: आपण सर्वच जण सामान्य आहोत. आपल्याला कोणत्याही गोष्टीची थोडीफार जरी झळ लागली तरी आपण तक्रार करतो आणि थोडासा जरी फायदा झाला तरी सरकारचा उदो-उदो करतो. आपली मुले-बाळे, आपले आप्त-स्वकीय, आपले मान-अपमान, आपला फायदा-तोटा; ह्यांभोवती आपली मते फिरतात. त्यामुळे; आपणा सर्वांना लोकशाही कितीही श्रेष्ठ वाटत असली तरी; आपण व्यक्त केलेली प्रत्येक टीका-टिपण्णी आणि व्यक्त केलेले प्रत्येक मत विचारात घ्यायच्या लायकीचे असतेच असे नाही, हे इतरांप्रमाणेच आपल्याला देखील पक्के माहीत असते.

विद्यार्थी: याचा अर्थ; सामान्यांची मते लक्षात घेतली जाऊ नयेत असा घ्यायचा का?

शिक्षक: सामान्यांची मते नक्कीच लक्षात घेतली जायला हवीत. पण त्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने; त्यांच्या मतांना किती महत्व द्यायचे हे नामस्मरण करणाऱ्या शासकांना बरोबर कळते. ते लोकापवाद किंवा लोकप्रियता यांनी दबून वा बहकून जात नाहीत. लोकप्रतारणा करीत नाहीत आणि लोकानुनय देखील करीत नाहीत. कारण; नामस्मरणाद्वारे; चित्त शुद्ध होत चाललेले वा झालेले शासक; जेव्हां एखादे धोरण आंखतात, एखादा विचार करतात, एखादा संकल्प करतात, एखादी योजना आखतात, किंवा एखाद्या योजनेची अंमलबजावणी करतात, तेव्हां ते सारे नि:स्वार्थ भावनेतून, भेदभाव रहित वृत्तीतून होत असते. ते सारे थेट गुरुमार्फत, विश्वचैतन्याच्या जननीमार्फत वा ईश्वरामार्फत घडत असते. त्यामुळे ते चैतन्याकडे वा ईश्वराकडे नेणारे असते. आणि म्हणून ते विश्वकल्याणाचेच असते. जेव्हा असे लोक; शस्त्रसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता, आरोग्यसत्ता, उद्योगसत्ता, शिक्षणसत्ता अशा सर्व सत्तास्थानी येतात आणि राज्य करतात, तेव्हां त्या राज्यालाच रामराज्य म्हणतात.
कुंभ मेळाच नव्हे तर इतर यात्रा व उत्सवांबद्दल निस्वार्थपणे टीका-टिप्पणी करण्यासाठी व लोकशाही खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी आणि बळकट करण्यासाठी, आपल्यासारख्या सामान्य लोकांचे विचार देखील नामस्मरणाच्या योगाने; संकुचित कोशातून बाहेर आले पाहिजेत. अशा तऱ्हेने आपण निस्वार्थी आणि विशाल बनलो तरच; चांगल्या नेतृत्वाला समजून घेऊन बळ देऊ शकू किंवा स्वत: चांगले नेते बनू शकू!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1891)  |  User Rating
Rate It


Sep19
शेतकऱ्यांच्या अडचणी : डॉ. श्रीनिवास जनार्द
शेतकऱ्यांच्या अडचणी : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्यामध्ये होम हवन इत्यादींसाठी किंवा अभिषेकासाठी जी वेगवेगळ्या द्रव्यांची नासाडी होते, ती समर्थनीय आहे का? हा पैसा गोरगरीबांच्या आणि शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी वापरावा असे काही लोकांना वाटते. ते चूक आहे का?

शिक्षक: होम, हवन, अभिषेक इत्यादींचा विचार करताना देखील केवळ पाश्चिमात्य किंवा जडवादी विचारांच्या पगड्यामुळे आपला बुद्धीभेद होतो. अशा विचारांमुळे आपण प्रत्येक गोष्टीकडे वरवरच्या नफानुकसानीच्या उथळ दृष्टीकोनातून पाहतो. पूर्वग्रह विरहित समतोल वृत्तीने आणि सखोल दृष्टीने पाहिले तर; ह्या बाबींचे योग्य मूल्यमापन करता येईल. ते तसे करूनच त्यांविषयीची धोरणे ठरवायला हवीत. होम, हवन, इतर उपासना मार्ग आणि विशेषत: नामस्मरण; ह्यांचा आपले आत्मसामर्थ्य वाढण्यासाठी, आंतरिक समाधानासाठी म्हणजेच उर्ध्वगामी उत्क्रांतीसाठी किती उपयोग होतो हे नीट अभ्यासले पाहिजे. तरच शेतकरी आणि इतर गोरगरीबच नव्हेत तर आपल्या सर्वांनाच आंतरिक चैतन्य आणि बाह्य परिस्थिती; दोन्हींमध्ये प्रगती साधणे शक्य होईल, जे अत्यंत आवश्यक आहे. सरकार आणि आपण सर्वांनी; ह्याच दृष्टीने काम करायला हवे.

