World's first medical networking and resource portal

Articles
Category : All ; Cycle : July 2016
Medical Articles
Jul17
प्रेम आणिनामस्मरण डॉ.श्रीनिवास कशाळीकर
प्रेम आणि नामस्मरण डॉ.श्रीनिवास कशाळीकर

निर्भेळ, शुद्ध, सर्वव्यापी, कालातीत आणि अजरामर प्रेम कोणत्याही बाह्य लक्षणावरून निश्चित करता येत नाही. उदा. पत्रापत्री, फोनाफोनी, एसएमएस, भेटीगाठी, दंडवत, नमस्कार, मानसन्मान, गळाभेटी, आलिंगन, आहेर, देणगी, बक्षीस, गिफ्ट, प्रेझेंट, सेवा, आश्वासने, मधुर भाषण, स्तुती, ओढ, हास्य, अश्रू, लाड करणे, गोंजारणे, इत्यादी! ही लक्षणे; वरवरची, दिखाऊ, भ्रामक, आणि फसवी असू शकतात.

संकुचित स्वार्थरहित, पूर्वग्रहरहित, भेदभावरहित, भितीरहित, दबावरहित, द्वेषरहित, पूर्वअटरहित; विचार, भावना आणि व्यवहार; म्हणजे मूर्तिमंत निर्भेळ प्रेम, शुद्ध प्रेम! असे प्रेम सर्वव्यापी, कालातीत आणि अजरामर असते. पण; वरील सर्व शब्दांपलीकडील आणि अनिर्वचनीय असे प्रेम; केवळ सद्गुरूचे असते आणि ते चिरंतन अर्थात अजरामर असते.

ह्या अमृताचा अगदी अंशत: अनुभव देखील जीवन झळाळून टाकणारा असतो आणि तो येण्यासाठी चित्तशुद्धी होत राहण्याची आवश्यकता असते. ही चित्तशुद्धी नामस्मरणाद्वारे होत जाते आणि ती चित्तशुद्धी देखील कोणत्याही बाह्य लक्षणाने ओळखता येत नाही आणि दाखविता येत नाही!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (2032)  |  User Rating
Rate It


Jul15
महत्व नामसंकल्पाचे: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
महत्व नामसंकल्पाचे: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

नामस्मरण करणे ही प्रवाहाविरुद्ध पोहण्याची क्रिया आहे. मनाच्या मुळाशी जाण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे आपल्या अंतर्मनातील कितीतरी विचार, भावना, वासना; या प्रक्रियेबद्दल संशय आणि कंटाळा उत्पन्न करतात. त्यामुळे आस्था आणि ओढ कमी होते आणि आपले नामस्मरण नकळत कमी कमी कमी होत जाते. पुष्कळदा हे आपल्या ध्यानातही येत नाही. इतर बाबी मनासारख्या झाल्या किंवा न झाल्या तरीही त्या समाधान देऊ शकत नसल्यामुळे मनामध्ये पोकळी तयार होते आणि खिन्नता पुष्कळदा फारच वाढते.

अश्यावेळी सदगुरूच आपल्यासाठी "नामसंकल्प" हा रामबाण उपाय; या ना त्या माध्यमातून उपलब्ध करतात. नामसंकल्पामुळे रोजच्या जीवनाला एक हेतू मिळतो आणि नामस्मरणाच्या क्रियेला एक प्रकारचा नेमकेपणा, आखीवपणा, निश्चितपणा आणि आकर्षकपणा येतो. त्याबद्दल नकळत बांधिलकी तयार होते. नामस्मरण पुन्हा रुळावर आले की मनातली पोकळी गुरूंच्या आठवणीने, गुरुवरील भक्तीने आणि तज्जन्य उत्साहाने भरून जाते आणि खिन्नता पार निघून जाते.

