Apr10
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Tuesday, 10th April 2012
नामस्मरण नामस्मरणअस्वस्थता हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कारण शरीर आणि मन ही दोन्ही काळ आणि अवकाश यान्च्या आधीन आहेत. सुख आणि दुख्ख ही देखील अवकाश आणि काळाच्या आधीन आहेत. विचार देखील अवकाश आणि काळाच्या आधीन आहेत. ही एक प्रकारची असहाय्यताच आहे.
हिन्सा, अहिन्सा, प्रेम, राग, द्वेष, खिन्नता, उन्माद, निराशा; ही द्वन्द्वे देखील एक प्रकारची अपरिहार्यताच आहे. कोण्त्याही एका भावनेत शान्ति नाही. समाधान नाही. कोणत्याही एका कृत्रिम मुल्यांमध्ये व तज्जन्य कृतीमध्ये समाधान नाही.
परन्तु हा उपदेश तुम्हा- आम्हाला व सर्वांना आचरणात आणता येईल असे सांगता येत नाही.
पण त्या दिशेने सर्वांना नामस्मरणाच्या द्वारे प्रगत होता येईल.
चला नामस्मरण करु या.
डॉ. श्रीनिवास कशाळीकर.