होम, हवन, अभिषेक इत्यादी बाबींचा मी सखोल अभ्यास केलेला नाही आणि तसा तो न करता, आपल्या पूर्वजांना मूर्ख, निर्दय वा दुष्ट समजून त्यांची आणि ह्या सर्व पूजा विधींची निंदा, निर्भत्सना व निषेध करणे मला योग्य वाटत नाही. पण त्याचबरोबर; त्यांचे सरसकट समर्थन करणेही योग्य वाटत नाही. ह्या सर्व बाबींचा योग्य तो निवाडा होण्यासाठी नामस्मरण सार्वत्रिक व्हावे असे मला वाटते. तसे झाले तर आपल्यातील अनेकांच्या द्वारे; अनेक गूढ आणि रहस्यमय बाबींचा खुलासा होऊ शकेल असे मला वाटते.

विद्यार्थी: जीवनाच्या विविध अंगांकडे नि:पक्षपाती, सकारात्मक आणि विधायक दृष्टीने पाहण्यासाठी नामस्मरण अत्यंत महत्वाचे आहे हे मला पटते. पण ते वरपांगी भासते तेवढे सोपे नाही; खरे ना?.

शिक्षक: होय. एका दृष्टीने नामस्मरण हे अगदी सोपे आहे. पण त्याबद्दल गोडी आणि निष्ठा उत्पन्न होण्याच्या दृष्टीने पाहता, ते अत्यंत कठीण आहे. कारण, त्याला चव, रंग, सुवास, मुलायम स्पर्श, सुरेल कर्णमधुरता; काहीच नाही. ते असे सोपे आणि उपाधीशून्य असल्यामुळे त्याबद्दल आवड आणि आस्था तयार होणे कठीण असते. एवढेच नव्हे तर नामस्मरणाने आपला अहंकार देखील फुलत नाही! त्यामुळेच नामस्मरण करताना कंटाळा येतो, खूप शंका येतात आणि खूप विकल्प येतात, जे कितीही चर्चा केली तरी नाहीसे होत नाहीत; तर नामस्मरण केल्यानेच नाहीसे होतात.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1820)  |  User Rating
Rate It


Sep19
गरीबी आणि दु:स्थिती: डॉ. श्रीनिवास जनार्दन क&
गरीबी आणि दु:स्थिती: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: केवळ कुंभ मेळ्यामध्येच नव्हे तर आपल्याकडे जी वेगवेगळी देवस्थाने आहेत तिथला भपका देखील पुष्कळदा खटकतो.

शिक्षक: हे अगदी खरे आहे. आपल्या देशात कमालीची गरीबी आहे हे खरे आहे. त्यावर इलाज होणे अत्यावश्यक आहे हे देखील खरे आहे. पण समजा; असा झगमगाट बंद केला तर काय होईल? गरीबी दूर होईल? झगमगाटावरील पैसे गरीबांना वाटले तर ते श्रीमंत होतील? त्यांचे कल्याण होईल? त्यांचे कल्याण होणे म्हणजे तरी काय? केवळ पैसे मिळणे आणि ते वाट्टेल तसे उधळता येणे म्हणजे कल्याण होणे का?

विद्यार्थी: केवळ पैसे मिळणे म्हणजे कल्याण नव्हे. पण जेव्हां परिस्थिती आणीबाणीची आणि गंभीर असते; आणि समस्या जीवनमरणाची असते; तेव्हां गरीबांना ताबडतोब आणि थेट मदत मिळायला नको का? आपली परिस्थिती गंभीर नसल्यामुळे आपण गरीबांच्या हलाखीचा विचार करू शकत नाही! आपण फक्त गरीबीच्या मूळ कारणांचाच आणि केवळ त्यांवरील उपायांचाच विचार करतो.