नामसंकल्पयुक्त नामस्मरणाचे चैतन्याधिष्ठान आणि सद्गुरुंची गोड ओढ यानी रटाळ क्षण उत्साहवर्धक बनतो, कंटाळवाणा दिवस सण बनतो आणि निरर्थक आयुष्य कृतार्थ बनते! कुणीही हे करून पाहिले तर याचा अनुभव येऊ शकेल.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (2151)  |  User Rating
Rate It


Jul15
नामस्मरण आणि पायाभूत सुविधा डॉ. श्रीनिवास 
नामस्मरण आणि पायाभूत सुविधा डॉ. श्रीनिवास कशाळीकर

रस्ते, पूल, रेल्वे, वीज, दूरध्वनी, दूरदर्शन, इंटरनेट इत्यादी सुविधा ह्या आर्थिक पायाभूत सुविधा आहेत. एकंदर विकासात त्यांना महत्वाचे स्थान आहेच. त्यामुळे त्या अत्यावश्यक आहेत.
पण सर्वांगीण आरोग्यच नसेल तर ह्या सुविधांना अर्थ उरत नाही. त्या निरुपयोगी ठरतात. किंबहुना घातक देखील ठरू शकतात (कारण त्यांचा उपयोग रोग वाढण्यासाठी आणि पसरण्यासाठी होतो). त्यामुळे सर्वांगीण (सम्यक) आरोग्य जोपासणाऱ्या; सम्यक शिक्षण संस्था आणि सम्यक आरोग्य संस्था (सामाजिक पायाभूत सुविधा) अधिक अत्यावश्यक आहेत.

पण सुयोग्य आर्थिक आणि सामाजिक सुविधा निर्माण करण्यासाठी सम्यक दृष्टीकोन आणि त्या अनुरोधाने कार्य करणारी माणसे घडवणारी अशी पायाभूत सुविधा अत्याधिक अत्यावश्यक आहे! अश्या सुविधेच्या अभावी आर्थिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांची दिशा आणि दशा चुकते आणि दुरवस्था अन्य विविध मार्गांनी समाजात शिरकाव करते आणि समाज उध्वस्त करते. जगातील अनेक अप्रगत आणि तथाकथित प्रगत देशात देखील आज हे घडत आहे. अशी काही पायाभूत सुविधा आहे का?

होय! अशी एक पायाभूत सुविधा आहे! पूर्णपणे बिनखर्चाची, कुणाचेही अंत:करण आणि आणि अस्मिता न दुखावणारी आणि सर्वांनाच सहज शक्य अशी ही सुविधा आहे. ह्या सुविधेद्वारे सद्विचार, सद्भावना, सद्वासना, सत्संकल्प आणि विश्वकल्याणकारी आणि सतत विकसित होणारी सत्कार्ये अविरतपणे घडू लागतात. प्रत्येक व्यक्ती समाधानी आणि कृतार्थ होऊ लागते. अशी अत्याधिक अत्यावश्यक पायाभूत सुविधा म्हणजे नामस्मरण!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (2184)  |  User Rating
Rate It


Jul14
नामस्मरण आणि प्राधान्यक्रम डॉ. श्रीनिवास 
नामस्मरण आणि प्राधान्यक्रम डॉ. श्रीनिवास कशाळीकर

आजच्या धकाधकीच्या काळात आपला प्राधान्यक्रम अचूकपणे ठरवणे हे यशस्वी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपण कोणत्याही क्षेत्रात काम करीत असलो तरी आपले यश आपल्या प्राधान्यक्रमावर अवलंबून असते. त्यामुळेच वेळ, पैसा आणि शक्ती यांचे योग्य व्यवस्थापन शक्य होते.

प्राधान्यक्रम अचूक असला की; आपला वेळ आपल्या (आणि म्हणूनच इतरांच्याही) अंतरात्म्याला विविध प्रकारे समाधान देण्यामध्ये व्यस्त होतो आणि सर्वांगीण यशाची शिखरे सर होतात.

