World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Aug10
अनुभव नामस्मरणाचे: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
अनुभव नामस्मरणाचे: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

विद्यार्थी: सर, नामस्मरणाचे अनुभव सांगा ना!
शिक्षक: प्राणवायू, अन्न, पाणी इत्यादींमुळे आपले शरीर आणि मन पूर्वार्धाच्या पातळीपर्यंत विकसित होतात. नामस्मरणाने ह्या विकासाची पुढची म्हणजेच उत्तरार्धाची पायरी साध्य होते.
विद्यार्थी: पण सर, तरी देखील काही ना काही अनुभव असतीलच ना?
शिक्षक: होय! असतात! नामस्मरणाने सम्यक विकास होत असताना मूलत: वासना, भावना, विचार आणि दृष्टीकोन प्रगल्भ होत जातात. परिणामी ज्याच्या त्याच्या प्रकृतीधर्मानुसार ही प्रगल्भता व सृजनशीलता; विचार, योजकता, साहित्य, कला, संगीत, नेतृत्व, संशोधन, व्यवस्थापन; अश्या विचिध क्षेत्रांत आविष्कृत होते.
विद्यार्थी: पण अध्यात्मिक अनुभवांचे काय?
शिक्षक: कधी मृत्युच्या जबड्यातून सुटका होणे, कधी अनपेक्षित यश मिळणे, कधी कल्पनातीत लाभ होणे, कधी बिकट समस्यांची उकल होणे, कधी उत्कट काव्य स्फुरणे, कधी असामान्य कार्य हातून घडणे; इत्यादी अनेक प्रकारे नामस्मरणाचे अनुभव येतात! संवेदनाशीलता, हळुवारपणा, सहिष्णुता, क्षमाशीलता, नि:पक्षपातीपणा, आत्मपरीक्षण इत्यादी अनेक अंगानी साधकाची वाढ होते. ही वाढ अर्थातच रोजच्या व्यवहारात साधक आणि त्याच्या आजूबाजूचे लोक अनुभवतात..
विद्यार्थी: ह्या साऱ्या अनुभवांमध्ये एकादी समान बाब असते का?
शिक्षक: होय! प्रत्येक अनुभवागणिक साधक; भ्रमाच्या पलिकडे आणि सत्याच्या जवळ जातो!
विद्यार्थी: आपले सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर काय सांगतात?
शिक्षक: त्यांच्या म्हणण्याचा आशय असा आहे की, अनुभवांच्या मागे लागू नये!
हे मला अगदी मनापासून पटतं! कारण, वरील प्रकारचे किंवा अन्य अनुभव निश्चितपणे, अमुक एका व्यक्तीमध्ये व अमुक एका वेळेला येतीलच असे सांगता येत नाही! मात्र, आमच्या सारख्या सामान्यांकडून नामस्मरण होणे व वाढत राहाणे हीच आपल्या सद्गुरूंची सर्वश्रेष्ठ कृपा आणि हाच नामस्मरणाचा सर्वश्रेष्ठ अध्यात्मिक अनुभव असं मला वाटतं!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1534)  |  User Rating
Rate It


Browse Archive