शिक्षक: केवळ मूळ कारणांचा आणि त्यावरील उपायांचा विचार करणे अवास्तव आहे. पण; गरीबांना ताबडतोब मदत होणे हे जसे महत्वाचे आहे तसे; गरीबीची मूळ करणे दूर करणे देखील अत्यावश्यक आहे. खरे म्हणजे प्रत्यक्षात हे देखील एक चक्र आहे! गरीबीची समस्या केवळ गरीबीपुरती मर्यादित नाही. गरीबीची समस्या हे खरे पाहता दु:स्थितीची समस्या आहे. ती श्रीमंतीशी देखील अविभाज्यपणे निगडीत आहे. आपल्या गरीबी आणि श्रीमंती; दोन्हींच्या मुळाशी तमोगुण आणि रजोगुण असून; त्यामुळे आपली गरीबी आणि आपली श्रीमंती दोन्हीही खऱ्या अर्थाने दु:स्थित बनल्या आहेत; आणि परस्पर पूरक आणि परस्पर पोषक बनल्या आहेत! आपण सर्वचजण; गरीब असो वा श्रीमंत; दु:स्थितीतच आहोत! म्हणूनच आपल्या दु:स्थितीचे मूळ कारण (तमोगुण आणि रजोगुण) आणि तात्कालिक परिस्थिती या दोन्हींवर एकदमच उपाय करण्यासाठी नामस्मरण आणि तज्जन्य स्वधर्म हेच हवेत! केवळ तात्पुरत्या मदतीची ठिगळे लावून तात्पुरता आणि वरवरचा फायदा होईल खरा; पण केवळ तात्पुरती मदतच करीत राहिले तर तमोगुण आणि रजोगुण फोफावत जातील; आणि आपण आळस, बेपर्वाई, लाचारी, बेशिस्त, लबाडी, निर्दयता, वखवख, दिखाऊपणा, उथळपणा ह्यात तडफडत राहू! किंबहुना आज हेच चालले आहे!
नामस्मरणाने आंतरिक चैतन्याचा अनुभव येईल आणि आंतरिक सामर्थ्याची प्रचीती येईल. त्यातूनच स्वत:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी धैर्याने जगण्याचा आणि झटण्याचा उत्साह येईल. स्वधर्म प्रत्यक्षात येईल. जेव्हां जीवनाची सर्व क्षेत्रे आणि सर्व स्थळे; नामस्मरणाने भरून आणि भारून जातील; तेव्हां मंदिरांच्या एकांगी आणि अतिरिक्त झगमगाटाची गरज राहणार नाही.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1782)  |  User Rating
Rate It


Sep19
नामस्मरण करणेच महत्वाचे: डॉ. श्रीनिवास जना
नामस्मरण करणेच महत्वाचे: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: लहान मुलाने औषध घ्यावे म्हणून ज्याप्रमाणे मधाचे बोट लावतात तसेच नामस्मरणामध्ये गोडी निर्माण व्हावी म्हणून; कुंभ मेळ्यासारखे मेळे, तीर्थयात्रा, वाऱ्या, उत्सव, सण, व्रते, महापूजा, नैवेद्य, महाप्रसाद, भोग, भजने, आरत्या; इत्यादींची योजना केली गेली आहे का?

शिक्षक: निश्चित! “देव”, “परमात्मा”, “ब्रह्म”, परमेश्वर; “राम”, “कृष्ण”, “शिव”, इत्यादी वेगवेगळ्या शब्दांचा किंवा नावांचा गर्भितार्थ एकच आहे आणि तो म्हणजे नामाच्या द्वारे जी वस्तू ओळखली जाते ती अनादी आणि अनंत वस्तू. ह्या अर्थाने “नाम” हे अनादी आणि अनंत आहे. ते सर्वव्यापी आहे. सर्वांच्या अंतर्यामी आणि सर्वांच्या बाहेर आहे. त्याची सत्ता बलवत्तर आहे असे संत म्हणतात.
परंतु; धर्म हा सर्वांच्यासाठी असल्यामुळे; आणि आपण सर्वसामान्य लोक; विषय सुखात रमत असल्यामुळे; अखंड नामस्मरण करणे प्रत्येकाला शक्य नाही. हे लक्षात घेऊनच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ ठरवले गेले आणि स्वीकारले गेले. त्याअनुरोधानेच; कुंभ मेळ्यासारखे मेळे, तीर्थयात्रा, वाऱ्या, उत्सव, सण, व्रते, महापूजा, नैवेद्य, महाप्रसाद, भोग, भजने, आरत्या; इत्यादीं प्रत्येक मनोवेधक, रंजक, आकर्षक आणि भव्य दिव्य बाबीत नामस्मरण ठेवून; क्रमाक्रमाने जीवनातले सर्व रस उपभोगत अखेर; अंतीम सत्य अनुभवण्याची सोय केली गेली.
एक लक्षात ठेवणे जरूर आहे. अंतीमत: नामस्मरणात रमलेले साधू; पराकोटीचे निस्पृह असून वस्तुनिरपेक्ष आनंदच उपभोगत असतात. त्यांना कोणत्याही बडेजावाची आणि बाह्य उपचारांची गरज नसते. आंतरिक चैतन्याने ओतप्रोत भरल्याने आणि सर्व सामर्थ्य अंगी असल्याने; ते कोणाचेच मिंधे नसतात. त्यांना कसलीच गरज नसते! ह्या परमोच्च अवस्थेला “नामात गोडी येणे”, किंवा “नामात रमणे” म्हणतात!