काहीजणांना ह्याची जाण पूर्वपुण्याईमुळे उपजतच असते. त्यामुळे, महान खेळाडू, संगीतकार, साहित्यिक, चित्रकार, अभिनिते, व्यावसायिक, उद्योजक, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, राजकारणी, रणझुंजार आणि विशेषत: योगी-संत-महात्मे इत्यादींचा प्राधान्यक्रम लहानपणापासून ठरलेला असतो. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचा बहुतेक वेळ (थिल्लर बाबींमध्ये वाया ना जाता) त्यांच्या क्षेत्रातील साधनेत म्हणजेच सत्कारणी लागतो.

याउलट, आपल्यासारख्यांना प्राधान्यक्रम अचूकपणे ठरवण्याची पुरेशी क्षमता उपजत नसते. सद्बुद्धी (सद्विचार, सत्प्रेरणा, सद्भावना, सद्वासना आणि सत्संकल्प), सदिच्छा, सत्शक्ती यांची आपल्यामध्ये उणीव असते. त्यामुळे आपला प्राधान्यक्रम चुकतो. साहजिकच, आपल्या आयुष्यातला बराच वेळ (सत्कार्यात न जाता) थिल्लरपणात किंवा चुकीचे निर्णय घेतल्यामुळे नको त्या उलाढाली करण्यात वाया जातो आणि आपण सारखे पस्तावत राहतो.

नामस्मरणाने चित्तशुद्धी होते. म्हणजेच, सद्बुद्धी (सद्विचार, सत्प्रेरणा, सद्भावना, सद्वासना आणि सत्संकल्प), सदिच्छा आणि सत्शक्ती वाढीस लागतात. यामुळे प्राधान्यक्रम अचूकपणे ठरवण्याची आणि आयुष्यातला बहुमूल्य वेळ योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे सत्कारणी लावण्याची म्हणजेच, सत्कर्म करण्याची सर्वांगीण क्षमता वाढीस लागते आणि जीवन यशस्वी होण्याचा मार्ग प्रशस्त होतो!

“नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हणता टाळता येत नाही” असे जेव्हां सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर म्हणतात, तेव्हां त्यांमध्ये वरील सर्वकाही अंतर्भूत आहे, म्हणजेच वेळ, पैसा आणि शक्ती यांचे (अर्थात आयुष्याचे) सर्वोत्तम व्यवस्थापन अनुस्यूत आहे!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (2045)  |  User Rating
Rate It


Jul13
जगणे डॉ. श्रीनिवास कशाळीकर
जगणे डॉ. श्रीनिवास कशाळीकर

आपण जगतो म्हणजे काय करतो?

आपल्या जगण्याच्या बाह्य, वरवरच्या, थिल्लर, जुजबी आणि क्षणभंगुर बाबी म्हणजे आपले कपडे, खाणे-पिणे, शारीरिक उपभोग-भोग, यश-अपयश, मान-अपमान, फायदा-तोटा, कौटुंबिक सुख-दु:ख; इत्यादी. ह्यातले काही अनुभव खोलवर जाऊन बराच कालपर्यंत आपल्याला उत्तेजित किंवा उदास करीत राहतात हे खरे. पण तरीही ह्या बाबी आपल्याला स्वस्थ करीत नाहीत. कारण ही सर्व जगण्याची “टरफले” आहेत!

परंतु पूर्वजन्मीच्या किंवा ह्या जन्मीच्या नामस्मरणाने; स्वत:च्या आणि इतरांच्या कल्याणाविषयी जी वैचारिक स्पष्टता येते ती स्पष्टता, जी गोड आणि उत्कट आस्था तयार होते ती आस्था, आणि त्या अनुरोधाने जी मन:पूर्वक कृती घडते ती कृती; ह्या तीनही बाबी मात्र हृदयाच्या अगदी जवळ असतात. इतक्या जवळ की शरीराच्या मृत्यूने देखील त्या नष्ट होणार नाहीत याची आत पक्की खात्री होते आणि परम समाधान होते. जन्मभर आपण कळत-नकळत ज्याच्या शोधात होतो, ते हेच आणि ह्याचसाठी केला होता अटाहास असे मनोमन वाटते! हे “जगणे” शरीराच्या मृत्युनंतर देखील टिकून राहणार याची खात्री पटते.

जगण्याची “टरफले” दुय्यम बनतात आणि प्रसंगी निरर्थक आणि क:किंमत बनतात.

नामस्मरण करणाऱ्यांना ह्याचा पडताळा घेता येऊ शकेल!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (2073)  |  User Rating
Rate It


Jul12
समता आणि नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
समता आणि नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

१. समाजातील प्रत्येकाला; ज्याच्या त्याच्या सुप्त प्रकृती धर्मानुसार आणि क्षमतेनुसार; संपूर्णपणे बहरण्याची संधी उपलब्ध करून देणारी भौतिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, राजकीय अश्या विविध प्रकारची परिस्थिती (बालक, किशोर, शिशु, तरुण, अविवाहित, विवाहित, प्रौढ, वृद्ध, रुग्ण, विकलांग, गरोदर स्त्री, कष्टकरी, रात्रपाळी कामगार, सैनिक, अग्निशमन कर्मचारी, पोलीस, कलाकार, वैज्ञानिक अश्या विविध प्रकारच्या व्यक्तींच्या गरजा भिन्न असतात. त्यामुळे, प्रत्येकाला प्रत्येक बाबीची समान वाटणी म्हणजे समता मुळीच नव्हे) उपलब्ध करून देणे.
२. हे शक्य होण्यासाठी योग्य असा समग्र दृष्टीकोन, धोरणे, योजना, कायदे, नियम आणि अंमलबजावणीच्या यंत्रणा वरील सर्व क्षेत्रांमध्ये विकसित होणे आवश्यक आहे.
३. प्राचीन काळापासून जाणता अजाणता आणि विविध साधनांनी होणाऱ्या आंतरिक विकासामुळे आपल्यातल्या बहुतेकांना हे ढोबळ मानाने माहीत असते आणि अगदी मनापासून मान्य देखील असते. आपण त्यानुसार वागत देखील असतो. अनेक धोरणे, कायदे, नियम, सामाजिक रूढी, परंपरा, प्रघात, चालीरीती, संकेत वगैरेंमध्ये आंतरिक विकासाची लक्षणे दिसतात.
४. पण आंतरिक विकास (वैचारिक स्पष्टता, भावनात्मक निष्ठा, दृढ निर्धार आणि चिकाटी) कमी पडल्यामुळे आपल्यातील हीन वा भोळसट धारणा आणि भावना उफाळून येतात आणि पुष्कळदा आपण सवंग घोषणा, पोकळ वल्गना, बाष्कळ बडबड वगैरेमध्ये अडकतो, गुरफटतो, फरफटतो आणि भरकटतो!
५. यातून बाहेर पडून समता आणण्यासाठी; आंतरिक विकासाचे (आपापल्या क्षेत्रात वैचारिक स्पष्टता, भावनात्मक निष्ठा, आणि कर्तव्यातील समाधान मिळवण्याचे) सर्वात महत्वाचे, सर्वांना शक्य असे, सर्वांत सोपे, आणि बिनखर्चाचे असे साधन नामस्मरण आहे.
६. केवळ वाचन आणि चर्चेने नामस्मरणाच्या ह्या विश्वकल्याणकारी सामर्थ्याची संकल्पना काही प्रमाणात येऊ शकेल, पण त्याची प्रचीती येण्यासाठी नामस्मरण करणेच अत्यावश्यक आहे. किंबहुना, नामस्मरणाला पर्याय नाही असे म्हटले तरी ते अतिशयोक्त ठरणार नाही!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (2201)  |  User Rating
Rate It


Jul05
ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजानचा ì
ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांचा सोपा उपदेश: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

गोंदवलेकर महाराज म्हणतात, "हवे व नको याचा आग्रह नसावा. यातच वासनेचे मरण आहे".