विद्यार्थी: याचा अर्थ; सर्वात श्रेष्ठ आणि मुख्य जर काही असेल तर नामस्मरण आहे, नामाची गोडी लागणे आणि नामात रमणे आहे. पण हे विधान सर्वांना लागू पडते का? जरा समजावून सांगा ना!

शिक्षक: अर्थातच! वीजपुरवठा खंडित झाला की ज्याप्रमाणे सर्वच बल्ब प्रकाशहीन आणि निरुपयोगी बनतात त्याप्रमाणे चैतन्यविस्मृतीमुळे; आपण सर्वच जण त्या चैतन्याला पारखे होतो आणि निस्तेज आणि दुबळे बनतो. विशेष म्हणजे; त्या चैतन्याची तहान आपल्या सर्वांना लागलेली असताना देखील; त्याच्या विस्मृतीमुळे आपण तृषाक्रांत राहून “रडत” असतो, किरकिरत असतो! चैतन्य प्रत्येकात आहे, त्याची तहान सर्वांना आहे आणि त्याच्या विस्मृतीची बाधाही सर्वांना आहे; म्हणूनच चैतन्यस्मरणाचा वा नामस्मरणाचा मार्ग आपल्या सर्वांसाठी आहे!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1795)  |  User Rating
Rate It


Sep19
नामस्मरण हा सरळ रस्ता: डॉ. श्रीनिवास जनार्द&#
नामस्मरण हा सरळ रस्ता: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: सर, कुंभ मेळ्याच्या निमित्ताने अनेक साधू विलक्षण साधना करीत असताना दिसतात. सत्य जाणून घेण्यासाठी अशा कठीण साधनांची आवश्यकता आहे का?

शिक्षक: त्यांच्यासाठी ती आवश्यक आहे की नाही हे आपण कोण ठरविणार? प्रत्येक व्यक्ती आणि तिचे संचित आणि प्रकृती भिन्न असते. जडण घडण वेगवेगळी असते. संस्कार वेगळे असतात. आर्थिक, धार्मिक, सामाजिक, भौगोलिक इत्यादी प्रकारची पार्श्वभूमी वेगवेगळी असते.
मुलाला कशाची गरज आहे हे आईला ज्याप्रमाणे कळते आणि ती मुलाला दूध देते; त्याप्रमाणे आम्हाला आमच्याच हृदयातील चैतन्याची तहान लागली आहे हे आमची (आमच्यातल्या चैतन्याची) जननी ओळखते. पण विचित्र बाब अशी की आम्हाला आमची तहानही कळत नाही आणि समोर आलेल्या चैतन्याचे महत्वही समजत नाही! किंबहुना ते चैतन्य ओळखण्याची बुद्धी आणि ते पिण्याची क्षमताच आमच्यामध्ये नसते! त्यामुळे समोर आलेले चैतन्य आम्ही लाथाडतो! पण आमचा हटवादीपणा, आक्रस्ताळेपणा, नतदृष्टपणा पदरात घेऊन, कधी गोंजारून तर कधी वेळ पडल्यास धाकदपटशाने वा आम्हाला शिक्षा देऊन आमची माउली आमची तहान भागवतेच! मातृत्व हे वैश्विक असले तरी प्रत्येकाच्या स्थूल देहाची आई वेगवेगळी असते, हे जसे खरे, तसेच आपल्याला चैतन्यपान घडवणारी आपल्यातल्या चैतन्याची आई देखील, जरी मूलत: एकच असली तरी, व्यावहारिक दृष्ट्या वेगवेगळी असते. हिलाच आपण कधी “कुलदेवता”, कधी “इष्टदेवता” तर कधी “आपली गुरुमाउली” म्हणून ओळखू लागतो ! याकारणास्तव आपल्या परंपरेनुसार आलेली साधना आणि उपासना आपल्यासाठी सुलभ आणि परिणामकारक असते. इतरांच्या उपासनेशी आपल्या उपासनेची तुलना करणे योग्य ठरत नाही आणि उपयुक्तही ठरत नाही. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर हीच माझी गुरुमाउली. त्यांच्याच चरित्र आणि वाङमयाद्वारे; जीवन म्हणजे अजरामर वैश्विक चैतन्याचा अंश आहे आणि हे चैतन्य म्हणजेच नाम असून या चैतन्याचा अनुभव घेण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे नामस्मरण आहे हे मला नीट समजू लागले. विशेष म्हणजे नामस्मरण हा सर्वंकष वैयक्तिक आणि सामाजिक कल्याणाचा राजमार्ग आहे; आणि नामस्मरणाशिवाय शाश्वत समाधान, सार्थकता आणि पूर्णत्व साध्य होऊ शकत नाहीत याची खात्री झाली. बाळाचे भूकेलेपण, त्याचे रडणे आणि आईचे त्याला दूध पाजणे हे तीनही एकत्र आले की उभयतांची तृप्ती होते! श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर ह्या माउलीने रामनामाचे अमृतपान करवून अशी तृप्ती साध्य केली.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1799)  |  User Rating
Rate It


Sep19
तणावमुक्तीचा अस्सल अनुभव: डॉ. श्रीनिवास जन
तणावमुक्तीचा अस्सल अनुभव: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळा पवित्र होईल आणि निरुपद्रवी होईल आणि चैतन्यप्रभात होईल ही भाकिते भ्रामक वाटतात. कारण जगामध्ये मन प्रसन्न करणाऱ्या घटनांबरोबरच मन खिन्न करणाऱ्या असंख्य घटना देखील हरघडी आढळतात.

शिक्षक: खरे आहे. म्हणूनच; आपली फसवणूक टाळण्यासाठी आपल्या अंतर्यामी डोकावले पाहिजे. तसे केले असता चैतन्यप्रभातीच्या ह्या दृश्य आणि ढोबळ लक्षणांव्यतिरिक्त; आपल्याला; आपल्या स्वत:च्या अंतर्यामी; नामरुपी चैतन्यसूर्य उगवून तळपताना दिसतो! सूर्य ज्याप्रमाणे सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असतो, कुठल्यातरी कोपऱ्यात नाही, त्याप्रमाणे नामसूर्य आपल्या अखिल जीवनाच्या केंद्रस्थानी असून आपले अंतर्बाह्य सर्व जीवन संचालित आणि प्रकाशित करतो आहे हे स्पष्ट दिसते. ह्या नामसूर्याच्या दर्शनातून चैतन्यप्रभातीची खरीखुरी आणि अस्सल प्रचीती येते.

कला, व्यवस्थापन, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, शेती इत्यादी; जीवनाची सर्व ज्ञानक्षेत्रे अंतर्यामीच्या चैतन्यातून उगम आणि स्फुरण पावून चैतन्याद्वारेच नियंत्रित होत आहेत आणि विश्वहितकारी होत आहेत ह्याची हरघडी प्रचीती राहते.

जगभरातल्या महानुभावांना अभिप्रेत असलेला आणि गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानी अधिकारवाणीने पुरस्कृत केलेला विश्वकल्याणकारी स्वधर्म; प्रगट होण्यासाठी आज प्रत्येकाच्या हृदयात उसळी घेत आहे! वेगळ्या शब्दात सांगायचं तर; वेगवेगळ्या कंपन्या, कारखाने, दवाखाने, दुकाने, प्रयोगशाळा, बालवाड्या, आश्रमशाळा, विद्यालये, महाविद्यालये, रुग्णालये, दवाखाने, सरकारी कार्यालये इत्यादी सर्वच ठिकाणी सत्प्रेरणा, सद्बुद्धी, सद्विचार, सदभिरुची, सद्भावना, सद्वासना, सत्संकल्प, सत्कर्म आणि सदाचार हे सर्व; वैयक्तिक आणि सामाजिक अशा सर्वच पातळ्यांवर व्यक्त होण्यासाठी सर्वांतर्यामातून उसळी घेत आहेत!