आपण तत्वज्ञानाची पुस्तके वाचतो तेव्हा "अहं ब्रह्मास्मि" अर्थात आपले खरे स्वरूप ब्रह्म आहे असे वाचतो. पण रोजच्या जीवनात प्रमाणिकपणे आत्मनिरीक्षण केले तर काय आढळते? अगदी क्षुल्लक बाबींनी आपण हतबल होतो किंवा हुरळून जातो! याचा अर्थ आपण सर्वसमावेशक ब्रह्म नव्हे तर अगदी क्षुल्लक आहोत!

दोघात खरे काय?

आपण क्षुल्लक आहोत हेही खरे आणि आपण ब्रह्म आहोत हे खरे आहे!

आज आपण क्षुल्लक आहोत आणि त्यामुळे क्षुल्लक बाबींनी घाबरतो, दु:खी होतो, हतबल होतो किंवा हुरळून जातो, हे खरे आहे. पण त्याचप्रमाणे, आपले खरे स्वरूप ब्रह्म आहे, हे देखील खरे आहे! पण ते सुप्त आहे,आपल्याला आज जाणवत नाही, त्यामुळे आपण त्याला पारखे झालेलो आहोत!

ज्याप्रमाणे गुण प्रगट होण्यासाठी आपल्याला विशिष्ट अभ्यास करावा लागतो, त्याचप्रमाणे ब्रह्म प्रगट होण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो!

नामस्मरण म्हणजेच आपल्या खऱ्या स्वरूपाचे स्मरण हाच तो अभ्यास! नामस्मरण सतत केले की आपल्या क्षुद्र्पणाची आवरणे गळून पडू लागतात आणि आपला "हवे नको याचा आग्रह" नाहीसा होऊ लागतो!

रोजच्या जीवनात याचा आपण प्रसन्न अनुभव घेऊ शकतो आणि ब्रह्म प्रगट होण्याच्या अर्थात, खऱ्या शरणागतीच्या, आत्मानुभूतीच्या आणि विश्वकल्याणाच्या मार्गावर अग्रेसर होतो!

सोप्या शिकवणुकीचा फायदा असा की ती आचरणात आणणे सहज शक्य असल्यामुळे, आपण भंपकपणा आणि ढोंग यांच्या भरीला पडत नाही आणि त्यापासून सुरक्षित राहतो!

श्रीराम समर्थ!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (2453)  |  User Rating
Rate It


Jul05
श्री क्षेत्र गोंदवले: डॉ. श्रीनिवास कशाळीक
श्री क्षेत्र गोंदवले: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

भारतभूमीमध्ये, कालातीत विश्वचैतन्य वेगवेगळ्या कालावधीत आणि वेगवेगळ्या ठिकाणी व्यक्तीच्या स्वरूपात आविर्भूत होते. करोडो लोकांची जीवने; त्या व्यक्ती देहात असताना आणि त्यांच्या देहत्यागानंतर शतकानुशतके विश्वचैतन्याकडे आकर्षित होतात, चैतन्यमय होतात आणि होत राहतात!

ज्या ठिकाणी ह्या व्यक्तींचे चरण स्पर्श होतात आणि वास्तव्य होते, त्या जागा आणि ती स्थाने त्यांच्या प्रेरणेचा चिरंतन स्त्रोत बनतात! हजारो वर्षे इथे येणाऱ्या लोकांना मायेचा ओलावा, सांत्वना, शांती, उत्साह, धीर, बळ आणि स्फूर्तीचा अनुभव येतो आणि येत राहतो! तसेच, स्वत:ची बुध्दी, भावना, वासना आणि संकल्प पालटल्याचा आणि प्रसन्नतेचा अनुभव येतो! ह्या जागा आणि ह्या स्थानाना आपण तीर्थक्षेत्रे म्हणतो!