माझा एक मित्र सतत नामस्मरण करीत असतो. ह्या माझ्या मित्राचा अनुभव असा की तो एकदा घरासमोरच्या उद्यानात फिरत असताना त्याला स्पष्टपणे जाणवले की त्या बागेतल्या प्रत्येक झाडात आणि पानाफुलात नामस्मरण चालू आहे! हा अनुभव काही त्याचा एकट्याचाच नाही! मनाची किंवा जाणीवेची सूक्ष्मता आणि संवेदनाक्षमता आल्यानंतर अनेकांना हा अनुभव आल्याचे दाखले आहेत. या अनुभवाचा मथितार्थ असा की आपल्या वैयक्तिक इच्छे-अनिच्छेपलिकडे चैतन्ययोगाची ही साधना आणि आविष्कार सर्वान्तर्यामी चालू आहे! नाम हे चैतन्यदायी अमृत आहे, किंवा चैतन्यामृत आहे. आपले अंतर्बाह्य व्यापणाऱ्या चैतन्यामृतामुळे आपला स्वत:चा स्वत:शी असलेला आणि स्वत:चा इतरांबरोबर चालणारा संघर्ष संपुष्टात येत जातो. आपल्या आणि इतरांमधल्या आंतरिक एकात्मतेची गोडी अनुभवाला येते.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1737)  |  User Rating
Rate It


Sep19
तणावाचे बळी की आनंदाचे वारस?: डॉ. श्रीनिवास ज
तणावाचे बळी की आनंदाचे वारस?: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्यामध्ये जमीन, पाणी, वीज, शौचकूप, स्नानगृहे इत्यादी अनेक सोयी सरकारी पैशातून म्हणजेच कर भरणाऱ्या जनतेच्या पैशातून पुरविल्या जातात. हीच बाब इतर यात्रांच्या आणि सार्वजनिक उत्सवांच्या बाबतीत देखील खरी आहे. धर्माचे रक्षण करण्यासाठी हे सर्व लागते का?

शिक्षक:. तमोगुण आणि रजोगुण वाढल्यामुळे वेड, वासना, आवडी, छंद, लहरी, फॅशन्स, व्यसने, विकृती; अशा बाबींसाठी अब्जावधी रुपये खर्च होत आहेत. संकुचित स्वार्थापायी फसवणे आणि फसले जाणे; हे सार्वत्रिक झाले आहे. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब कुंभ मेळ्यात देखील पडते आहे.

जोपर्यंत नामस्मरण सर्वत्र पसरत नाही आणि झिरपत नाही, तोपर्यंत कुंभ मेळ्यामध्ये देखील आत्मसाक्षात्कारी निस्पृह संत महंत फार मोठ्ठ्या प्रमाणात सापडणे कठीण आहे. किंबहुना तोपर्यंत; कुंभ मेळ्यामध्ये देखील थकले-भागलेले, चुकले-माकलेले, गोर-गरीब, रंजले-गांजलेले, पोटासाठी वणवण करणारे लोकच जास्त आढळणे साहजिकच आहे.

ज्या अजरामर आंतरिक चैतन्याची हाक (Inner Voice) आपल्याला ऐकू येत नाही आणि ज्याच्यापासून तुटल्यामुळे आपण अचेतन आणि मरतुकडे बनलो आहोत, त्या अनादी, अनंत, सर्वव्यापी तसेच सर्वांच्या अंतर्यामी आणि बाहेर असलेल्या सच्चिदानंद “वस्तु”ला ओळखणे, समजणे, आठवणे आणि हळु हळु त्या “वस्तु”शी तद्रुप होणे; हा सर्व कुंभ मेळ्यातील आणि त्याच्या बाहेरील सर्वच दुरवस्थेवरील इलाज आहे. ह्या अनादी अनंत सच्चिदानंद वस्तूला ओळखण्याचे, समजण्याचे, आठवण्याचे आणि हळू हळू त्या वस्तुरूप होण्याचे अनादी साधन; ह्या वस्तूच्या नावाचे म्हणजेच नामाचे स्मरण म्हणजे नामस्मरण आहे.

विद्यार्थी: तुमच्या मते; नामस्मरणाच्याद्वारे वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवरील इतर विकृती ज्या प्रमाणात कमी होत जातील; त्या प्रमाणात कुंभ मेळ्यांचे स्वरूप देखील अधिक पवित्र आणि निरुपद्रवी होईल यात शंका नाही?