अश्या ठिकाणी एक बाब समान असते. ती म्हणजे प्रसाद आणि महाप्रसाद! प्रसाद, किंवा महाप्रसाद म्हणजे आशीर्वाद आणि कृपेने परिपूर्ण असे, अनु. खाद्यपदार्थ किंवा अन्न.

देवाला किंवा आपल्या सद्गुरुना शुद्ध अंत:करणाने खाद्यपदार्थांचा किवा शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून, त्यांची अनुज्ञा घेऊन आणि त्यांचा कृपाशीर्वाद घेऊन जे परत मिळते त्याला आपण अनु. प्रसाद किंवा महाप्रसाद म्हणतो.

सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ह्यांच्या वास्तव्याने पवित्र झालेले श्री. क्षेत्र गोंदवले हे असे पवित्र क्षेत्र आहे! ह्या श्री. क्षेत्र गोंदवल्याला रोज हजारो लोकांना नामस्मरणरुपी अमृताची, प्रसादाची आणि महाप्रसादाची विनामूल्य प्राप्ती होत असते!

गोंदवल्यामध्ये; नामस्मरण करत करत प्रसाद किंवा महाप्रसाद वाढणारे आणि ग्रहण करणारे सर्वच जण ईश्वराप्रती किंवा आपल्या सद्गुरुप्रती कृतज्ञ असतात आणि कृतार्थ असतात! ह्या परंपरेने परस्परांच्या कल्याणाची सद्वासना, सद्भावना, सद्विचार, आणि सत्संकल्प यांचे पोषण होऊन सर्वांचे उत्थान अधिक जोमाने गतिमान होते.

प्रसादासाठी तन, मन वा धन अर्पून आपापल्या परीने सेवा करण्यातील मर्म असे अत्यंत उदात्त आहे!
आपणा सर्वांना निकोप जीवनासाठी आणि जीवनाच्या सार्थकतेसाठी नामस्मरणाची, गोंदवल्याची आणि अश्या प्रसाद व महाप्रसादाची अत्यंत तीव्र आणि निकडीची गरज आहे!

केवळ आपल्याला नव्हे, तर संपूर्ण जगाला नामस्मरणाची, अश्या क्षेत्रांची आणि अश्या प्रसाद व महाप्रसादाची अत्यंत तीव्र आणि निकडीची गरज आहे!

पण हे जसे खरे आहे, तसेच विश्वचैतन्याच्या (सद्गुरुंच्या) इच्छेने आणि प्रेरणेने त्या गरजेची पूर्ती करणारे लोक लाखोंच्या संख्येने वाढत आहेत आणि कृतीशील होत आहेत हे देखील तेवढेच खरे आहे!

श्रीराम समर्थ!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (2427)  |  User Rating
Rate It


Jul05
मेजवानी अन्नदान आणि प्रसाद: डॉ. श्रीनिवास क&#
मेजवानी अन्नदान आणि प्रसाद: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

विद्यार्थी: मेजवानी अन्नदान आणि प्रसाद यात काय फरक आहे?

शिक्षक: बहुतेक वेळा; मेजवानी देणे आणि घेणे यामध्ये एकमेकांना भेटणे, थट्टा मस्करी करणे, मजा लुटणे आणि श्रीमंती, मोठेपणा, भपका, झगमगाट यांचे प्रदर्शन असते. कुणाचा अहंगंड पोसला जातो, तर कुणाचा न्यूनगंड भडकतो. बऱ्याचदा मेजवानीमध्ये उत्तेजना असते, कैफ असतो, धुंदी असते आणि नंतर रितेपणा असतो, खिन्नता असते किंवा बेगडी आणि अतृप्त मिजास असते.