शिक्षक: होय. मला निश्चितपणे तसे वाटते.

विद्यार्थी: हे तुमचे भाकीत आहे?

शिक्षक: ही आपल्या सर्वांच्या अंतर्यामी राहून सदैव आपली काळजी घेणाऱ्या नामरूप चैतन्याची म्हणजेच आपल्या सर्वांच्या गुरूदेवांची कृपा आहे! प्रत्येकाच्या गुरुचे व्यावहारिक नाव गाव वेगवेगळे असले तरी प्रत्येकाच्या हृदयात जो नामरूप गुरु असतोच, त्याच्याच कृपेने आपल्या सर्वांना; नामस्मरणाच्या द्वारे होणारी चैतन्यप्रभात आणि स्वधर्म सूर्याचा उदय आणि त्यांचा कल्याणकारी प्रभाव यांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1667)  |  User Rating
Rate It


Sep18
Stress and Family Life
In our modern life, stress is an indispensable part. Career, jobs, studies, incomes, business, money, property- all are associated with some sorts of stress. The problem gets exaggerated when it affects the family life. Because, at the end of the day, we all want to enjoy a happy family life. And a family life has its sense when the husband and the wife are in harmony. Needless to say, that a family is incomplete without a kid.

How stress affects family life? Effect of stress is not limited to mind. It has serious effects in the body. It affects blood circulation and the heart. It puts pressure on nerves. It also alters the blood sugar level. And he end result is diabetes, hypertension (high blood pressure) and heart diseases. Ultimately these diseases affect all the organs of our body. Some people try to get rid of stress by smoking and alcohol. These will simply put burden on already affected heart and blood.

Stress also alters important hormone levels in our body. The hormones needed for basic reproductive function (sex, conception and pregnancy) are either increased or decreased. Prolactin hormone is increased. Normally prolactin is needed to secrete milk from breast to fed the baby. But abnormally increased prolactin leads to milk secretion from breast (even without pregnancy) and irregularities in periods. Very high prolactin may even lead to problems with ovulation (at middle of each period, the egg gets released from ovary) and as a result, the woman cannot conceive a baby. Even in male, high prolactin leads to difficulty in erection of penis. In some male, it can lead to gynaecomastia (growth of male breast). Excessive high dose of prolatin leads to loss of sex desire in male and interferes with spermatogenesis (sperm production).

Apart from increasing prolactin, stress can directly affect the hormones secreted from the pituitary gland of both male and female, the testes in male and the ovaries in female. As a result, all the reproductive functions get disturbed leading to problems in sex (loss of desire in both male and female, problems in erection and ejaculation in male), irregular periods in female and ultimately pregnancy cannot occur.

The diseases occurring as a result of stress (diabetes, hypertension etc) also affect the normal functions of ovaries causing irregular periods, even no periods at all. There may be problems in ovulation and thus difficulties in achieving pregnancy. Even if pregnancy occurs, it may be aborted because of these diseases. Similarly in male, diabetes and hypertension will cause sexual dysfunction and will affect sperm production.

The lifestyles accompanying stress are also responsible for harmful effects on family life. Smoking and alcohol have been mentioned earlier. Stress may be associated with abnormal weight gain and that will affect the woman’s life in badly manner. There will be disturbances in periods, ovulation problems, infertility and even pregnancy loss. Sitting for long time while driving or keeping laptops on laps, will increase the temperature of scrotum in male and thus will decrease the sperm production.

Again there is a vicious cycle- stress leads to family problems like problems in sex and in having pregnancy. That will in turn increase pressures from family (especially in-laws) and the society. This will simple aggravate the stress.
So, what can be done to avoid these problems? The answer seems to be simple- that is avoiding stress. But it’s very easy to say and difficult to commit. First thing is try to bring stress at home just keep it at your workplace. Avoid smoking and cut down alcohol consumption. Avoid sitting long time in front of computers and take periodical rests when you are working continuously. The rest does not mean that you have to lie down in bed; just have a short walk. Start exercise that will keep you healthy and reduce your stress. Yoga is an Indian culture that taught the Western world how to reduce stress. Take plenty of water and green vegetables and fruits. Avoid fast food. Always put on comfortable dresses. And if all of these do not work, try if you can do something to avoid the stress- like changing the workplace, talking directly to your co-employees or the employer. If still all these cannot help, consult psychological counselor. A timely counseling will reduce stress significantly. In very few cases, drugs may be needed to reduce stress. But remember, drugs can only be useful if you are trying all the other measures. Simple dependence on drugs won’t help much.

Now regarding family problems associated with stress follow simple measures. Often we feel embarrassed to discuss these issues. Try to enjoy time of personal intimacy to the fullest. Don’t think of any problems during that time. If still there are problems, don’t hesitate to take medical help. And please remember, the drugs used to solve sexual problems may have side effects. So, these should be taken only after medical consultation.
In case of female, maintain optimum weight. Avoid fast food, alcohol and smoking. If periods are irregular, maintain a menstrual diary. Consult a doctor to find out if there are some serious issues associated with these problems (like hormonal problems, thyroid diseases, even some tumours). You doctor will then decide the best treatment for you. If there are low desire for sex, don’t hesitate to take help of doctor. It may be a symptom of hormone deficiency that can affect your different systems (like bone, heart, blood etc). Now a days, there are lots of treatment options available for this.

For male, if there is low desire, consult your doctor to find out the cause of this problem. At the same time, avoid any anxiety, alcohol and smoking. Sometimes there are problems with erection. Instead of trying drugs shown in media or newspaper, feel free to talk to your doctor; because erection problem may be caused by some serious issues like heart disease, diabetes etc. So, if you have erection problems, consult doctor. He/ she will counsel you and give you the best treatment. Now if the problem is with ejaculation (like early loss of semen or very low semen), that issue can also be solved in the same way.

What’s about infertility problems? Stress and infertility are inter-related, as described before. Now, if there is problem with fertility, please remember few facts. Even in totally healthy couples, the chance of pregnancy after regular intercourse in fertile period (in the middle of menstrual cycle, usually) is only 20%. Though it appears disappointing, majority of couples conceive in course of time. So, couples are requested to report to doctor only if they tried regularly for one year without any protection. Then your doctor will assess you and try to find out the problem. And again, treatment of infertility is also depending on chance. Hat means we have to increase the chance above the natural chance (which is 20%). So, even one treatment fails, there is enough scope, so no need to lose hope. In other words, there is no need to increase the stress.

So, stay healthy, keep your mind healthy by avoiding stress and keep your family relationship totally stress-free.


Category (Fertility, Pregnancy & Birth)  |   Views (2774)  |  User Rating
Rate It


Sep15
Care before Pregnancy- The "Pre-conceptional Care"
Most of us have an idea that the couple should go to gynecologist only after they fall pregnant or when there is difficulty in conceiving. But we all know that "PREVENTION IS BETTER THAN CURE". Then why should not we take precaution to avoid complications in pregnancy so that we can have healthy mother and healthy baby.

Some of the diseases can manifest during pregnancy, like some diseases of heart, blood pressure, blood sugar etc. But if the couple comes to doctor when they are planning pregnancy, then we can diagnose it and start treatment so that pregnancy can be safe to both the mother and the baby.

On the other hand, some pre-existing disease may turn serious during pregnancy and endanger life of both mother and baby. This includes thyroid disease, hypertension, epilepsy, renal disease, cardiac disease etc. If taken care of properly, the disease can be controlled before pregnancy so that the risk can be reduced. Again all the drugs are not safe for the baby. So, if treated before pregnancy, the mother can be put on safer but effective drugs before pregnancy.

Some diseases may run in family and often goes undetected and can affect the baby. Thlassaemia, hemophilia etc are the best examples. So, if the couple comes to us before pregnancy, we can screen them to diagnose whether they are bearer of the disease or not and then we can take care to prevent birth of defective baby.

Some diseases indicate that there may be problems in having pregnancy, like problems in periods or abdominal pain in female, sexual problems in male and female etc. If treated properly, it will avoid unnecessary time wastage for trying for pregnancy.

The woman can be instructed how to remain healthy to have normal baby, before pregnancy. She can be advised some drugs (like folic acid), can be asked to avoid harmful drugs and substances (like drugs, excessive vitamin A, excessive vitamin D, excessive caffeine, smoking etc). Even the husband can be asked how to improve his fertility (by avoiding heat exposure to his scrotum).

Again some infections can be dangerous for the baby. So, before pregnancy we can treat the women for the infections and in some cases we can vaccinate her to prevent infection.

"A STITCH IN TIME SAVES NINE". So, why don't you consult your gynecologist when you are planning for pregnancy? have smooth journey throughout pregnancy and enjoy parenthood.


Category (Fertility, Pregnancy & Birth)  |   Views (2704)  |  User Rating
Rate It


Browse Archive