अन्नदान म्हणजे भुकेलेल्यांची भूक भागवणे. बहुतेकवेळा असहाय्य आणि गरजू लोकांच्या कळवळ्यापोटी आणि सहृदयतेणे जेव्हां जेवण किंवा शिधा वाटप होते, तेव्हां त्याला आपण अन्नदान म्हणतो. यामध्ये देणाऱ्याची सहानुभूती आणि धेणाऱ्याची कृतज्ञता असते.

प्रसाद, किंवा महाप्रसाद म्हणजे आशीर्वाद आणि कृपेने परिपूर्ण असे, अनु. खाद्यपदार्थ किंवा अन्न. देवाला किंवा आपल्या सद्गुरुना शुद्ध अंत:करणाने खाद्यपदार्थांचा किवा शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून, त्यांची अनुज्ञा घेऊन आणि त्यांचा कृपाशीर्वाद घेऊन जे परत मिळते त्याला आपण अनु. प्रसाद किंवा महाप्रसाद म्हणतो.

प्रसाद किंवा महाप्रसाद वाढणारे आणि ग्रहण करणारे सर्वच जण ईश्वराप्रती किंवा आपल्या सद्गुरुप्रती कृतज्ञ असतात आणि कृतार्थ असतात! यातून परस्परांच्या कल्याणाची सद्वासना, सद्भावना, सद्विचार, आणि सत्संकल्प यांचे पोषण होऊन सर्वांचे उत्थान अधिक जोमाने गतिमान होते.

प्रसादासाठी तन, मन वा धन अर्पून आपापल्या परीने सेवा करण्यातील मर्म असे अत्यंत उदात्त आहे!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (2314)  |  User Rating
Rate It


Jul05
नाम मुरणे म्हणजे काय: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नाम मुरणे म्हणजे काय: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

विद्यार्थी: सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात, “नाम खोल गेले पाहिजे, नाम मुरले पाहिजे”! ह्या त्यांच्या सांगण्याचा नेमका अर्थ काय?

शिक्षक: आपल्याला वेदना झाली की आपण ओरडतो. दुर्गंध आला की नाक मुरडतो. खाताना खडा लागला की वैतागतो. घरातले कुणी आजारी असले की आपण हवालदिल होतो. बस आली नाही की अस्वस्थ होतो. आर्थिक नुकसानीने खचतो. कुणी पाणउतारा केला की आपण खवळतो किंवा खिन्न होतो. सामाजिक अवहेलना, आजार आणि मृत्युच्या भीतीने तर आपले हृदय धडधडू लागते! याउलट क्षुल्लक यशाने किंवा आर्थिक फायद्याने किंवा फायद्याच्या आमिषाने देखील आपण एकदम हुरळून जातो!

ह्या क्रिया क्षणार्धात घडतात! नामस्मरणाच्या सुरुवातीच्या काळात त्या टाळता येत नाहीत. एवढेच नव्हे तर, त्याबद्दल आपल्याला फारसे काही वाटत देखील नाही! उलट आपण “ह्या बाबी नैसर्गिक आहेत” असे म्हणून स्वत:चे समर्थन करण्याचा प्रयत्न करतो.

पुढे पुढे; अश्या क्रिया घडल्यानंतर खेद होतो. आपण चुकल्याची लाज वाटते! नामस्मरण वाढले पाहिजे यांची तीव्र जाणीव होते!

पण, नाम अधिक खोल गेले किंवा मुरले, तर अश्या क्रिया घडणायापुर्वी आपल्या मनात नामस्मरण येते, राम कर्ता ही भावना येते आणि त्या क्रियांचा परिणाम पूर्वीसारखा तीव्र राहत नाही!

नाम खोल जाण्याच्या व मुरण्याच्या प्रक्रियेतली ही एक पायरी समजायला हरकत नाही!

श्रीराम समर्थ!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (2336)  |  User Rating
Rate It


Browse Archive